शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-कोल्हापुरातील पुरग्रस्तांना चंद्रपुरातून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:45 IST

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने थैमान घातल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने सर्वत्र मदत पुरविली जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाच्या वतीने दोन ट्रक जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने थैमान घातल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने सर्वत्र मदत पुरविली जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाच्या वतीने दोन ट्रक जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले. १५ आॅगस्टला दोन्ही जिल्ह्यातील आपादग्रस्तांना साहित्य वितरण केल्या जाणार आहे, अशी माहिती माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अन्नधान्य, कपडे व घरातील जीवनोपयोगी साहित्य पुरात वाहून गेल्यामुळे उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे राज्यभरातून सर्वत्र मदतीचा ओघ सुरू आहे. विदर्भ किसान मजदूर कांँग्रेसच्या सर्व युनियन तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील जैन समाजाच्या वतीने पाच किलो तांदूळ, पाच किलो आटा, दोन किलो तूर डाळ, १ लिटर तेल, २ किलो साखर, तिखट, मीठ, हळद, जीरे, मेणबत्त्या, माचिस याससह सोलापूरी चादर व एक ब्लँकेट आदी साहित्याच्या ७५० किट्स तयार करण्यात आल्या. हे साहित्य १३ आॅगस्ट २०१९ रोजी रवाना करण्यात आले. दरम्यान, तेथील जिल्हा प्रशासनाच्या वतीने ज्या ठिकाणी हे साहित्य वितरण करण्यासाठी नगरसेवक अशोक नागापुरे व देवेंद्र बेले यांच्यासह कामगार संघटनेचे एक पथक १५ आॅगस्ट २०१९ रोजी साहित्य वितरण करणार आहे, अशी माहिती माजी खासदार पुगलिया यांनी दिली. पत्रकार परिषदेला विदर्भ किसान मजदूर काँग्रेस युनियनचे पदाधिकारी, काँग्रेस व जैन समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.मदत करण्याचे आवाहनकोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपाद्ग्रस्त नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येत आहे. विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन सेवा समितीच्या वतीने साहित्य पाठविण्यात आले. जिल्ह्यातील अन्य सामाजिक संस्था व संघटनांनीही मदत करावी, असे आवाहन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी यावेळी केले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर