शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

चंद्रपूर हिरव्या पाण्याचे प्रकरण; मच्छिमारांना अमलनाला तीरावरून हटण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 12:08 IST

तालुक्यातील माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अमलनाला धरणातील पाणी हिरवे झाल्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. निरीच्या चमूने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

ठळक मुद्देनिरीच्या चमूकडून पाहणी

चंद्रपूर : तालुक्यातील माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अमलनाला धरणातील पाणी हिरवे झाल्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. निरीच्या चमूने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. दरम्यान, धरणातील पाणी दूषित होऊ नये, यासाठी तिरावर शेड उभारून बसणाऱ्या मच्छिमारांना तेथून हटविण्याचे आदेश तहसीलदार रवींद्र होळी यांनी दिले आहेत.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूरचे मुख्य वैज्ञानिक जी.के. खडसे व चमूने धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. धरणाच्या तिरावर मासेमारी करणाऱ्यांनी शेड उभारले असल्याचे चमूच्या लक्षात आले.मासे कापल्यानंतर माश्यांचे आतडे व इतर घाण धरणात टाकण्यात येते. त्यामुळे शेवाळाला पोषण मिळत असून ते झपाट्याने वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. चमूतील सदस्यांच्या सांगण्यावरून राजुराचे तहसीलदार रवींद्र होळी यांनी मासेमाऱ्यांना तेथून हटविण्याचे आदेश दिले आहेत. मासेमाऱ्यांनी इतरत्र शेड उभारण्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही केल्या आहेत. तसेच पुढील आदेशापर्यंत जनावरांना धरणातील पाणी पाजू नये, अशा सूचना तहसीलदारांनी नोकारी (खु.), नोकारी (बु), बैलमपूर, मानोली (खु.) व जामणी येथील ग्रामपंचायतींना दिल्या आहे.पर्यटकांनी खबरदारी घेण्याची गरजधरणाच्या वेस्टवेअरवर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येतात. धरणाचे पाणी वेस्टवेअरवरून खाली उतरते. त्याला धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचा आनंद उपभोगण्यासाठी पर्यटक पाणी अंगावर घेतात. त्यामुळे त्वचारोग होऊ शकतो. म्हणून पर्यटकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण