शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

गणेशोत्सव व बकरी ईद शांततेत साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:52 IST

शहराचा सांस्कृतिक वारशामध्ये उत्सवाचा शांतताप्रिय इतिहास आहे. या इतिहासाला साजेशी अशी वर्तवणूक सर्वच समाजघटकांना एकमेकांकडून अपेक्षित आहे. त्यामुळे आगामी काळातील गणेश उत्सव व बकरी ईद या सणाच्या काळात शहरात उत्तम सौहार्दपूर्ण वातावरण ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : पोलीस मुख्यालय शांतता बैठक, गणेश मंडळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराचा सांस्कृतिक वारशामध्ये उत्सवाचा शांतताप्रिय इतिहास आहे. या इतिहासाला साजेशी अशी वर्तवणूक सर्वच समाजघटकांना एकमेकांकडून अपेक्षित आहे. त्यामुळे आगामी काळातील गणेश उत्सव व बकरी ईद या सणाच्या काळात शहरात उत्तम सौहार्दपूर्ण वातावरण ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.पोलीस मुख्यालयाच्या ड्रील शेडमध्ये सोमवारी दुपारी १२.०० वाजता गणेशोत्सव व बकरी ईद यासंदर्भात शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला महापौर अंजली घोटेकर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, धर्मदाय आयुक्त व्ही. डी. शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे ठाणेदार, शांतता समितीचे सदस्य व समाजातील विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सव किंवा अन्य कोणत्याही उत्सवादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडत असल्याची नोंद नाही. या शहराच्या इतिहासामध्ये जातीय सलोख्याचे वातावरण कायम राहिले असून सर्व समाजाला याची विशेष जाण आहे. येणाऱ्या उत्सवकाळामध्ये देखील याच पद्धतीचे वातावरण शहरात ठेवण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, तसेच व्हाट्स अ‍ॅप या सारख्या समाज माध्यमांवर येणाºया अफवापासून सावध रहावे, असे आवाहन केले.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले, गणेश उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था भंग करणाºया कुठल्याही घटकाला माफ केले जाणार नाही. कायद्याचा आदर करेपर्यंत जिल्हा पोलीस आपल्या सोबत असतील. मात्र आपण कायद्याचा अनादर केला तर आम्ही कायदेशीर कारवाईस मागेपुढे बघणार नाही. त्यामुळे कोणतीही तक्रार उद्भवणारच नाही याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ज्या मुद्यांवर गणेश मंडळांना विविध परवानगी घ्याव्या लागतात त्यासाठी एकाच ठिकाणी व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. महापौर अंजली घोटेकर म्हणाल्या, शहरात गुण्यागोविंदाने सगळ्या समाजाचे सण-उत्सव शांततेत साजरा करण्याची चंद्रपूरकरांची परंपरा आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव व बकरी ईदच्या काळात पोलीस प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.बैठकीला शांतता समितीचे राजेंद्र सिंग गौतम, मोहम्मद इजाज मोहम्मद अजीज, डॉ. मंगेश गुलवाडे, सुरेश चोपणे, सदानंद खतरी, धनंजय दानव, शालिनी भगत, सय्यद रमजान अली, मोहम्मद खान, बाळू खोबरागडे, हाजी इकबाल साहाब, मुस्ताक रिजवी प्रत्येक गावातील गणेश उत्सव मंडळाचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. संचालन जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जे. आर चव्हाण यांनी केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीPoliceपोलिस