शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:24 PM

ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रामीण परिक्षेत्रांतर्गत येणाºया मुडझा, हळदा, आवळगाव, पद्मापूर-भूज, या गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

ठळक मुद्देकर्मचाºयांचा हलगर्जीपणा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रामीण परिक्षेत्रांतर्गत येणाºया मुडझा, हळदा, आवळगाव, पद्मापूर-भूज, या गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. एकीकडे विजेचा लपंडाव सुरू असतानाही दुसरीकडे मात्र कंबरडे मोडणाºया वीज बिलामुळे नागरिक हैराण झाले आहेत.हळदा, मुडझा, पद्मापूर-भूज, बल्लारपूर ही गावे गांगलवाडी येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात समाविष्ट आहेत. येथून या गावांना विद्युत पुरवठा होत असतो. मात्र येथील कर्मचाºयांच्या लेटलतिफीमुळे व दुर्लक्षामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, या परिसरातील लोकांना अजूनही आपल्या परिसरातील विद्युत सहायक कोण, याची साधी माहितीही नाही. एखादा ग्राहक गांगलवाडी येथे आपली समस्या घेवून गेल्यास कुठलेतरी कारण समोर ठेवून समस्यांचे निराकरण करण्यास टाळाटाळ केली जाते. प्रत्येक विद्युत सहायकाला वेगवेगळी गावे दिलेली आहेत. मात्र हे विद्युत सहायक फक्त वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करायचा असेल तरच येतात. अशा चर्चा गावकºयात आहेत. या विद्युत सहायकांना अधिकाºयांचा कुठलाच धाक नसल्याने परिसरातील विद्युत सेवेचे तीन तेरा वाजले आहे.त्याचप्रमाणे रात्रीच्या सुमारास कमी दाबाची वीज राहत असल्याने घरातील पंखेसुद्धा बंद असल्याची ओरड सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतानाच वीज बिले अवाढव्य वाढून येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले असल्याचा सुर आहे. या समस्येचा फटका मात्र वीज ग्राहकांना बसत असताना याकडे विद्युत वितरण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची ओरड आहे.