शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ओबीसींचे चंद्रपुरात चक्का जाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 18:28 IST

ओबीसींची जातनिहाय जनगणना, आरक्षण व इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने सोमवारी चंद्रपूर येथील वरोरा नाका चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसर्व राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणासाठी आवाज उठवावा : ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : अनेक वर्षांपासून ओबीसीच्या मागण्या व समस्या प्रलंबित आहेत. केंद्र सरकार अन्याय करीत असून आरक्षण कमी करण्याचा घाट घातला. जातनिहाय जनगणना नाकारून अधिकारांपासून वंचित ठेवले. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणासाठी आवाज उठवावा, असे आवाहन ओबीसी नेते प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले. आज दुपारी १२ वाजता स्थानिक वरोरा नाका चौकात झालेल्या ओबीसी चक्का जाम आंदोलनात ते बोलत होते.

डॉ. जीवतोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यात मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित होते. यावेळी, ओबीसी समाजाची जातनिहाश जनगणना करावी, स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे. ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के स्कॉरलशिप द्यावी. मॅट्रिकपूर्व स्काॅरलशिप दिली नाही. राज्य सरकारने वर्ग ३ व ४ पदभरती करावी, बिगर आदिवासी वनपट्ट्यासाठी तीन पिढ्यांची रद्द करावी. केंद्रात ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय सुरू करावे. एससी व एसटी शेतकऱ्यांप्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना शासकीय योजना सुरू कराव्या. केंद्र सरकारने क्रिमिलेअरची मर्यादा वाढवावी, या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारीमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधानांना पाठविण्यात आले.

२३ मार्चला दिल्लीत जंतरमंतर

२३ मार्च २०२२ रोजी न्यू दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील ओबीसी समाजाने बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महासचिव सचिन राजुरकर यांनी केले.

टॅग्स :agitationआंदोलनOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणchandrapur-acचंद्रपूर