शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सांगली-कोल्हापुरातील पुरग्रस्तांना चंद्रपुरातून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:45 IST

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने थैमान घातल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने सर्वत्र मदत पुरविली जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाच्या वतीने दोन ट्रक जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने थैमान घातल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने सर्वत्र मदत पुरविली जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाच्या वतीने दोन ट्रक जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले. १५ आॅगस्टला दोन्ही जिल्ह्यातील आपादग्रस्तांना साहित्य वितरण केल्या जाणार आहे, अशी माहिती माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अन्नधान्य, कपडे व घरातील जीवनोपयोगी साहित्य पुरात वाहून गेल्यामुळे उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे राज्यभरातून सर्वत्र मदतीचा ओघ सुरू आहे. विदर्भ किसान मजदूर कांँग्रेसच्या सर्व युनियन तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील जैन समाजाच्या वतीने पाच किलो तांदूळ, पाच किलो आटा, दोन किलो तूर डाळ, १ लिटर तेल, २ किलो साखर, तिखट, मीठ, हळद, जीरे, मेणबत्त्या, माचिस याससह सोलापूरी चादर व एक ब्लँकेट आदी साहित्याच्या ७५० किट्स तयार करण्यात आल्या. हे साहित्य १३ आॅगस्ट २०१९ रोजी रवाना करण्यात आले. दरम्यान, तेथील जिल्हा प्रशासनाच्या वतीने ज्या ठिकाणी हे साहित्य वितरण करण्यासाठी नगरसेवक अशोक नागापुरे व देवेंद्र बेले यांच्यासह कामगार संघटनेचे एक पथक १५ आॅगस्ट २०१९ रोजी साहित्य वितरण करणार आहे, अशी माहिती माजी खासदार पुगलिया यांनी दिली. पत्रकार परिषदेला विदर्भ किसान मजदूर काँग्रेस युनियनचे पदाधिकारी, काँग्रेस व जैन समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.मदत करण्याचे आवाहनकोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपाद्ग्रस्त नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येत आहे. विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन सेवा समितीच्या वतीने साहित्य पाठविण्यात आले. जिल्ह्यातील अन्य सामाजिक संस्था व संघटनांनीही मदत करावी, असे आवाहन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी यावेळी केले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर