शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

अडीच हजार कृषिपंपांना जूनपर्यंत जोडणी द्या

By admin | Updated: May 1, 2015 01:08 IST

सिंचनासाठी शेतकऱ्यांची गरज ओळखा, शेतकऱ्यांना मृत्यूच्या मार्गावरून रोखण्यासाठी सिंचन पुरवा,

चंद्रपूर : सिंचनासाठी शेतकऱ्यांची गरज ओळखा, शेतकऱ्यांना मृत्यूच्या मार्गावरून रोखण्यासाठी सिंचन पुरवा, वीज जोडणीसाठी थांबलेले कृषी पंप सुरू करा आणि १५ जूनपूर्वी अडीच हजार कृषी पंपांना कनेक्शन द्या, असदे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी अधिकाऱ्यंना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या साफल्य भवनात आयोजित कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन ना. मुनगंटीवार बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आमदार शोभाताई फडणवीस, आमदार डॉ.संजय धोटे, आमदार सुरेश धानोरकर, प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कल्पना बोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.एस.आर.हसनाबादे व आत्मा प्रकल्प संचालक डॉ.विद्या मानकर उपस्थित होते.पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने कृषी वीजपंपांची जोडणी मार्च २०१५ अखेरपर्यंत ४ हजार ५९९ जोडणी प्रलंबित आहे. त्यापैकी प्राधान्याने १५ जूनपर्यंत अडीच हजार कृषी वीज पंप जोडण्यात यावेत. यात दिरंगाई करणाऱ्यांंवर कडक कारवाई करुन दंड आकारण्याची शिफारस त्यांनी केली. ट्रान्सफॉर्मरबाबतही योग्य दक्षता घेऊन शेतक-यांना योग्य वेळेत पाणी देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कार्यवाही करावी. पाण्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन बदलत्या वातावरणाचा अभ्यास करुन मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर पाण्याचे वाटप करावे. पाणी वाटप संस्थांना विश्वासात घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.बियाणांच्या बाबतीतही शेतक-यांना अधिक उगवणक्षमता असलेली बियाणे उपलब्ध करुन द्या. कृषी विद्यापीठानेही यावर दर्जदार संशोधन करायला हवे. संशोधनावर आधारित बियाणांच्या पुरवठादार कंपन्यांनी टंचाई भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. खत पुरवठादारांनीही नियमाप्रमाणे खतांची विक्री करावी. तसेच खताचा तुटवडा भासणार नाही याचीही दक्षता घेण्यात यावी. चंद्रपूरातील रॅक पॉईटबाबतही गांभीर्याने विचार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. खत पुरवठादारांनी कृषी विभागाशी समन्वय साधून योग्यवेळी खत पुरवठा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.सन २०१५-१६ मध्ये खरीप हंगामाकरिता चार लाख ४७ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले. विविध पिकांकरिता चंद्रपूर जिल्ह्यास एकूण ९९ हजार ६५९ क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. जिल्ह्यास खरीप हंगामाकरिता एक लाख १० हजार २०० मे.टन रासायनिक खताचे आवंटन असून २९ एप्रिलपर्यंत १६ हजार पाच मे.टन खत प्राप्त झाले आहे. त्यापैकी एक हजार ६०५ मे.टन खताची विक्री झाली असून १४ हजार ४०० मे.टन रासायनिक खत शिल्लक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन पाठपुरावा करावा, असे निर्देशही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिलेत. (जिल्हा प्रतिनिधी)