शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रसायनयुक्त पाण्याने शेकडो मासोळ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 05:00 IST

कोलारी येथे सीऑन ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर  लिमिटेड  ही सोयाबीन तेल बनविणारी कंपनी आहे. कोलारी ते मेंढेगाव या रस्त्यावर कंपनीस्थित असून या कंपनीच्या बाजूला कोलारी नदी वाहते. या नदीमध्ये या कंपनीचे रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे हजारो मासोळ्यांचा व इतर जलचर प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे. तसेच चार शेतकऱ्यांची शेती बाधित झालेली आहे. या कोलारी नदीवर दोन कंपन्या स्थित असून या कंपन्यांचे पाणी या नदीला सोडण्यात येते.

अमोद गौरकरलोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : येथून जवळच असलेल्या कोलारी येथील नदीमध्ये कंपनीने रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे हजारो मासोळ्यांचा तथा जलचर प्राण्यांचा मृत्यू झाला. तसेच चार शेतकऱ्यांची धानशेती बाधित झालेली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र याची तक्रार घेण्यास चिमूर तालुक्यातील एकही अधिकारी तयार नाही. त्यामुळे शेतकरी हतबल बनले आहेत.             कोलारी येथे सीऑन ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर  लिमिटेड  ही सोयाबीन तेल बनविणारी कंपनी आहे. कोलारी ते मेंढेगाव या रस्त्यावर कंपनीस्थित असून या कंपनीच्या बाजूला कोलारी नदी वाहते. या नदीमध्ये या कंपनीचे रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे हजारो मासोळ्यांचा व इतर जलचर प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे. तसेच चार शेतकऱ्यांची शेती बाधित झालेली आहे. या कोलारी नदीवर दोन कंपन्या स्थित असून या कंपन्यांचे पाणी या नदीला सोडण्यात येते. ही नदी बारमाही असून समोर जाऊन वैनगंगा या मोठ्या नदीला जोडली जाते. सीऑन कंपनीने रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे पाणी प्रदूषित झालेले असून संपूर्ण नदीचे पाणी हे पांढरे झालेले आहे. तसेच या पाण्यावर रसायनयुक्त साय तरंगताना दिसत आहे. 

पिकांचे सिंचन कसे करणार?या नदीवर शेकडो शेतकरी अवलंबून असून या नदीचे पाणी शेतीपिकाला देण्यात येते. परंतु हे रसायनयुक्त पाणी असल्यामुळे आता शेतीपिकालाही  पाणी शेतकरी देऊ शकत नाहीत. यात प्रामुख्याने सागर दिलीप गावंडे, बाबा श्रीकृष्ण गावंडे, दुर्वेश पुंडलिक गावंडे व इतर शेतकऱ्यांच्या धानशेतीत हे रसायनयुक्त पाणी गेल्यामुळे पूर्ण धानपीक नष्ट झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांची हजारो रुपयांची पिके नष्ट झाल्यामुळे ते आर्थिक विवंचनेत आहेत. याबाबत शेतकरी कंपनीकडे तक्रार दाखल करण्यास गेले असता त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. यासोबतच शंकरपूर येथील पोलीस चौकी, चिमूर येथील तहसीलदार यांनीसुद्धा ही तक्रार घेतलेली नाही. याबाबत मात्र कृषी विभागाने तक्रार दाखल करून घेतलेली आहे. 

कंपनीमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसविले असून पाणी शुद्ध करूनच प्रथम  आम्ही आमच्या जमिनीवर सोडत असतो आणि त्यानंतर हे पाणी नदीमध्ये जात असते. पाऊस आल्याने  थोडेफार काही  रासायनिक अंश गेले असल्याने मासोळ्यांचा व इतर जलचर प्राण्यांचा मृत्यू झाला असावा. सुधारणा करून शुद्ध पाणी नदीला कसे जाईल, याचा प्रयत्न करणार आहे. - एस. एन. म्हस्के, व्यवस्थापक, सीऑन कंपनी, कोलारी.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प