शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
4
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
5
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
6
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
7
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
8
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
9
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
10
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
11
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
12
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
13
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
14
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
15
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
16
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
17
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
18
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
19
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
20
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

कोरोनामुळे विवाह सोहळ्यावरही आले निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

पंचांगानुसार एप्रिल महिन्यात विवाहासाठी १५, १६, २६ आणि २७ ता तारखा विवाह योग्य आहेत. १५, १६ आणि २७ या तारखेत साधारण मुहूर्त आहे तर २६ रोजी अक्षय तृतीया असल्याने विवाहासाठी सायंकाळचे गोरज मुहूर्त चांगले आहे. त्यामुळे अनेक पालकांनी हे मुहूर्त निवडले होते. त्यानुसार शहरातील मंगल कार्यालयात या तारखेत बुकिंग झाली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे बुकिंग रद्द करावी लागत आहे.

ठळक मुद्देएप्रिल, मे महिन्यातील लग्न तिथी रद्द : वाजंत्र्यांसह अन्य व्यावसायिकांवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूजन्य साथ आजाराने देशातच नव्हे तर जगात थैमान घातले आहे. परिणामी, जनजीवन ठप्प झाले असून, लग्न सोहळ्यावरही संक्रांत आली आहे. यामुळे वधू-वरांच्या पालकांना लग्न सोहळे रद्द करावे लागत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यातील तारखांच्या मुहूर्तावरील मंगल कार्यालयात केलेली बुकींग अनेकांनी रद्द केली आहे.पंचांगानुसार एप्रिल महिन्यात विवाहासाठी १५, १६, २६ आणि २७ ता तारखा विवाह योग्य आहेत. १५, १६ आणि २७ या तारखेत साधारण मुहूर्त आहे तर २६ रोजी अक्षय तृतीया असल्याने विवाहासाठी सायंकाळचे गोरज मुहूर्त चांगले आहे. त्यामुळे अनेक पालकांनी हे मुहूर्त निवडले होते. त्यानुसार शहरातील मंगल कार्यालयात या तारखेत बुकिंग झाली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे बुकिंग रद्द करावी लागत आहे. मे महिन्यामध्ये एकून नऊ विवाह मुहूर्त आहेत. २, ६, ८, १२, १४, १७, १८, १९, २४ या लग्नतिथींच्या तारखा आहेत. त्यामुळे अनेक वधू-वर पालकांनी या तारखांमध्ये आपल्या मुला-मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालयात बुकिंग केले होते. पण कोरोनाचे संकट असल्यामुळे काही बुकिंग रद्द केली आहे. चंद्रपूर शहराचा विचार केल्यास जवळपास ५० ते ६० च्या आसपास मंगल कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयातील लग्नासाठी बुकिंग झालेल्या बहुतांश तारखा वधू-वर पालकांनी रद्द केल्या आहेत. लग्न सोहळ्यासाठी नातेवाईकांसह २० माणसांची अट असल्यामुळे बहुतांश पालकांनी यंदा होणारे लग्न पुढे ढकलले आहेत.लॉकडाऊन कालावधी ३ मे पर्यंत असला तरी वधू-वर पालकांनी जून महिन्यातीलही मंगल कार्यालयात केलेली बुकींगही रद्द करून यंदा लग्न नकोच म्हणून आपल्या मुला-मुलींच्या लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलला आहे. तर काही जण मोचक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रशासनाची परवानगी घेऊन लग्नसोहळा उरकला जात आहे. त्यातच दुसऱ्या जिल्ह्यात लग्न असलेल्यांना तर अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने लग्न रद्द करणेच योग्य ठरत आहे.दोन महिन्यातल्या बुकिंग रद्दएप्रिल आणि मे महिन्याच्या सर्व तारखा लग्नसाठी बुकींग झाल्या होत्या. अनामत भरुन मंगल कार्यालय बुक केले होते मात्र कोरोनामुळे संबंधितांनी बुकींग रद्द केली आहे. यंदा या संकटामुळे आम्हाला महिन्याला पंचवीस ते तीस लाखाचे नुकसान सहन करावे लागले आहे. जून महिन्यातील तीन-चार तारखा बुक होत्या. मात्र त्याही रद्द होत असल्याचे संचालकाचे म्हणणे आहे.महिन्याला ५० लाखांचे नुकसानमंगल कार्यालयात होणारे लग्न सोहळे रद्द झाल्यामुळे कार्यालयांचे महिन्याला प्रत्येकी १० ते ५० लाखांचे नुकसान झाले आहे. स्वयंपाकी, पुजारी, मंडप, लाईट, फुलवाले या सर्वांचे नुकसान झाली आहे. तसेच या सर्वांच्या अनुषंगाने मजुरांवरही उपासमारीची वेळ आहे.साथ द्या, कोरोनाला हरवाआधी कोरोना मुक्तीचा ध्या घ्या, शक्य असल्यास विवाह सोहळे पुढे ढकला, अन्यथा कुटुंबातच तेही १० लोकात आणि सामाजिक अंतर राखून विवाह उरका.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न