शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

कोरोनामुळे विवाह सोहळ्यावरही आले निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

पंचांगानुसार एप्रिल महिन्यात विवाहासाठी १५, १६, २६ आणि २७ ता तारखा विवाह योग्य आहेत. १५, १६ आणि २७ या तारखेत साधारण मुहूर्त आहे तर २६ रोजी अक्षय तृतीया असल्याने विवाहासाठी सायंकाळचे गोरज मुहूर्त चांगले आहे. त्यामुळे अनेक पालकांनी हे मुहूर्त निवडले होते. त्यानुसार शहरातील मंगल कार्यालयात या तारखेत बुकिंग झाली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे बुकिंग रद्द करावी लागत आहे.

ठळक मुद्देएप्रिल, मे महिन्यातील लग्न तिथी रद्द : वाजंत्र्यांसह अन्य व्यावसायिकांवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूजन्य साथ आजाराने देशातच नव्हे तर जगात थैमान घातले आहे. परिणामी, जनजीवन ठप्प झाले असून, लग्न सोहळ्यावरही संक्रांत आली आहे. यामुळे वधू-वरांच्या पालकांना लग्न सोहळे रद्द करावे लागत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यातील तारखांच्या मुहूर्तावरील मंगल कार्यालयात केलेली बुकींग अनेकांनी रद्द केली आहे.पंचांगानुसार एप्रिल महिन्यात विवाहासाठी १५, १६, २६ आणि २७ ता तारखा विवाह योग्य आहेत. १५, १६ आणि २७ या तारखेत साधारण मुहूर्त आहे तर २६ रोजी अक्षय तृतीया असल्याने विवाहासाठी सायंकाळचे गोरज मुहूर्त चांगले आहे. त्यामुळे अनेक पालकांनी हे मुहूर्त निवडले होते. त्यानुसार शहरातील मंगल कार्यालयात या तारखेत बुकिंग झाली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे बुकिंग रद्द करावी लागत आहे. मे महिन्यामध्ये एकून नऊ विवाह मुहूर्त आहेत. २, ६, ८, १२, १४, १७, १८, १९, २४ या लग्नतिथींच्या तारखा आहेत. त्यामुळे अनेक वधू-वर पालकांनी या तारखांमध्ये आपल्या मुला-मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालयात बुकिंग केले होते. पण कोरोनाचे संकट असल्यामुळे काही बुकिंग रद्द केली आहे. चंद्रपूर शहराचा विचार केल्यास जवळपास ५० ते ६० च्या आसपास मंगल कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयातील लग्नासाठी बुकिंग झालेल्या बहुतांश तारखा वधू-वर पालकांनी रद्द केल्या आहेत. लग्न सोहळ्यासाठी नातेवाईकांसह २० माणसांची अट असल्यामुळे बहुतांश पालकांनी यंदा होणारे लग्न पुढे ढकलले आहेत.लॉकडाऊन कालावधी ३ मे पर्यंत असला तरी वधू-वर पालकांनी जून महिन्यातीलही मंगल कार्यालयात केलेली बुकींगही रद्द करून यंदा लग्न नकोच म्हणून आपल्या मुला-मुलींच्या लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलला आहे. तर काही जण मोचक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रशासनाची परवानगी घेऊन लग्नसोहळा उरकला जात आहे. त्यातच दुसऱ्या जिल्ह्यात लग्न असलेल्यांना तर अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने लग्न रद्द करणेच योग्य ठरत आहे.दोन महिन्यातल्या बुकिंग रद्दएप्रिल आणि मे महिन्याच्या सर्व तारखा लग्नसाठी बुकींग झाल्या होत्या. अनामत भरुन मंगल कार्यालय बुक केले होते मात्र कोरोनामुळे संबंधितांनी बुकींग रद्द केली आहे. यंदा या संकटामुळे आम्हाला महिन्याला पंचवीस ते तीस लाखाचे नुकसान सहन करावे लागले आहे. जून महिन्यातील तीन-चार तारखा बुक होत्या. मात्र त्याही रद्द होत असल्याचे संचालकाचे म्हणणे आहे.महिन्याला ५० लाखांचे नुकसानमंगल कार्यालयात होणारे लग्न सोहळे रद्द झाल्यामुळे कार्यालयांचे महिन्याला प्रत्येकी १० ते ५० लाखांचे नुकसान झाले आहे. स्वयंपाकी, पुजारी, मंडप, लाईट, फुलवाले या सर्वांचे नुकसान झाली आहे. तसेच या सर्वांच्या अनुषंगाने मजुरांवरही उपासमारीची वेळ आहे.साथ द्या, कोरोनाला हरवाआधी कोरोना मुक्तीचा ध्या घ्या, शक्य असल्यास विवाह सोहळे पुढे ढकला, अन्यथा कुटुंबातच तेही १० लोकात आणि सामाजिक अंतर राखून विवाह उरका.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न