शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

घाणीमुळे बरांज व चिचोर्डीवासीयांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:20 IST

शहराबाहेरच्या मार्गावरच टाकली जाते घाण भद्रावती : भद्रावती क्षेत्रातील घाण बरांजकडे जाणाऱ्या मार्गांवर टाकली जात असल्यामुळे त्या मार्गाने ...

शहराबाहेरच्या मार्गावरच टाकली जाते घाण

भद्रावती : भद्रावती क्षेत्रातील घाण बरांजकडे जाणाऱ्या मार्गांवर टाकली जात असल्यामुळे त्या मार्गाने जाणे कठीण झाले असून बरांज व चिचोर्डी येथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहराबाहेरुन बरांज व चिचोर्डीला जाण्याकरिता वापरत असलेल्या मार्गावर सध्या कमालीचे घाणीचे साम्राज्य साचले आहे. या मार्गाचा वापर नागरिक मोठ्या प्रमाणात घाण फेकण्याकरिता करत आहेत. नगरपालिका क्षेत्रात असलेले भाजी व्यवसाय करणारे आपला उर्वरित खराब झालेला भाजीपाला, सडलेली फळे, मांस विकल्यानंतर वाचलेले वेस्ट, गटार साफ केल्यानंतर निघालेली घाण, रुग्णालयातील वापरलेली इंजेकशन, कापूस, निकामी औषध व इतर कचरा, मेलेली जनावर या सोबतच घरातून निघणारी सर्व प्रकारची घाण इथे फेकल्या जाते.

नगरपालिकेतर्फे कचरा व्यवस्थापनाकरिता घंटागाड्या, घनकचरा प्रकल्प, सफाई कामगार व स्वच्छतेच्या इतर गोष्टीचा समावेश आहे. या सर्व गोष्टी असूनही व्यापारी व नागरिक बेजबाबदारीने वागत असून घाण रस्त्यावरच टाकत आहे. या परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने अशांवर कारवाई करण्यात यावी. या मार्गावर अतिशय सुंदर नैसर्गिक वातावरण असल्यामुळे नागरिक सकाळी शुद्ध हवा घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात या मार्गांवर येतात. परंतु या घाणीमुळे स्वच्छ हवा मिळण्यापेक्षा नागरिकांना नाक दाबून येथे फिरावे लागत आहे. आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात काम करणे अवघड झाले आहे तर बरांज व चिचोर्डीवासीयांना नाईलाजाने या मार्गाने जावे लागत आहे. या घाणीमुळे सर्व लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कोट

व्यापारी वर्गासाठी केरकचरा उचलण्यासाठी दिवसातून तीनदा घंटागाडीचे नियोजन नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे. तरीसुद्धा इतरत्र घाण, कचरा टाकून प्रदूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

-अनिल धानोरकर, नगराध्यक्ष न.प. भद्रावती.

===Photopath===

170621\img-20210617-wa0045.jpg

===Caption===

शहरा बाहेर टाक नाऱ्या घाणीमुळे बरांज व चिचोर्डी वासियांचं आरोग्य धोक्यात*.