शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

काँग्रेसने पाळला विश्वासघात दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 10:56 PM

भाजपा सरकारला केंद्रात सत्ता स्थापन करून चार वर्षे पूर्ण झाले. मात्र, जनहितविरोधी धोरणे राबवून नागरिकांचा अपेक्षाभंग केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने शनिवारी विश्वासघात दिन पाळण्यात आला. दरम्यान, पेट्रोल व डिझेलचे वाढते दर, आणि बेरोजगारांची दिशाभूल सुरू असल्याचा आरोप करून बैलबंडीवर दुचाकी ठेवून शहरातून रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देसरकारच्या धोरणांचा निषेध : बैलबंडीवर दुचाकी ठेऊन शहरात काढली रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भाजपा सरकारला केंद्रात सत्ता स्थापन करून चार वर्षे पूर्ण झाले. मात्र, जनहितविरोधी धोरणे राबवून नागरिकांचा अपेक्षाभंग केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने शनिवारी विश्वासघात दिन पाळण्यात आला. दरम्यान, पेट्रोल व डिझेलचे वाढते दर, आणि बेरोजगारांची दिशाभूल सुरू असल्याचा आरोप करून बैलबंडीवर दुचाकी ठेवून शहरातून रॅली काढण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने शनिवारी चार वर्षे पूर्ण केले. या काळात मोदी सरकारला सर्वच आघाड्यांवर अपयश आले. निवडणुकीदरम्यान दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने महागाई आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. युवक, शेतकरी, व्यापारी, महिला व विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोणतीही धोरणे न राबविल्याचा आरोप करून काँग्रेसने विश्वासघात दिन पाळला. चंद्रपूर शहर जिल्हा कमिटीच्या वतीने सकाळी १० वाजता हाताला काळी फीत बाधून बैलबंडीवर मोटर सायकल ठेवण्यात आली. त्यावर ‘यह गाडी बेचना है’ असा मजकूर लिहिण्यात आला होता. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कोणत्याही योजना राबविण्यात आल्या नाहीत. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाºया योजनांचा निधी कमी करण्यात आला. अल्पसंख्याक समुदायावर धार्मिक अत्याचार सुरू असूनही केंद्र सरकार व राज्य सरकारने आळा घातला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.शहरातील प्रमुख मार्गाने रॅली काढल्यानंतर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आंदोलना सांगता करण्यात आली.यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, के. के. सिंग, माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मलक शाकीर, सचिन कत्याल, अनुसूचित जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष संजय रत्नपारखी, विनोद संकत, निखिल धनवलकर, शालिनी भगत, वंदना भागवत, अनुसूचित जाती विभाग शहर अध्यक्ष हरिदास लांडे, अनिल सुरपाम, सुर्यकांत खनके, आसिफ हुसेन, फारूक सिद्धकी, हाजी हारून, अ‍ॅड. भास्कर दिवसे, मोहन डोंगरे, प्रकाश अधिकारी, सुनिता अग्रवाल, संतोष लहामगे, राजकुमार रेवल्लीवार, राजू दास, श्याम राजूरकर, दीपक कटकोजवार, सुरेश आत्राम, वकार काजी, बंडोपंत तातावार आदी उपस्थित होते.केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशीकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. या काळात जनतेला केवळ आश्वासने मिळाली. त्यामुळे युवक, बेरोजगार, शेतकरी, मजूर व उद्योगांना मोठा फटका बसला. केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले, अशी टीका काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी शनिवारी धरणे आंदोलनादरम्यान पत्रपरिषदेत केली. गांधी चौकात जिल्हा किसान मजदूर काँग्रेस, शहर जिल्हा काँग्रेस व काँग्रेसच्या फ्रंटल संघटनेच्या वतीने दिवसभर धरणे आंदोलन केले. आंदोलनात राहूल पुगलिया, मनपाचे गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रशांत दानव, जि.प. सदस्य शिवचंद काळे, गोदरू जुमनाके, देवेंद्र बेले, प्रवीण पडवेकर, माजी जि.प. सदस्य अविनाश जाधव, रामभाऊ टोंगे, अ‍ॅड. अविनाश ठावरी, अ‍ॅड. अरुण धोटे, गंगाधर वैद्य, ओमेश्वर पद्मगीरीवार, रोशनलाल बिट्टू, वसंत मांढरे, नासीरखान, अनेकश्वर मेश्राम, माजी जि.प. सदस्य विनोद अहीरकर, साईनाथ बुच्चे, देवेंद्र गहलोत, अनु दहेगावकर आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.