शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भाव मिळत नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील दूध उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 14:46 IST

कोरपना तालुक्यातील नांदाफाटा, बिबी, गडचांदूर, बाखर्डी, वनसडी, लखमापूर, कोरपना व अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध उत्पादन सुरू केले आहे. मात्र दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या माथी निराशा आली आहे.

ठळक मुद्देजनावरांच्या खाद्याची किंमत गगनाला

लोकमत न्यूज नेटवर्कआशिष देरकरचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील नांदाफाटा, बिबी, गडचांदूर, बाखर्डी, वनसडी, लखमापूर, कोरपना व अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध उत्पादन सुरू केले आहे. मात्र दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या माथी निराशा आली आहे.डेअरीच्या माध्यमातून नांदाफाटा, गडचांदूर व कोरपना येथे दूध संकलन केंद्र उभारण्यात आलेले आहेत. या दूध संकलन केंद्रांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. किरकोळ पद्धतीने दूध विकण्यापेक्षा एकाच ठिकाणी संकलन केंद्रावर दूध विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा दारोदारी जाऊन दूध विक्रीकरिता होणारा त्रास कमी झाला. मात्र दूध संकलन केंद्रावर कवडीमोल भावात दुधाची खरेदी करीत असल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून हरियाणा, राजस्थान, गुजरात व इतर काही राज्यांमधून गाई व म्हशींची आयात केली. दुधाळ जनावरांमध्ये गुंतवणूक करून व्यवसाय करून अर्थक्षम होण्याचा शेतकऱ्यांचा मानस होता. मात्र सध्या परिस्थितीत अनेक दूध उत्पादकांना दुग्ध व्यवसाय करताना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. लाखो रुपये खर्चून दुधाळ जनावरे घेतल्यामुळे व्यवसाय तर बंद करता येत नाही, तर कमी नफ्यात कसातरी व्यवसाय चालवावा या आशेवर दूध उत्पादक शेतकरी सध्या परिस्थितीत जगत आहेदुग्ध व्यवसाय करताना दुधाळ जनावरांत सोबतच इतर अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक शेतकऱ्यांनी केली. विशेष म्हणजे शेतात जनावरांना चारा लावणे, दूध वाढण्यासाठी पोषक ठरणारे खाद्य खरेदी करणे, मजुरांना लागणारा खर्च, जनावरांसाठी शेड, पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, दूध काढणी यंत्र अशा अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक करावी लागली. त्यामुळे शेतकरी व्यवसाय तर बंद करू शकत नाही. मात्र मिळेल त्या किमतीमध्ये शेतकऱ्यांना समाधान मानण्याची वेळ आली आहे.घरोघरी जास्त किंमतीत विक्रीअनेक शेतकरी डेअरीमध्ये दुधाची विक्री न करता वैयक्तिक घरोघरी फिरून दुधाची विक्री करतात. त्याठिकाणी शेतकऱ्यांना म्हशीच्या दुधाला ६० ते ७० रुपये प्रति लिटर तर गाईच्या दुधाला ४० ते ५० रुपयापर्यंत प्रति लिटर भाव मिळतो तेच दूध डेअरीमध्ये विक्रीस नेल्यास कमीत कमी किंमत 23 रुपये आहे. अशावेळी शेतकरी उरलेले दूध डेअरीमध्ये विकत असल्याचे दिसून येते.शासनाने घ्यावी दखलएकीकडे शासन शेतकऱ्यांनी पयार्यी व्यवसाय करावा किंवा जोडधंदा करावा यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात. ज्या शेतकऱ्यांनी धोका पत्करून जोड व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला आहे अशा शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी शासनाने घेण्याची आवश्यकता आहे. कारण शेतकऱ्यांना अशाप्रकारचे संरक्षण न मिळाल्यास शेतकरी जोडधंद्याकडे किंवा पयार्यी व्यवसायाकडे वळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होऊ शकणार नाही. एकंदरीत त्याचा परिणाम देशाच्या विकासावर होतो. त्यामुळे शासनाने दूध उत्पादकांच्या समस्या निकाली काढून दुधाला जास्तीत जास्त भाव देण्याची गरज निर्माण झाली आहे.दूध विक्रेत्यांसाठी सिमेंट कंपन्या सोयीच्याकोरपना तालुक्यात अल्ट्राटेक, माणिकगड व अंबुजा येथील वस्त्यांमध्ये दुधाला प्रचंड मागणी आहे. परिसरातील अनेक गावातील दूध उत्पादक सिमेंट वस्त्यांमध्ये दूध विक्री करणे पसंत करतात. किरकोळ विक्रीमधून दूध उत्पादकाला जास्त नफा प्राप्त होतो. किरकोळ विक्रीतून मिळणाऱ्या किंमतीइतकाच भाव दूध उत्पादकांना शासनाकडून मिळावा अशी दूध उत्पादकांची मागणी आहे.जनावरांच्या खाद्याची किंमत गगनालादूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांच्या खाद्यावर विशेष लक्ष ठेवावे लागते. मात्र हे खाद्य महाग असल्याने तिथेही शेतकऱ्यांचे हाल आहे. यामध्ये जनावरांना लागणारी ढेप २ हजार ३०० रुपये क्विंटल, मका चुनी १६०० रुपये क्विंटल व तूर चुनी १७०० रुपये क्विंटल असे भाव असल्यामुळे शेतकऱ्यांना अल्प नफ्यामध्ये जास्त काम करावे लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी