शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या हाताबाहेर

By admin | Updated: June 10, 2015 01:31 IST

कृषी पंपांच्या वीज जोडण्या तातडीने द्या आणि कृषी पंपांचा अनुषेश पूर्ण करा, असे पालकमंत्र्यांचे निर्देश असले तरी,

देखभाल शून्य : जगलेल्या वृक्षांची प्रशासनाकडे आकडेवारीच नाही चंद्रपूर : दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या व नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास यामुळे ग्लोबल वार्मिंगसारखे अनेक विषय मुळ धरु पाहत आहेत. पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गांवाची निर्मीती करणे ही काळाची गरज झाल्याने शासनाने वृक्ष लागवड योजना सुरु केली. पर्यावरणीय संतुलन राखून गावाचा शाश्वत विकास हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. मात्र, या योजनेच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासली असून अनेकांनी वृक्ष लागवडीच्या नावाखाली केवळ निधीची उचल करून मलिंदा पचविला. त्यामुळे किती झाडे जगली याची साधी आकडेवारीही प्रशासनाकडे नाही. ही योजनाच कुचकामी ठरली असून योजनेच्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. १०० कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाने वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले. उद्दीष्टानुसार ग्रामपंचायत प्रशासनाकडून रोजगार हमी योजना, १३ वा वित्त आयोग, पर्यावरण संतुलीत, ग्रामनिधीच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात आली. दरवर्षी खड्डे खोदून वृक्ष लागवड होत असली तरी जगलेल्या वृक्षांचा पत्ता नाही. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन आपण शासनाच्या वृक्ष लागवडीचे उद्दीष्ठ पूर्ण केल्याचे सांगत असून परिस्थीती मात्र, फार वेगळी आहे. रस्त्याच्या दुतर्फा खड्डे खोदून वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र, लावलेले झाड जगविण्यासाठी उपाययोजना तोकड्या पडत आहेत. काही ठिकाणी नुसते खड्डे दिसत आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये केलेल्या वृक्षलागवड संदर्भात प्रशासनाकडून जगलेल्या झाडांची माहिती मागितली असता, तालुका प्रशासनाकडून आकडेवारी प्राप्त व्हायची आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. १०० कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत सन २०१४-१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याला १४ लाख ६४ हजार ९६५ वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले. यापैकी ३० जानेवारी २०१५ पर्यंत ४८९ ग्रामपंचायतींमार्फंत ५ लाख २३ हजार ७४१ वृक्ष लावण्यात आल्याची प्रशासनाकडे नोंद आहे. वृक्ष लागवडीसाठी ७ लाख ६३ हजार ५४ खड्डे खोदल्याचीही प्रशासनाकडे नोंद आहे. ही प्रक्रिया अद्यापही सुरुच आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पर्यावरण संतुलनाचा उडाला फज्जाचौकशी होऊनही कारवाई नाही वृक्षलागवड योजनेत अनेक ग्रामपंचायतींनी गैरव्यवहार केल्याचे शासनाच्या निदर्शनास येताच, वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचे शासनाने आदेश दिले. त्यानुसार राष्ट्रीय हरीत सेनेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीची चौकशी करण्यात आली. यात अनेक ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघडकीस आला. मात्र या ग्रामपंचायतींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अनेक ग्रामसचिव गब्बरवृक्ष लागवड योजनेच्या माध्यमातून अनेक ग्रामपंचायतीच्या सचिवांनी गैरव्यवहार करून पैसा कमाविला. याबाबत गावकऱ्यांनी तक्रारी सुद्धा केल्या. मात्र वरिष्ठ स्तरावरून केवळ थातूरमातूर चौकशी करून कारवाई मात्र काहीच केली नाही. त्यामुळे अनेक ग्रामसचिव गब्बर झाले. यात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. माहिती देण्यास टाळाटाळवृक्ष लागवड संदर्भात प्रशासनाकडून आकडेवारी मागितली असता, प्रसार माध्यमांमुळे गैरव्यवहार उजेडात येईल म्हणून माहिती उपलब्ध नाही म्हणून देण्यास नकार दिला. जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती मिळेल, तुम्ही कार्यालयात येण्याची गरज नाही, असेही सांगण्यास कर्मचारी विसरले नाही.