शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

कोलाम बांधव पितात नाल्यातील दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:11 IST

तालुक्यातील बगलवाही या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील वन जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्य करणारे आदिवासी वनवासी कोलाम आजही नाल्यातील झऱ्याच्या पाण्यावर जीवन जगत आहे.

ठळक मुद्देसवलतीपासून वंचित : हातपंप खोदकामाला वनविभागाची आडकाठी

आनंद भेंडे।लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : तालुक्यातील बगलवाही या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील वन जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्य करणारे आदिवासी वनवासी कोलाम आजही नाल्यातील झऱ्याच्या पाण्यावर जीवन जगत आहे. त्यांना शासनातर्फे मुलभूत सोयी सवलती पंचायत समितीकडून देण्याचा प्रयत्न वनविभागाच्या राखीव वनामुळे असफल ठरला आहे. त्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हातपंप सुद्धा खोदण्यास मनाई केल्यामुळे सुमारे १० वर्षांपासून नाल्याच्या पाण्यावर जीवन जगत आहे. त्यामुळे आतापर्यंत तेथील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.बगलवाही हे जुने रिठ असून कोलामांच्या वास्तव्याचे बºयाच वर्षापुर्वी ठिकाण होते. परंतु त्यांच्या रितीरिवाजाप्रमाणे एखादा व्यक्ती मरण पावल्यास स्थानांतर करणे, ही त्याची प्रथा आहे. सध्या बगलवाही येथे दोन गुड्यात जवळपास ३५-४० घरे असून २०० लोकांची संख्या आहे. सन २००० मध्ये डोंगरगाव धरणाच्या बुडीत क्षेत्रात त्याच्या जमिनी गेल्यामुळे इतरत्र स्थानांतर झाले. काही कोलामांचे मूर्ती या गावी शासनाने स्थानांतर केले. कोलामांचे वास्तव्य सामान्य जनतेपासून दूर राहणे, जंगलापासून जीवन जगणे ही त्यांची संस्कृती आहे. जंगलातील बांबूपासून तट्टे, ताटवे बनवून आपली उपजिविका करतात. तसेच थोड्या फार वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती करतात. याच उद्देशाने बगलवाही येथील वन जमिनीवर अतिक्रमण करून जीवन जगत आहेत.सन २०११ मध्ये बगलवाही येथील कोलामांचे घर उद्ध्वस्त करून त्यांना बेघर करण्यात आले होते. परंतु श्रमिक एल्गारच्या नेत्या पारोमिता गोस्वामी यांनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यामुळे त्यांना त्याच जागेवर स्थायी करण्यात आले. त्यानंतर मुलभूत सोयी सवलती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी व पंचायत समिती राजुराकडून करण्यात आले. परंतु, वन विभागाकडून त्यांना मनाई करून ग्रा.पं.कडून लावलेले सौर उर्जाचे लाईट जुलै २०१६ मध्ये काढण्यात आले. हातपंप खोदण्यासाठी पाठविलेली गाडी सुद्धा परत आली. त्याचा परिणाम आजही नागरिक नाल्यात खड्डा खोदून झºयाच्या पाण्यावर जीवन जगत आहे. हे वास्तव्य आहे. त्यामुळेच आजपर्यंत विविध आजाराने येथील नऊ जणांचा मृत्यू झाला.कोस्टाळा ग्रामपंचायतने पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभेत ठराव पास करून स्वतंत्र गुडा घोषीत करण्याची मागणी जिल्हाधिकारी व वनविभागाकडे केली आहे. तसेच भौतिक सुविधा पुरविण्यासाठी मंजुरी देण्याची मागणी केली आहे. वन जमिनीवर अतिक्रमण असल्यामुळे भौतिक सुविधा पुरवण्यासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्राअभावी आजही जैसे थे स्थिती आहे.- डॉ. ओमप्रसाद रामावत,गट विकास अधिकारी, पंचायत समिती, राजुरा.