शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
2
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
3
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू
5
“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
6
Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?
7
अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत
8
राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी
9
Buddha Purnima 2024: भगवान बुद्धांची प्रिय तिथी अर्थात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायला हवी ते जाणून घ्या!
10
मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
11
उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
12
Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट
13
त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
14
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
15
ऑनलाइन क्रशला भेटायला २४०० किमी दूर पोहचली युवती; त्यानंतर जे घडलं तिने डोक्याला हात लावला
16
पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल
17
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
18
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला
20
काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

सांगली-कोल्हापुरातील पुरग्रस्तांना चंद्रपुरातून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:45 AM

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने थैमान घातल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने सर्वत्र मदत पुरविली जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाच्या वतीने दोन ट्रक जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने थैमान घातल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने सर्वत्र मदत पुरविली जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाच्या वतीने दोन ट्रक जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले. १५ आॅगस्टला दोन्ही जिल्ह्यातील आपादग्रस्तांना साहित्य वितरण केल्या जाणार आहे, अशी माहिती माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अन्नधान्य, कपडे व घरातील जीवनोपयोगी साहित्य पुरात वाहून गेल्यामुळे उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे राज्यभरातून सर्वत्र मदतीचा ओघ सुरू आहे. विदर्भ किसान मजदूर कांँग्रेसच्या सर्व युनियन तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील जैन समाजाच्या वतीने पाच किलो तांदूळ, पाच किलो आटा, दोन किलो तूर डाळ, १ लिटर तेल, २ किलो साखर, तिखट, मीठ, हळद, जीरे, मेणबत्त्या, माचिस याससह सोलापूरी चादर व एक ब्लँकेट आदी साहित्याच्या ७५० किट्स तयार करण्यात आल्या. हे साहित्य १३ आॅगस्ट २०१९ रोजी रवाना करण्यात आले. दरम्यान, तेथील जिल्हा प्रशासनाच्या वतीने ज्या ठिकाणी हे साहित्य वितरण करण्यासाठी नगरसेवक अशोक नागापुरे व देवेंद्र बेले यांच्यासह कामगार संघटनेचे एक पथक १५ आॅगस्ट २०१९ रोजी साहित्य वितरण करणार आहे, अशी माहिती माजी खासदार पुगलिया यांनी दिली. पत्रकार परिषदेला विदर्भ किसान मजदूर काँग्रेस युनियनचे पदाधिकारी, काँग्रेस व जैन समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.मदत करण्याचे आवाहनकोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपाद्ग्रस्त नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येत आहे. विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन सेवा समितीच्या वतीने साहित्य पाठविण्यात आले. जिल्ह्यातील अन्य सामाजिक संस्था व संघटनांनीही मदत करावी, असे आवाहन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी यावेळी केले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर