शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

कर थकबाकीने चंद्रपूरची पाणीपुरवठा योजना कोलमडण्याच्या मार्गावर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 11:47 IST

पाणीकर भरण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष : महापालिकेवर आर्थिक भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : महानगरपालिकेने शहरातील सर्व नळजोडणीवर जलमापक (मीटर) लावले. जानेवारी महिन्यापासून प्रत्यक्ष वापर सुरू आहे. मात्र घरपोच पाणी मिळत असूनही नागरिक पाणीकर भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे थकबाकी वाढली. नागरिकांनी मनपाला सहकार्य केले नाही तर ही योजना कोलमडून अन्य सोई- सुविधांवरही अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चंद्रपूरला इरई नदी व धरणावरून पाण्याची उचल केली जाते. रामनगर व तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया करून १६ जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा होतो. शहराची गरज पाहता सध्या ४२ दशलक्ष लीटर पाण्याचे वाटप मनपाद्वारे दररोज सुरू आहे. अमृत योजना सुरू होण्यापूर्वी शहरात ३५ हजार अधिकृत नळ कनेक्शन होते. अमृत योजनेअंतर्गत वाढ होऊन ६२ हजारपर्यंत झाले. काही नळांना पाणी कमी येणे किंवा प्रेशर कमी येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. तपासणीनंतर, उगाच नळ सुरू ठेवणे, वाहने धुण्यास वापर करणे, अशा निष्काळजीपणाने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले. 

१४ टक्के नळजोडणीधारकांनीच भरला पाणीकर५० हजार ८९१ घरी मनपाद्वारे आतापर्यंत मीटर लावण्यात आले. यापैकी केवळ १४ टक्के नळजोडणी धारकांनीच पाणीकराचा भरणा केला. त्यामुळे प्रामाणिकपणे करभरणा करणाऱ्या नागरिकांचे नुकसान होत आहे. अप्राप्त देयकांमुळे संपूर्ण पाणी पुरवठा योजना तोट्यात जाण्याची शक्यता आहे. काही नागरिकांचे देयक हे शून्य रुपये आले. हे तेव्हाच शक्य असते जेव्हा मीटरला लागून असलेला पाइप काढला जातो. ज्यामुळे पाण्याचा वापर करताना मीटर बंद असते. बिल रीडिंग अतिशय कमी येते किंवा शून्य येते. पाणी मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या नागरिकांचा पुरवठा बंद व दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मनपाने दिला आहे. 

नागरिकांच्या आग्रहाखातरच बसविले घरोघरी मीटर

  • सर्वांना आवश्यक ते पाणी मिळावे यासाठी पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक होते. 
  • मीटर लावण्यापूर्वी नळ जोडणीधारकांकडून सरसकट वार्षिक पाणीपट्टी कर घेतला जात होता. तो सर्वांना सारखाच लागू होता. त्यामुळे पाण्याचा किती वापर प्रत्ये- काकडून केला जातो. याचा अंदाज बांधणे कठीण होते. 
  • अखेर नागरिकांच्या आग्रहाखातर 'पाण्याचा जेवढा वापर तेवढेच देयक' या सूत्रानुसार मनपाकडून घरोघरी मीटर बसविण्यात आले.

"पाणी कराची थकबाकी वाढली. त्यामुळे पाणी पुरवठ्याचा खर्च मालमत्ता कर व इतर उत्पन्नातून भागवावा लागतो. नागरिकांनी पाणी कर भरला नाही तर कराच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या अन्य सुविधांवर वाईट परिणाम होऊ शकतो. थकबाकी वाढतच राहिली तर ही योजना चालविणे शक्य होणार नाही. त्यामुळे नळजोडणीधारकांनी पाणीकर प्रामाणिकपणे भरावा. कुठे मीटर बंद करून पाणी वापर होत असेल तर तसे मनपाला कळवावे." -विपीन पालीवाल, आयुक्त मनपा

टॅग्स :water transportजलवाहतूकchandrapur-acचंद्रपूर