शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

राजुरा तालुक्यातील दहा गावात नागरिकांनी केली गावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

प्रकाश काळे। लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. १४ एप्रिलपर्यंत राज्यात ...

ठळक मुद्देगो कोरोना : गावात याल तर खबरदार; बाहेरील व्यक्तींना तंबी

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. १४ एप्रिलपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर राजुरा तालुक्यातील पाच गावांमध्ये नागरिकांनी गावातील मुख्य रस्ताच सील करून गावबंदी केली आहे.राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाटयाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या, जिल्ह्याच्या तसेच आता गावाच्या सीमा नागरिकांनी सील केल्या आहेत. राजुरा तालुक्यातील पाचगाव, भेंडवी, चंदनवाही, मंगी, पांढरपौनी, कळमना, सोनापूर, सालेगुडा, रेंगेगुडा, गोपालपूर या गावातील गावकऱ्यांनी मुख्य रस्त्या पूर्णत: बंद केल्याने बाहेरील व्यक्ती येऊ शकत नाही. चुकून बाहेरील व्यक्ती गावात आला तर त्याला दुरूनच विचारपूस करून गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांना विचारून योग्य चौकशी करूनच प्रवेश दिला जातो. यासाठी गावातील युवक दुरूनच बाहेरून आलेल्या व्यक्तीवर पाळत ठेऊन असतात. नागरिकांनी गावबंदी केल्यामुळे बाहेरून आलेल्या व्यक्तींची चांगलीच पंचाईत झाली आहे. मौजा पाचगाव येथे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत पाचगावच्या वतीने तहसीलदार रवींद्र होळी यांची परवानगी घेऊन गावातील मुख्य रस्ते बंद करण्यात आले.प्रत्येक दुकानदारांना जिल्हा व तालुका प्रशासनाने आदेश पत्र देऊन दुकानातून खर्रा, गुटखा व कोल्ड्रिंक विकू नये, जर कोणी विकताना आढळल्यास त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्यात येईल, अशी ताकीद करण्यात आले.तसेच गावातील मुख्य चौकामध्ये कुणीही गर्दीने बसू नये, कलम १४४ नुसार संचारबंदी लागू आहे. या कायद्याचे पालन नागरिकांनी करावे, असे पत्रक ग्रामपंचायतीच्या वतीने गावात लावण्यात आले आहे.या नियमांचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकही कोरोनासारख्या महाभयानक रोगाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले असून राजुरा तालुक्यातील गावागावात बाहेरील व्यक्तीसाठी गावबंदी करण्यात आली आहे.सावरगाव परिसरातील अनेक गावात प्रवेश बंदीसावरगाव : संपूर्ण भारत देशात कोविड -१९ चा वाढता प्रकोप बघता आणि कुणालाही कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये. यासाठी खबरदारी म्हणून नागभीड तालुक्यातील सावरगाव परिसरातील अनेक गावात प्रवेश बंदीचे आवाहन करण्यात आले. कोविड -१९ कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला मृत्यूच्या कवेत कवटाळले असताना आता भारतातही या विषाणूने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. याची पूर्व खबरदारी म्हणून भारत सरकारने संपूर्ण देशाला लॉकडाऊन करण्याची घोषणा २४ मार्चच्या रात्रीला केली. आणि तसे आदेश सोडले. दरम्यान सर्वांना घरी राहण्याबाबत सक्ती केली जात आहे. विविध माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. या अनुषंगाने सावरगाव परिसरातील कन्हाळगाव (सोनुली), सावरला आदी गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgram panchayatग्राम पंचायत