शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

३ महिन्यांपासून उंबरठे झिजवले पण पीक कर्ज नाही मिळाले; संतप्त शेतकऱ्यांनी बॅंकेला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2022 12:38 IST

जिल्हाधिकारी कार्यालय व जिवती तहसील कार्यालयाने पत्र देऊनही आदिवासी कोलाम बांधवांना पीक कर्ज मिळाले नाही.

जिवती (चंद्रपूर) : तालुक्यातील काकबन, भुरियेसापूर, टाटाकोहाड, सिंगारपठार, शेडवाही येथील वनहक्क पट्टेधारक पीक कर्जासाठी जिवती येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत तीन महिन्यांपासून उंबरठे झिजवत आहेत. पीक कर्ज देण्यात यावे, असे जिल्हाधिकारी कार्यालय व जिवती तहसील कार्यालयाने पत्र देऊनही आदिवासी कोलाम बांधवांना पीक कर्ज मिळाले नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी बुधवारी बॅंकेला कुलूप ठोकले. अखेर अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अफ्रोट संघटनेचे डॉ. मधुकर कोटनाके, श्रमिक एल्गारचे घनश्याम मेश्राम, बिरसा क्रांती दलाचे संतोष कुलमेथे यांच्या नेतृत्वात वनहक्कधारकांना घेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत पीक कर्ज मिळणार नाही, तोपर्यंत बँकेतून जाणार नाही, अशी भूमिका घेतल्याने बँकेच्या व्यवस्थापकाची तारांबळ उडाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना पाचारण केले. बँक व्यवस्थापकांनी चंद्रपूर येथील त्यांच्या अधिकाऱ्यांना फोन करून प्रकरणाचे गांभीर्य कळविले. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी जिवतीला येऊन प्रश्न सोडविण्याची तयारी दर्शविल्यामुळे कुलूपबंद आंदोलन मागे घेण्यात आले.

तीन महिन्यांपासून बँकेचे उंबरठे झिजवत असून, यात आमचे प्रचंड नुकसान झाले आहे. बँकेला स्टॅम्पपेपर, नादेय प्रमाणपत्र, सर्व कागदपत्रे देऊनसुद्धा पीक कर्ज दिले जात नाही. या बँकेने आमची आर्थिक लूट केली.

- पार्वता कांशीराम चाहकाटी, वनहक्क पट्टेधारक महिला

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँकFarmerशेतकरीagitationआंदोलन