शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

कोल ब्लाॅक प्रकरणात जिल्हाधिकारी पोहोचले टाकळी गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:30 IST

भद्रावती : तालुक्यातील मौजा टाकळी-बेलोरा-जेना येथे अरबिंडो कंपनीने गावकऱ्यांशी केलेली फसगत करून सर्वेक्षणामार्फत स्वाक्षरी केल्याचा प्रकार केल्याने अरबिंडो कंपनीचा ...

भद्रावती : तालुक्यातील मौजा टाकळी-बेलोरा-जेना येथे अरबिंडो कंपनीने गावकऱ्यांशी केलेली फसगत करून सर्वेक्षणामार्फत स्वाक्षरी केल्याचा प्रकार केल्याने अरबिंडो कंपनीचा प्रकल्प येथे नकोच असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. हे प्रकरण बघता जिल्हाधिकाऱ्यांनी टाकळी येथे गावकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधून गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच गावकऱ्यांनीसुद्धा आपल्या समस्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

अरबिंडो कंपनीला कोल ब्लॉक मिळाल्याने ही कंपनी चालू करण्यासाठी हालचाली चालू आहे. तसेच येथील सरपंच, उपसरपंच यांना विश्वासात घेऊन त्यांच्या लेटरपॅडच्या परवानगीने कंपनी गावातील नागरिकांना कोणतीही माहिती न देता भूसंपादनबाबात संपूर्ण अटी मान्य असल्याबाबतचे पत्र इंग्रजीमध्ये देऊन सर्वेक्षणाच्या माध्यमातून स्वाक्षऱ्या घेण्याचा प्रकार करून गावकऱ्यांची फसगत करण्यात येत होती. हा प्रकार बघता भाजप जिल्हा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांनी या प्रकाराची भद्रावती पोलीस, तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांना तक्रार केली. याबाबत तहसीलदार यांनीसुद्धा आपल्या कार्यालयात गावकऱ्यांसमक्ष अरबिंडो कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता ते याबाबत उत्तर देण्यास असमर्थ ठरले.

गावकऱ्याचा अरबिंडो कंपनीविरोधात रोष बघता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पीक सर्वेक्षणाच्या बाबत माहिती घेत असताना टाकळी गावाला भेट दिली. गावकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात जमिनीची किंमत, गावाचे पुनर्वसन पॉलिसी, रोजगाराचा प्रश्न हे प्रमुख तीन प्रश्न निकाली काढावे, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा अरबिंडो कंपनीने केलेले सर्वेक्षण चुकीचे असल्याचे सांगितले तसेच येतील तीनही गावकऱ्यांच्या ग्रामसभेत झालेल्या निर्णयानुसार कंपनीला अनुमती देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

250921\img_20210925_173229.jpg

टाकळी येथे जिल्हाधिकार्‍यांनी साधना गावकऱ्यांशी संवाद