शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

दोन राज्यांच्या वादात शासनाच्या निधीचा चुराडा

By admin | Updated: March 16, 2016 08:35 IST

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील १४ गावांत दोन्ही राज्याची विकास यंत्रणा काम करीत आहे.

शंकर चव्हाण  जिवतीतेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील १४ गावांत दोन्ही राज्याची विकास यंत्रणा काम करीत आहे. येथील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना निवाऱ्याची सोय व्हावी, यासाठी केंद्र शासनाकडून घरकूल योजना राबविली जात आहे. मात्र या वादग्रस्त १४ गावातील नागरिक दोन्ही राज्याच्या वादात केंद्र शासनाच्या निधीचा लुटमार करीत असल्याचा गंभीर प्रकार गेल्या अनेक वर्षापासून येथे सुरू आहे. मात्र संबंधीत विभाग अजूनही झोपेतच आहे.वादग्रस्त १४ गावांचा वाद गेल्या २० वर्षापासून सुरू आहे. या ठिकाणी दोन्ही राज्याची विकास यंत्रणा राबत असून नागरिकही दोन्ही राज्याच्या योजनेचा फायदा घेण्यात मागे येत नाही. त्यासाठी भरमसाठ निधीही शासनाचा खर्च होतो आणि याच नागरिकांवर केंद्र शासनही खर्च करतो. दोन्ही राज्याचा वाद आहे, निधी खर्च होतो पण केंद्राचा काय, एकच लाभार्थी दोन्ही बाजुने लुटमार करतो, घरकुल एकच बांधतो आणि दोन घरकुलाचे बिल उचलतो, हा प्रकार गंभीर नाही का, राज्याच्या वादात केंद्र शासनाच्या निधीचा चुराडा होत नाही का, ही गगंभीर बाब आजपर्यंत कुठल्याच अधिकाऱ्यांच्या लक्षात आली नाही का, आली असेल तर मग त्या नागरिकांवर कार्यवाही का केली नाही, त्यात दलालाचा हात आहे का, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.यापूर्वी ‘लोकमत’ने काही गावांना भेटी देऊन ‘योजना दोन्ही राज्याच्या, घरकूल मात्र एकच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते. या वृत्ताची सखोल चौकशी झाल्यास घरकुल योजनेत झालेला गौडबंगाल उघडकीस येईल, असे वाटत होते. मात्र असे काहीच झाले नाही. स्थानिक दलालावर याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे दलालही मुजोर बनत लाभार्थ्यांना हाताशी धरून केंद्र शासनाच्या निधीची लुटमार करीत असल्याचा प्रकार संबंधित अधिकारी उघड्या डोळ्याने बघतात, पण काहीच करीत नाही. त्यामुळे शासनाच्या निधीचा चुराडा होत आहे.