शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
7
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
8
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
9
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
10
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
11
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
12
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
14
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
16
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
17
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
18
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
19
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
20
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

कोरोनामुक्तीसाठी नागरिकांनी घ्यावी खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 5:00 AM

एरवी तीन महिने आणि त्यातही ब्रह्मपूरी व सिंदेवाही या दोन्ही तालुक्यांना कोरोनाने धडक देऊनही नागभीड शहर कोरोनापासून दूर होते. मात्र ७ जून रोजी तालुक्यातील ४ व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल एकाचवेळी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ माजली. अहवाल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीच्या हालचाली करून संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या.

ठळक मुद्दे६० व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह, मात्र कोरोनापासून होणारा धोका अद्याप टळला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या तालुक्यातील सर्व ६० व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला. मात्र, कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही. यापुढेही तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी खबरदारी व जबाबदारी प्रत्येकालाच पार पाडावी लागणार आहे.एरवी तीन महिने आणि त्यातही ब्रह्मपूरी व सिंदेवाही या दोन्ही तालुक्यांना कोरोनाने धडक देऊनही नागभीड शहर कोरोनापासून दूर होते. मात्र ७ जून रोजी तालुक्यातील ४ व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल एकाचवेळी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ माजली. अहवाल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीच्या हालचाली करून संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या. रूग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची यादी तयार करून त्यांना संस्थात्मक अलगीकरण केले. रूग्ण ज्या भागात राहत होता तो संपूर्ण परिसर सील करण्यात आला. कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने नागभीड नगर परिषदेच्या वतीने ३६ तासांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनला नागरिकांनी प्रतिसाद दिला. ४ रूग्णांच्या संपर्कात कोण आणि किती व्यक्ती आले आहेत, याचे सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून करण्यात आले. या ४ रूग्णांच्या संपर्कात एकूण ६० व्यक्ती आल्याचे स्पष्ट होताच त्यांना विलगीकरण करून तपासणीसाठी स्कॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.या ६० व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल शुक्रवारी आरोग्य विभागास प्राप्त झाल. सर्व नमुने निगेटिव्ह आल्याले एका मोठ्या संकटातून तालुक्याची तुर्त सुटका झाली आहे. त्या ४ रूग्णांच्या संपर्कात आलेल्या ६० व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले म्हणून सगळाच धोका संपला असे मुळीच नाही. त्यामुळे खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य प्रशासनाने दिल्या आहेत.पावसाळ्यात समस्या वाढण्याची शक्यतारोजच परराज्य व परजिल्ह्यातील रेडझोनमधून येणाऱ्या नागरिकांची संख्या बरीच आहे. बाहेरून येणाºया व्यक्तींची माहिती प्रशासनाला कळविणे हे स्थानिक नागरिकांचे कर्तव्य काम आहे. अशा व्यक्तींना नियमानुसार अलगीकरणात ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत: आणि कुटुंबाची खबरदारी घेतली पाहिजे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या