शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

घाणीमुळे बरांज व चिचोर्डीवासीयांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:20 IST

शहराबाहेरच्या मार्गावरच टाकली जाते घाण भद्रावती : भद्रावती क्षेत्रातील घाण बरांजकडे जाणाऱ्या मार्गांवर टाकली जात असल्यामुळे त्या मार्गाने ...

शहराबाहेरच्या मार्गावरच टाकली जाते घाण

भद्रावती : भद्रावती क्षेत्रातील घाण बरांजकडे जाणाऱ्या मार्गांवर टाकली जात असल्यामुळे त्या मार्गाने जाणे कठीण झाले असून बरांज व चिचोर्डी येथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहराबाहेरुन बरांज व चिचोर्डीला जाण्याकरिता वापरत असलेल्या मार्गावर सध्या कमालीचे घाणीचे साम्राज्य साचले आहे. या मार्गाचा वापर नागरिक मोठ्या प्रमाणात घाण फेकण्याकरिता करत आहेत. नगरपालिका क्षेत्रात असलेले भाजी व्यवसाय करणारे आपला उर्वरित खराब झालेला भाजीपाला, सडलेली फळे, मांस विकल्यानंतर वाचलेले वेस्ट, गटार साफ केल्यानंतर निघालेली घाण, रुग्णालयातील वापरलेली इंजेकशन, कापूस, निकामी औषध व इतर कचरा, मेलेली जनावर या सोबतच घरातून निघणारी सर्व प्रकारची घाण इथे फेकल्या जाते.

नगरपालिकेतर्फे कचरा व्यवस्थापनाकरिता घंटागाड्या, घनकचरा प्रकल्प, सफाई कामगार व स्वच्छतेच्या इतर गोष्टीचा समावेश आहे. या सर्व गोष्टी असूनही व्यापारी व नागरिक बेजबाबदारीने वागत असून घाण रस्त्यावरच टाकत आहे. या परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने अशांवर कारवाई करण्यात यावी. या मार्गावर अतिशय सुंदर नैसर्गिक वातावरण असल्यामुळे नागरिक सकाळी शुद्ध हवा घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात या मार्गांवर येतात. परंतु या घाणीमुळे स्वच्छ हवा मिळण्यापेक्षा नागरिकांना नाक दाबून येथे फिरावे लागत आहे. आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात काम करणे अवघड झाले आहे तर बरांज व चिचोर्डीवासीयांना नाईलाजाने या मार्गाने जावे लागत आहे. या घाणीमुळे सर्व लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कोट

व्यापारी वर्गासाठी केरकचरा उचलण्यासाठी दिवसातून तीनदा घंटागाडीचे नियोजन नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे. तरीसुद्धा इतरत्र घाण, कचरा टाकून प्रदूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

-अनिल धानोरकर, नगराध्यक्ष न.प. भद्रावती.

===Photopath===

170621\img-20210617-wa0045.jpg

===Caption===

शहरा बाहेर टाक नाऱ्या घाणीमुळे बरांज व चिचोर्डी वासियांचं आरोग्य धोक्यात*.