शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२२ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे रुपांतरण

By admin | Updated: September 13, 2016 00:38 IST

गेल्या काही वषार्तील सततची नापिकी आणि दुष्काळामुळे शेतकरी अहवालदिल झाला आहे.

रूपांतरित शेतकऱ्यांना३८ कोटींचे कर्ज वाटप१ लाख १० हजार शेतकऱ्यांना ६७० कोटींचे कर्जचंद्रपूर : गेल्या काही वषार्तील सततची नापिकी आणि दुष्काळामुळे शेतकरी अहवालदिल झाला आहे. यामुळे पिक कर्जाची परतफेडही शेतक-यांना त्रासदायक आहे. अशा स्थितीत त्यांना आधार देण्यासाठी शासनाने पिककजार्चे रुपांतरण करुन नव्याने कर्ज उपलब्ध करुन देण्याची सुविधा दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात २२ हजार शेतक-यांच्या मागील थकीत पिककजार्चे रुपांतरण करुन या शेतक-यांना ३८ कोटी रुपये नव्याने पिककर्ज म्हणून उपलब्ध करुन दिले आहे.गेल्या दोन तिन वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे नापिकी आणि दुष्काळासारखी स्थिती निर्माण होत आहे. त्याचा शेतक-यांच्या उत्पान्नावर परिणाम झाला आहे. पिक परिस्थीती चांगली नसल्याने शेतकरीही अहवालदिल आहे. अशा स्थितीत बँकेकडून घेतलेले पिककर्ज परतफेडीचाही अनेक शेतक-यांचा प्रश्न आहे. जुन्या कजार्ची परतफेड न केल्यास बँका नव्याने पिककर्ज देत नाही. अशा स्थितीत शेतकरी पिककजार्पासून वंचित राहू नये म्हणून शासनाने शेतक-यांच्या पिककर्जाच्या रुपांतरणाचा निर्णय घेतला होता.ज्या शेतक-यांचे मागील वषीर्चे पिककर्ज थकीत आहे अशा शेतक-यांच्या कजार्चे रुपांतरण करुन त्यांना नव्याने पिककर्ज दिल्या जात आहे. कजार्चे रुपांतरण करतांना थकीत कर्ज पुढील पाच वर्षात समान हप्त्यात भरण्याची सुविधाही आहे. विशेष म्हणजे पहिला हप्ता सुध्दा शेतक-यांना पुढील वर्षी भरावयाचा आहे. रुपांतरण योजने अंतर्गत २२ हजार शेतक-यांच्या पिककजार्चे रुपांतरण करण्यात आले आहे. रुपांतरणाची रक्कम ११७ कोटी इतकी आहे.विविध बँकांच्या वतीने दरवर्षी शेतक-यांना खरीप हंगामासाठी मोठया प्रमाणात पिककर्ज उपलब्ध करुन दिल्या जात असते. यावर्षी जिल्हयातील शेतक-यांना ७१४ कोटी रुपयाच्या पिककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. यापैकी ११ हजार शेतक-यांनी ६७० कोटीचे पिककर्ज उचललेले आहे. (प्रतिनिधी)पीक कर्जाचे वाटप सुरूरुपांतरण झालेल्या ११ हजार शेतक-यांने नव्याने पिककजार्ची उचल केली आहे. त्यात ३८ कोटीच्या पीककजार्चा समावेश आहे. सदर रुपांतरणाची प्रक्रिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका तसेच ग्रामीण बँकांनी राबविली असून आपल्या गेल्या वर्षीच्या थकीत शेतक-यांना रुपांतरीत करुन त्यांना नव्याने पीककर्ज देण्यास प्रारंभ केला आहे. अद्यापही रुपांतरीत शेतकरी नव्याने पिककजार्ची उचल करु शकते.