शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

अडीच हजार कृषिपंपांना जूनपर्यंत जोडणी द्या

By admin | Updated: May 1, 2015 01:08 IST

सिंचनासाठी शेतकऱ्यांची गरज ओळखा, शेतकऱ्यांना मृत्यूच्या मार्गावरून रोखण्यासाठी सिंचन पुरवा,

चंद्रपूर : सिंचनासाठी शेतकऱ्यांची गरज ओळखा, शेतकऱ्यांना मृत्यूच्या मार्गावरून रोखण्यासाठी सिंचन पुरवा, वीज जोडणीसाठी थांबलेले कृषी पंप सुरू करा आणि १५ जूनपूर्वी अडीच हजार कृषी पंपांना कनेक्शन द्या, असदे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी अधिकाऱ्यंना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या साफल्य भवनात आयोजित कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन ना. मुनगंटीवार बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आमदार शोभाताई फडणवीस, आमदार डॉ.संजय धोटे, आमदार सुरेश धानोरकर, प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कल्पना बोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.एस.आर.हसनाबादे व आत्मा प्रकल्प संचालक डॉ.विद्या मानकर उपस्थित होते.पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने कृषी वीजपंपांची जोडणी मार्च २०१५ अखेरपर्यंत ४ हजार ५९९ जोडणी प्रलंबित आहे. त्यापैकी प्राधान्याने १५ जूनपर्यंत अडीच हजार कृषी वीज पंप जोडण्यात यावेत. यात दिरंगाई करणाऱ्यांंवर कडक कारवाई करुन दंड आकारण्याची शिफारस त्यांनी केली. ट्रान्सफॉर्मरबाबतही योग्य दक्षता घेऊन शेतक-यांना योग्य वेळेत पाणी देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कार्यवाही करावी. पाण्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन बदलत्या वातावरणाचा अभ्यास करुन मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर पाण्याचे वाटप करावे. पाणी वाटप संस्थांना विश्वासात घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.बियाणांच्या बाबतीतही शेतक-यांना अधिक उगवणक्षमता असलेली बियाणे उपलब्ध करुन द्या. कृषी विद्यापीठानेही यावर दर्जदार संशोधन करायला हवे. संशोधनावर आधारित बियाणांच्या पुरवठादार कंपन्यांनी टंचाई भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. खत पुरवठादारांनीही नियमाप्रमाणे खतांची विक्री करावी. तसेच खताचा तुटवडा भासणार नाही याचीही दक्षता घेण्यात यावी. चंद्रपूरातील रॅक पॉईटबाबतही गांभीर्याने विचार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. खत पुरवठादारांनी कृषी विभागाशी समन्वय साधून योग्यवेळी खत पुरवठा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.सन २०१५-१६ मध्ये खरीप हंगामाकरिता चार लाख ४७ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले. विविध पिकांकरिता चंद्रपूर जिल्ह्यास एकूण ९९ हजार ६५९ क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. जिल्ह्यास खरीप हंगामाकरिता एक लाख १० हजार २०० मे.टन रासायनिक खताचे आवंटन असून २९ एप्रिलपर्यंत १६ हजार पाच मे.टन खत प्राप्त झाले आहे. त्यापैकी एक हजार ६०५ मे.टन खताची विक्री झाली असून १४ हजार ४०० मे.टन रासायनिक खत शिल्लक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन पाठपुरावा करावा, असे निर्देशही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिलेत. (जिल्हा प्रतिनिधी)