शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या हाताबाहेर

By admin | Updated: June 10, 2015 01:31 IST

कृषी पंपांच्या वीज जोडण्या तातडीने द्या आणि कृषी पंपांचा अनुषेश पूर्ण करा, असे पालकमंत्र्यांचे निर्देश असले तरी,

देखभाल शून्य : जगलेल्या वृक्षांची प्रशासनाकडे आकडेवारीच नाही चंद्रपूर : दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या व नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास यामुळे ग्लोबल वार्मिंगसारखे अनेक विषय मुळ धरु पाहत आहेत. पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गांवाची निर्मीती करणे ही काळाची गरज झाल्याने शासनाने वृक्ष लागवड योजना सुरु केली. पर्यावरणीय संतुलन राखून गावाचा शाश्वत विकास हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. मात्र, या योजनेच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासली असून अनेकांनी वृक्ष लागवडीच्या नावाखाली केवळ निधीची उचल करून मलिंदा पचविला. त्यामुळे किती झाडे जगली याची साधी आकडेवारीही प्रशासनाकडे नाही. ही योजनाच कुचकामी ठरली असून योजनेच्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. १०० कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाने वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले. उद्दीष्टानुसार ग्रामपंचायत प्रशासनाकडून रोजगार हमी योजना, १३ वा वित्त आयोग, पर्यावरण संतुलीत, ग्रामनिधीच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात आली. दरवर्षी खड्डे खोदून वृक्ष लागवड होत असली तरी जगलेल्या वृक्षांचा पत्ता नाही. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन आपण शासनाच्या वृक्ष लागवडीचे उद्दीष्ठ पूर्ण केल्याचे सांगत असून परिस्थीती मात्र, फार वेगळी आहे. रस्त्याच्या दुतर्फा खड्डे खोदून वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र, लावलेले झाड जगविण्यासाठी उपाययोजना तोकड्या पडत आहेत. काही ठिकाणी नुसते खड्डे दिसत आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये केलेल्या वृक्षलागवड संदर्भात प्रशासनाकडून जगलेल्या झाडांची माहिती मागितली असता, तालुका प्रशासनाकडून आकडेवारी प्राप्त व्हायची आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. १०० कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत सन २०१४-१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याला १४ लाख ६४ हजार ९६५ वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले. यापैकी ३० जानेवारी २०१५ पर्यंत ४८९ ग्रामपंचायतींमार्फंत ५ लाख २३ हजार ७४१ वृक्ष लावण्यात आल्याची प्रशासनाकडे नोंद आहे. वृक्ष लागवडीसाठी ७ लाख ६३ हजार ५४ खड्डे खोदल्याचीही प्रशासनाकडे नोंद आहे. ही प्रक्रिया अद्यापही सुरुच आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पर्यावरण संतुलनाचा उडाला फज्जाचौकशी होऊनही कारवाई नाही वृक्षलागवड योजनेत अनेक ग्रामपंचायतींनी गैरव्यवहार केल्याचे शासनाच्या निदर्शनास येताच, वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचे शासनाने आदेश दिले. त्यानुसार राष्ट्रीय हरीत सेनेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीची चौकशी करण्यात आली. यात अनेक ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघडकीस आला. मात्र या ग्रामपंचायतींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अनेक ग्रामसचिव गब्बरवृक्ष लागवड योजनेच्या माध्यमातून अनेक ग्रामपंचायतीच्या सचिवांनी गैरव्यवहार करून पैसा कमाविला. याबाबत गावकऱ्यांनी तक्रारी सुद्धा केल्या. मात्र वरिष्ठ स्तरावरून केवळ थातूरमातूर चौकशी करून कारवाई मात्र काहीच केली नाही. त्यामुळे अनेक ग्रामसचिव गब्बर झाले. यात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. माहिती देण्यास टाळाटाळवृक्ष लागवड संदर्भात प्रशासनाकडून आकडेवारी मागितली असता, प्रसार माध्यमांमुळे गैरव्यवहार उजेडात येईल म्हणून माहिती उपलब्ध नाही म्हणून देण्यास नकार दिला. जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती मिळेल, तुम्ही कार्यालयात येण्याची गरज नाही, असेही सांगण्यास कर्मचारी विसरले नाही.