शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कर थकबाकीने चंद्रपूरची पाणीपुरवठा योजना कोलमडण्याच्या मार्गावर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 11:47 IST

पाणीकर भरण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष : महापालिकेवर आर्थिक भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : महानगरपालिकेने शहरातील सर्व नळजोडणीवर जलमापक (मीटर) लावले. जानेवारी महिन्यापासून प्रत्यक्ष वापर सुरू आहे. मात्र घरपोच पाणी मिळत असूनही नागरिक पाणीकर भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे थकबाकी वाढली. नागरिकांनी मनपाला सहकार्य केले नाही तर ही योजना कोलमडून अन्य सोई- सुविधांवरही अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चंद्रपूरला इरई नदी व धरणावरून पाण्याची उचल केली जाते. रामनगर व तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया करून १६ जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा होतो. शहराची गरज पाहता सध्या ४२ दशलक्ष लीटर पाण्याचे वाटप मनपाद्वारे दररोज सुरू आहे. अमृत योजना सुरू होण्यापूर्वी शहरात ३५ हजार अधिकृत नळ कनेक्शन होते. अमृत योजनेअंतर्गत वाढ होऊन ६२ हजारपर्यंत झाले. काही नळांना पाणी कमी येणे किंवा प्रेशर कमी येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. तपासणीनंतर, उगाच नळ सुरू ठेवणे, वाहने धुण्यास वापर करणे, अशा निष्काळजीपणाने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले. 

१४ टक्के नळजोडणीधारकांनीच भरला पाणीकर५० हजार ८९१ घरी मनपाद्वारे आतापर्यंत मीटर लावण्यात आले. यापैकी केवळ १४ टक्के नळजोडणी धारकांनीच पाणीकराचा भरणा केला. त्यामुळे प्रामाणिकपणे करभरणा करणाऱ्या नागरिकांचे नुकसान होत आहे. अप्राप्त देयकांमुळे संपूर्ण पाणी पुरवठा योजना तोट्यात जाण्याची शक्यता आहे. काही नागरिकांचे देयक हे शून्य रुपये आले. हे तेव्हाच शक्य असते जेव्हा मीटरला लागून असलेला पाइप काढला जातो. ज्यामुळे पाण्याचा वापर करताना मीटर बंद असते. बिल रीडिंग अतिशय कमी येते किंवा शून्य येते. पाणी मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या नागरिकांचा पुरवठा बंद व दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मनपाने दिला आहे. 

नागरिकांच्या आग्रहाखातरच बसविले घरोघरी मीटर

  • सर्वांना आवश्यक ते पाणी मिळावे यासाठी पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक होते. 
  • मीटर लावण्यापूर्वी नळ जोडणीधारकांकडून सरसकट वार्षिक पाणीपट्टी कर घेतला जात होता. तो सर्वांना सारखाच लागू होता. त्यामुळे पाण्याचा किती वापर प्रत्ये- काकडून केला जातो. याचा अंदाज बांधणे कठीण होते. 
  • अखेर नागरिकांच्या आग्रहाखातर 'पाण्याचा जेवढा वापर तेवढेच देयक' या सूत्रानुसार मनपाकडून घरोघरी मीटर बसविण्यात आले.

"पाणी कराची थकबाकी वाढली. त्यामुळे पाणी पुरवठ्याचा खर्च मालमत्ता कर व इतर उत्पन्नातून भागवावा लागतो. नागरिकांनी पाणी कर भरला नाही तर कराच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या अन्य सुविधांवर वाईट परिणाम होऊ शकतो. थकबाकी वाढतच राहिली तर ही योजना चालविणे शक्य होणार नाही. त्यामुळे नळजोडणीधारकांनी पाणीकर प्रामाणिकपणे भरावा. कुठे मीटर बंद करून पाणी वापर होत असेल तर तसे मनपाला कळवावे." -विपीन पालीवाल, आयुक्त मनपा

टॅग्स :water transportजलवाहतूकchandrapur-acचंद्रपूर