शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा तालुक्यातील दहा गावात नागरिकांनी केली गावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

प्रकाश काळे। लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. १४ एप्रिलपर्यंत राज्यात ...

ठळक मुद्देगो कोरोना : गावात याल तर खबरदार; बाहेरील व्यक्तींना तंबी

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. १४ एप्रिलपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर राजुरा तालुक्यातील पाच गावांमध्ये नागरिकांनी गावातील मुख्य रस्ताच सील करून गावबंदी केली आहे.राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाटयाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या, जिल्ह्याच्या तसेच आता गावाच्या सीमा नागरिकांनी सील केल्या आहेत. राजुरा तालुक्यातील पाचगाव, भेंडवी, चंदनवाही, मंगी, पांढरपौनी, कळमना, सोनापूर, सालेगुडा, रेंगेगुडा, गोपालपूर या गावातील गावकऱ्यांनी मुख्य रस्त्या पूर्णत: बंद केल्याने बाहेरील व्यक्ती येऊ शकत नाही. चुकून बाहेरील व्यक्ती गावात आला तर त्याला दुरूनच विचारपूस करून गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांना विचारून योग्य चौकशी करूनच प्रवेश दिला जातो. यासाठी गावातील युवक दुरूनच बाहेरून आलेल्या व्यक्तीवर पाळत ठेऊन असतात. नागरिकांनी गावबंदी केल्यामुळे बाहेरून आलेल्या व्यक्तींची चांगलीच पंचाईत झाली आहे. मौजा पाचगाव येथे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत पाचगावच्या वतीने तहसीलदार रवींद्र होळी यांची परवानगी घेऊन गावातील मुख्य रस्ते बंद करण्यात आले.प्रत्येक दुकानदारांना जिल्हा व तालुका प्रशासनाने आदेश पत्र देऊन दुकानातून खर्रा, गुटखा व कोल्ड्रिंक विकू नये, जर कोणी विकताना आढळल्यास त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्यात येईल, अशी ताकीद करण्यात आले.तसेच गावातील मुख्य चौकामध्ये कुणीही गर्दीने बसू नये, कलम १४४ नुसार संचारबंदी लागू आहे. या कायद्याचे पालन नागरिकांनी करावे, असे पत्रक ग्रामपंचायतीच्या वतीने गावात लावण्यात आले आहे.या नियमांचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकही कोरोनासारख्या महाभयानक रोगाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले असून राजुरा तालुक्यातील गावागावात बाहेरील व्यक्तीसाठी गावबंदी करण्यात आली आहे.सावरगाव परिसरातील अनेक गावात प्रवेश बंदीसावरगाव : संपूर्ण भारत देशात कोविड -१९ चा वाढता प्रकोप बघता आणि कुणालाही कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये. यासाठी खबरदारी म्हणून नागभीड तालुक्यातील सावरगाव परिसरातील अनेक गावात प्रवेश बंदीचे आवाहन करण्यात आले. कोविड -१९ कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला मृत्यूच्या कवेत कवटाळले असताना आता भारतातही या विषाणूने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. याची पूर्व खबरदारी म्हणून भारत सरकारने संपूर्ण देशाला लॉकडाऊन करण्याची घोषणा २४ मार्चच्या रात्रीला केली. आणि तसे आदेश सोडले. दरम्यान सर्वांना घरी राहण्याबाबत सक्ती केली जात आहे. विविध माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. या अनुषंगाने सावरगाव परिसरातील कन्हाळगाव (सोनुली), सावरला आदी गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgram panchayatग्राम पंचायत