शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

एकजुट काँग्रेस-राष्ट्रवादीची, पण विजय भाजपचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:02 IST

२०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार मितेशकुमार भांगडिया यांनी अत्यल्प संख्याबळ असताना २०० मतांच्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहुल पुगलिया यांचा पराभव केला होता.

चंद्रपूर : चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदार संघाची निवडणूक जिंकून भाजपला गड राखण्यात यश आले खरे, परंतु एकतर्फी निवडणुकीचे चित्र असताना भाजपला विजयासाठी चांगलीच कसरत करावी लागली. दोन्ही उमेदवारांत केवळ ३७ मतांचा फरक बघता या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, अन्य पक्ष व अपक्षांची एकजुट झाल्याचे दिसून येते. आणि ही एकजुट आगामी निवडणुकांसाठी भाजपला धोक्याची घंटाच आहे.२०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार मितेशकुमार भांगडिया यांनी अत्यल्प संख्याबळ असताना २०० मतांच्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहुल पुगलिया यांचा पराभव केला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. या निवडणुकीत काँग्रेसने संख्याबळ कमी असताना ४९१ मतांपर्यंत मजल मारली.या मतदार संघात भाजप ४८३, शिवसेना ४५, काँग्रेस २४९, राष्ट्रवादी काँग्रेस ७१ आणि अपक्ष व इतर पक्ष मिळून २११ असे एकूण १०५९ मतदार होते. मतांच्या आधारे भाजपचेच पारडे जड होते. भाजपचे सर्व आघाड्यांवरील नियोजन बघता मोठ्या फरकाने भाजपा उमेदवार विजयी होतील, असे चित्र होते. निकालाअंती भाजप उमेदवार रामदास आंबटकर यांना ५२८ आणि काँग्रेस उमेदवार इंद्रकुमार सराफ यांना ४९१ मते मिळाली. केवळ ३७ मतांचा फरक विचारात घेता या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने कडवी झुंज दिल्याचे स्पष्ट झाले. भाजपकडून रामदास आंबटकर यांच्या नावावर काही महिन्यांपूर्वीच शिक्कामोर्तब झाले होते. काँग्रेसची खेळी जाणून घेण्यासाठी भाजपने अखरेच्या क्षणापर्यंत उमेदवाराचे नाव गुप्त ठेवले होते. काँग्रेस गोटात मात्र उमेदवाराचीच वानवा होती. मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होतो, या पुर्वानुभवाच्या आधारे काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास दमदार उमेदवार पुढे येण्यास कचरत होता. ही बाब हेरून भाजपने संघाचे सक्रिय कार्यकर्ते रामदास आंबटकर यांच्या नावावर बाजी लावली.इकडे काँग्रेस नेते उमेदवाराच्याच शोधात होते. नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या काही तासांपूर्वी काँग्रेसने अपक्ष म्हणून नामांकन दाखल करायला आलेल्या इंद्रकुमार सराफ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदMaharashtraमहाराष्ट्र