शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवर विदर्भाच्या मिरचीतोड मजुरांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:48 IST

हाताला काम नाही : कुटुंबासह मजूर निघाले तेलंगणाकडे

लोकमत न्यूज नेटवर्क गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यात वर्धा, अंधारी, वैनगंगा या मोठ्या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. तालुक्यातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. धान कापणीनंतर आता कापूस वेचणी झाली. तालुक्यात उद्योग नसल्याने तरुणांच्या हाताला काम नाही. पोट भरण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यासह, गडचिरोली जिल्ह्यातील मजूर मिरची तोडण्यासाठी तेलंगणा, आंध्र प्रदेशकडे जातात. गोंडपिपरी तालुक्यातील बहुतांश गावातील प्रत्येक गावातून किमान ५० मजूर मिरची तोडण्यासाठी तेलंगणा आंध प्रदेशकडे रवाना झाले आहेत. अशातच महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवरील पोडसा येथील पुलावर विदर्भाच्या मजुरांचे हाल होत आहेत. त्यांची मोठ्या प्रमाणात तेलंगणाच्या ऑटोचालकांकडून लूट केली जात असल्याचा संतापजनक प्रकार पोडसा येथे सुरू आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकांचे केवळ शेतीवरच जीवनमान अवलंबून आहे. तालुक्यात तीन बारमाही नद्या वाहात असताना बळीराजा अजूनही शाश्वत शेतीपासून दूर आहे. कोट्यवधी रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या सोनापूर टोमटा, किरमिरी दरुर दोनही सिंचन योजना रखडलेल्या आहेत. योजनेचे पाणी कधी मिळणार हा प्रश्न बळीराजा विचारत आहे. 

तालुक्यात सिंचनाची व्यवस्था नाही. शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या. मात्र, शेकडो शेतकऱ्याची वीज कनेक्शनअभावी शेती संकटात आहे. शासनाने वीज कनेक्शन देणे बंद केले असून, सोलरसाठी पावले उचलली जात आहेत. मात्र, सोलर कंपनी सव्र्हिस व्यवस्थित नसल्याने ज्यांनी सोलर लावले अशा अनेक शेतकऱ्यांचे सोलर बिघडलेल्या अवस्थेत असून, तेही शेतकरी संकटात आहेत. अशातच शेती हंगाम झाला. आता हाताला काम नसल्याने पोट भरण्यासाठी तालुक्यातील गावा गावातील मजुरांचे लोंढे मिरची तोडण्यासाठी वरंगल, हैदराबाद, खमंग, ढोरनक्कल अशा ठिकाणी तेलंगणा आंध्र प्रदेश राज्यात जात आहे. 

तेलंगणा - महाराष्ट्र सीमा ही लागून असून, पोडसा या गोंडपिपरी तालुक्याच्या शेवटच्या गावापासून केवळ पंधरा किलोमीटर अंतरावर तेलंगणा येथील शिरपूर रेल्वे स्टेशन आहे. तिथे जाण्यासाठी मजूर खासगी वाहनाने जातात. मात्र, त्यांची वाट सीमेलगत असलेल्या पोडसा गावात तेलंगणातील ऑटोचालकांकडून अडवली जात आहे. मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी वाहनांवर तेलंगणात कारवाई केली जात असून, सीमेवरच आता ऑटोचालक त्यांची वाट अडवत आहेत.

महाराष्ट्रातील मजुरांचे वाहन अडवून करतात चालान अशावेळी तेलंगणात महाराष्ट्रातील खासगी वाहनांवर तेथील पोलिस व ऑटोचालक यांचे संगनमत असल्याने ऑटो चालकांकडून माहिती पुरवून त्या वाहनावर मोठी कारवाई केली जाते. आर्थिक दंड वसूल केला जात असल्याने महाराष्ट्रातील खासगी वाहनचालक तेलंगणात वाहन टाकायला घाबरतात. मात्र, तेलंगणातील शेकडो टी. एस. नंबर प्लेट असलेले वाहन खुलेआम अनधिकृतपणे मजुरांची वाहतूक महाराष्ट्रातून तेलंगणात करतात. अशावेळी महाराष्ट्रातील सीमेलगत असणारे पोलिस गप्प बसलेले आहेत. तेलंगणा येथील ऑटो चालकांकडून पोडसा पुलावर वाहन अडवून मजुरांकडून तिकिटाचे अवाढव्य पैसे वसूल करत असल्याने गोंडपिंपरी तालुक्यासह विदर्भातील मिरची तोडण्यासाठी जाणाऱ्या मजुरांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर