शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

बारावीच्या निकालात नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा तृतीयस्थानी

By राजेश मडावी | Updated: May 5, 2025 15:55 IST

यंदा निकालाची टक्केवारी घसरली : जिल्ह्यात राजुरा तालुका अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी (दि. ५) जाहीर झाला. यात नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.१७ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा निकाल ९३.८९ टक्के लागला होता. यंदा त्यामध्ये ४. १७ टक्क्याने घट झाली आहे. 

इयत्ता बारावीच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण २७३८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी २७१९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण २४२४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची एकूण टक्केवारी ८९.१७ टक्के आहे.  जिल्ह्यात यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत.  परीक्षेला एकूण १३७६८ विद्यार्थी तर १३४२३ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. यापैकी ११७९८ विद्यार्थी व १२४४९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८५.६९ तर, मुलींची टक्केवारी ९२.७४ टक्के आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळांचा निकाल सरस आहे. राजुरा तालुका ९५. ४९ टक्के घेऊन जिल्ह्यातून टॉप ठरला आहे. चंद्रपूर ९३. ६७ टक्के, बल्लारपूर  ९०.०५ टक्के,  भद्रावती ७३.९२ टक्के, ब्रह्मपुरी ९१.२८ टक्के, चिमूर ६८.७३ टक्के, गोंडपिपरी ९२.३९ टक्के, कोरपना ९३.५५ टक्के, मूल ८४.९२, नागभीड ८५. ८७ टक्के, पोंभुर्णा ९०. ८७ टक्के, सावली ९३. ६५ टक्के, सिंदेवाही ८०.८५ टक्के, वरोरा ९०. ३८ टक्क तर जिवती तालुक्याचा निकाल ९३. ६९ टक्के लागला आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरEducationशिक्षण