शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

चंद्रपूर ठरले जगात सर्वाधिक उष्ण शहर, महाराष्ट्राची पाच शहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 09:44 IST

पहिल्या १५ मध्ये अकाेला, वर्धा, मालेगाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उष्णतेच्या लाटेने राज्य होरपळून निघत असून, शुक्रवारी चंद्रपूरने तापमानात जगात  उच्चांक केला आहे. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, उस्मानाबाद  जिल्ह्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू झाला आहे.  राज्यातील जळगाव, मालेगाव, अकोला, वर्धा या शहरांचे तापमानही  ४३ अंशाच्या वर नोंदले गेले. 

प्रत्यक्षात आज चंद्रपूरच्या तापमानात ०.४ अंशांची घट हाेऊन ४३.६ अंशांची नाेंद करण्यात आली, हे विशेष. गुरुवारी ते ४४ व त्यापूर्वी ४४.६ अंश हाेते. ३१ मार्चला कॅमरूनच्या गॅराैआ शहराचे तापमान ५४ अंश नाेंदविण्यात आले हाेते. याशिवाय माली देशाचे कायस आणि नारा व सेनेगलचे माटम शहर तापमानाच्या उच्चांकीवर आहे.  हवामानतज्ज्ञ प्रा. सुरेश चाेपणे यांच्या मते, सध्या पारा सरासरीएवढाच असला तरी त्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. सध्या देशातील गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानसह विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात उष्ण लाटांचे सत्र सुरू आहे. ४ एप्रिलपर्यंत या प्रकाेपाचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतर थाेडी घट हाेईल; पण ते स्थिर राहील. पुढे किमान दाेनदा तरी उष्ण लहरींचा सामना करावा लागणार आहे. 

महाराष्ट्राची पाच शहरेजगातील सर्वांत उष्ण शहरांच्या यादीत केवळ चंद्रपूर नाही, तर इतरही जिल्ह्यांचा समावेश आहे. ३१ मार्चला ४३ अंशापेक्षा अधिक पाऱ्यासह अकाेला आणि वर्धा पहिल्या १५ शहरांमध्ये हाेते. १ एप्रिलला ४३.१ अंश तापमानासह अकाेला जगात दहाव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ४३ अंशांसह अहमदनगर ११ व्या, ब्रह्मपुरी १२ व्या व मालेगाव १४ व्या क्रमांकावर आहे.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरSun strokeउष्माघातMumbaiमुंबई