शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

घाणीमुळे बरांज व चिचोर्डीवासीयांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:20 IST

शहराबाहेरच्या मार्गावरच टाकली जाते घाण भद्रावती : भद्रावती क्षेत्रातील घाण बरांजकडे जाणाऱ्या मार्गांवर टाकली जात असल्यामुळे त्या मार्गाने ...

शहराबाहेरच्या मार्गावरच टाकली जाते घाण

भद्रावती : भद्रावती क्षेत्रातील घाण बरांजकडे जाणाऱ्या मार्गांवर टाकली जात असल्यामुळे त्या मार्गाने जाणे कठीण झाले असून बरांज व चिचोर्डी येथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहराबाहेरुन बरांज व चिचोर्डीला जाण्याकरिता वापरत असलेल्या मार्गावर सध्या कमालीचे घाणीचे साम्राज्य साचले आहे. या मार्गाचा वापर नागरिक मोठ्या प्रमाणात घाण फेकण्याकरिता करत आहेत. नगरपालिका क्षेत्रात असलेले भाजी व्यवसाय करणारे आपला उर्वरित खराब झालेला भाजीपाला, सडलेली फळे, मांस विकल्यानंतर वाचलेले वेस्ट, गटार साफ केल्यानंतर निघालेली घाण, रुग्णालयातील वापरलेली इंजेकशन, कापूस, निकामी औषध व इतर कचरा, मेलेली जनावर या सोबतच घरातून निघणारी सर्व प्रकारची घाण इथे फेकल्या जाते.

नगरपालिकेतर्फे कचरा व्यवस्थापनाकरिता घंटागाड्या, घनकचरा प्रकल्प, सफाई कामगार व स्वच्छतेच्या इतर गोष्टीचा समावेश आहे. या सर्व गोष्टी असूनही व्यापारी व नागरिक बेजबाबदारीने वागत असून घाण रस्त्यावरच टाकत आहे. या परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने अशांवर कारवाई करण्यात यावी. या मार्गावर अतिशय सुंदर नैसर्गिक वातावरण असल्यामुळे नागरिक सकाळी शुद्ध हवा घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात या मार्गांवर येतात. परंतु या घाणीमुळे स्वच्छ हवा मिळण्यापेक्षा नागरिकांना नाक दाबून येथे फिरावे लागत आहे. आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात काम करणे अवघड झाले आहे तर बरांज व चिचोर्डीवासीयांना नाईलाजाने या मार्गाने जावे लागत आहे. या घाणीमुळे सर्व लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कोट

व्यापारी वर्गासाठी केरकचरा उचलण्यासाठी दिवसातून तीनदा घंटागाडीचे नियोजन नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे. तरीसुद्धा इतरत्र घाण, कचरा टाकून प्रदूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

-अनिल धानोरकर, नगराध्यक्ष न.प. भद्रावती.

===Photopath===

170621\img-20210617-wa0045.jpg

===Caption===

शहरा बाहेर टाक नाऱ्या घाणीमुळे बरांज व चिचोर्डी वासियांचं आरोग्य धोक्यात*.