शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

कॉलेज निवडणुकांचा पुन्हा वाजणार बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 14:20 IST

मागील दहा वर्षांपासून बंद असलेल्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका यावर्षापासून पुन्हा सुरु होणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणाईची जीएस (जनरल सेक्रेटरी) निवडणुकीची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.

ठळक मुद्देकॉलेज कॅम्पसमध्ये रंगणार निवडणुकीचे घमासान

रवी जवळेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दहा वर्षांपासून बंद असलेल्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका यावर्षापासून पुन्हा सुरु होणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणाईची जीएस (जनरल सेक्रेटरी) निवडणुकीची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. विद्यापीठाकडून महाविद्यालय प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयांना या निवडणुका घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीचे घमासान रंगणार असून कॉलेज कॅम्पसमध्ये प्रचाराचा धुरळा उडणार आहे.महाविद्यालयीन निवडणुकांमुळे तरुणांमध्ये नेतृत्वगुण विकसित होऊन समाजाला त्याचा फायदा होत असतो. भविष्यात चांगला प्रतिनिधी मिळणार असतोे. मात्र या निवडणुकांमध्ये वादावादीतून हिंसक वळण लागत असल्यामुळे मागील दहा वर्षांपासून विद्यापीठ प्रतिनिधी प्रत्यक्ष निवडणुका न घेता गुणवत्तेच्या निकषावर निवडला जात असे. मात्र, निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबतच्या विद्यापीठाच्या अनेक वर्षांच्या मागणीला राज्य शासनाने मान्यता दिली. त्यामुळे यंदा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेण्यात याव्यात, असे आदेश विद्यापिठाकडून अखेर देण्यात आले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी २३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत सहभागी उमेदवारांना अनामत रक्कम म्हणून ५० रुपये भरावे लागणार आहेत. याशिवाय तो मागील वर्षात सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण असणे हे निकष आहेत. विद्यार्थी परिषदेबरोबरच विद्या शाखेच्या प्रत्येक वर्षासाठी विद्यार्थी संख्येवर वर्ग प्रतिनिधीही निवडण्यात येणार असून आरक्षित जागा कोणत्या प्रवर्गातील असेल, हे मात्र जुलै अखेरपर्यंत विद्यापिठाकडून कळविण्यात येणार आहे.महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थी परिषदेवर एनसीसी, एनएसएस, क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाचा प्रत्येकी एक प्रतिनिधी नामनियुक्त करण्यात येईल. महाविद्यालयीन निवडणुकीवेळी वाद होतात, तरुणांमध्ये मारामारीच्या घटनाही घडत असतात. त्यामुळे राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी या निवडणुका रद्द केल्या होत्या. मात्र विद्यार्थ्यांतील नेतृत्व गुणाला चालना मिळावी, निवडणुक प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी राज्यशासनाने पुन्हा या निवडणुका सुरु करण्याचा निर्णय घेतला.मतदानातून निवडप्रत्येक महाविद्यालयातून एक अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी आणि आरक्षित प्रवर्गातील एक असे चार उमेदवार प्रत्यक्ष मतदान घेऊन निवडण्यात येणार आहेत. त्यामध्ये रितसर उमेदवारी अर्ज मागणी, छाननी, अंतिम यादी जाहीर करणे अशा प्रकारे निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानंतर फायनल झालेल्या व प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी दोन आठवडयांचा कालावधी देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मतदान चार तासात पूर्ण करुन निकाल त्वरित जाहीर करण्यात येईल. विजयी उमेदवाराचे नाव तत्काळ विद्यापिठाला कळविणे बंधनकारक आहे.अशी असणार आचारसंहितानिवडणुक काळामध्ये दोन आठवडे आचारसंहिता लागू होणार असून या कालावधीत उमेदवारांना प्रचारासाठी खर्चाची मर्यादा एक हजार रुपये असणार आहे. खर्चमर्यादाओलांडली अथवा ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त फलक लावले तर तो आचारसंहितेचा भंग ठरेल. खर्चाचे विवरण उमेदवाराने स्वयंघोषणापत्राव्दारे सादर करायचे असून ही सर्व निवडणूक प्रक्रिया प्राचार्य अथवा नेमण्यात आलेल्या प्राध्यापकांमार्फत राबवण्यात येणार आहे.

महाविद्यालयीन निवडणुकांमधून नेतृत्व तयार होते. त्यामुळे ही प्रक्रिया नव्या पिढीसाठी अत्यंत फायद्याची आहे. देशाचे मोठे नेते अशाच निवडणुकांमधून तयार झाले आहेत. मात्र शासनाने ही प्रक्रिया बंद करून नेतृत्व निर्माण होणेच बंद केले होते. आता पुन्हा कॉलेजात विद्यार्थी परिषदेच्या निवडणूक घेण्याचा निर्णय विद्यापिठाने घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत आहे.-समीन केने, बल्लारपूरमाजी सिनेट सदस्य

टॅग्स :collegeमहाविद्यालय