शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur : एक घर गाडले गेले, १६९ कुटुंबे विस्थापित... तीन वर्षानंतरही वांझोट्या चर्चा अन् ढिम्म प्रशासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 18:40 IST

Chandrapur : नेत्यांचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करण्याचे आश्वासन फोल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अमराही वॉर्डातील भूस्खलनाच्या धक्कादायक घटनेला मंगळवारी (दि. २६) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. १६९ कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा अजूनही प्रश्न प्रशासनाकडून सोडविण्यात आला नाही. दुर्लक्षामुळे हा प्रश्न अद्याप अधांतरी असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

अमराही वॉर्डामध्ये २६ ऑगस्टच्या २०२२ रोजी सायंकाळी भूस्खलन होऊन एक घर जमिनीत गडप झाले होते. त्या परिसरातील अनेक जणांच्या भिंतींना तडे गेले. त्यामुळे १६९ कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. नेत्यांनी सुरक्षित स्थळी पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार महसूल विभागाने १६९ भूस्खलनग्रस्तांच्या पुनवर्सनाकरिता फेब्रुवारी महिन्यात वेकोलीच्या शिवनगरला लागून महसूल विभागाच्या सर्व्हे नं. २१/१ मधील सहा एकरांच्या भूखंडाची पाहणी केली होती. सीमांकन प्रक्रियेच्या हालचाली सुरु झाल्या. पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष झाले. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ते मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केल्याचे सांगितले. मात्र, या केवळ वांझोट्या चर्चा ठरल्याचा आरोप नागरिकांकडून केला आहे. 

नायब तहसीलदार म्हणाले...याबाबत नायब तहसीलदार डॉ. सचिन खंडाळे यांना विचारणा केली असता, भूस्खलनातील १६९ बाधितांना सहा एकर भुखंड मंजूर झाला. तो भूखंड खोलगट असल्याने माती टाकून सीमांकनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार होती. मात्र, माती न टाकल्याने प्रक्रिया थांबली. नियमांचा आधार घेऊनच कार्यवाही सुरू आहे. याबाबत उपविभागीय कार्यालयाकडे अहवाल पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

वेकोलिकडून अपेक्षाभंगखाण सुरक्षा निर्देशालय, भारत सरकार यांच्या सुचनेनुसार, घटनास्थळापासूनच्या ४०० बाय १५० मीटर परिसरातील १६० घरे खाली करण्यात आली होती. या जागेवर वावर करण्यास स्थानिकांवर प्रतिबंध घालण्यात आला. स्थलांतरित केलेल्या कुटुंबांना पुढील सुविधा होईपर्यंत भाडेतत्त्वावर घर घेऊन राहायचे आहे. त्यांच्या मासिक भाड्याची रक्कम व प्राथमिक गरजांसाठी आवश्यक निधी वेकोलि प्रशासनाकडून देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. 

केंद्रीय पथकाने केली होती पाहणीया घटनेचे शास्त्रीय कारण जाणून घेण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केंद्र शासनाच्या संबंधित विभागांशी संपर्क केला. खाण सुरक्षा निर्देशालयाचे संचालक सागेश कुमार, वेकोलिच्या तांत्रिक विभागाचे गुप्ता, भूविज्ञान व खनिकर्म विभागाचे उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, मध्य विभाग नागपूरचे वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी या जागेचे शास्त्रीय सर्वेक्षण व त्याची कारणमीमांसा आदी बाबी  तपशीलवार तपासून झाल्या होत्या.  

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरlandslidesभूस्खलन