शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
2
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २० नक्षली ठार
3
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
4
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
5
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
7
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
8
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
9
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
10
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
11
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
12
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट
13
ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...
14
नौदलाला आज असे जहाज मिळणार, जगात कोणत्याही नौदलाकडे नाही; पाचव्या शतकातील आरमाराची ताकद जगभ्रमंतीला निघणार...
15
IPL 2025: जोश हेझलवूडने RCB फॅनसोबत केलं 'असं' कृत्य; Video पाहून तुम्हालाही येईल राग
16
"झावळ्यांमधून पोरांनी आम्हाला कपडे बदलताना पाहिलं आणि.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयानक अनुभव
17
"मलाच धक्का बसलाय..." परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' सोडण्यावर सुनील शेट्टीची प्रतिक्रिया
18
आणखी एक ज्योती? १२ वर्षांच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोनी
19
Akhilesh Yadav : "भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा
20
६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?

सीबीएसई दहावीचे विद्यार्थी होणार नाही नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST

चंद्रपूर : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)च्या नव्या नियमानुसार या वर्षी दहावीचा एकही विद्यार्थी नापास होणार नसल्याचे ...

चंद्रपूर : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)च्या नव्या नियमानुसार या वर्षी दहावीचा एकही विद्यार्थी नापास होणार नसल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नसून पालकांना तसेच विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र परीक्षेपूर्वीच निर्णय जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गती मंदावेल, अशी भीती काही पालकांना आहे.

कोरोना संकटामुळे या वर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ऑनलाइन अभ्यास करून विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत आहेत. मात्र काही ठिकाणी सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने स्किल इंडिया इनिशिएटिव्ह समोर ठेवून हा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा निकष काय लागणार, असा प्रश्न काही पालकांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात काही शिक्षकांसोबत चर्चा केली असता, सीबीएससीमध्ये गुण देण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे बहुतांश वेळा विद्यार्थी नापासच होत नसून भाषेसारख्या विषयातही आऊटऑफ मार्क मिळवितात. त्यामुळे नापास होण्याची भीती या विद्यार्थ्यांना मुळीच नसल्याचेही शिक्षकांचे म्हणणे आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय असल्यामुळे समाधान असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

काय आहे नवीन नियम?

सीबीएसई दहावीचा विद्यार्थी गणित किंवा विज्ञान विषयात नापास झाला आणि त्याने ऐच्छिक विषय, घेतलेल्या कौशल्य आधारित विषयात तो उत्तीर्ण झाला तर त्याला उत्तीर्ण समजले जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्फाॅर्मेशन टेक्नाॅलाॅजी, काॅम्प्युटर सायन्स आदी एच्छिक विषय आहेत. यानंतर दहावीची टक्केवारी बेस्ट ऑफ फाइव्ह विषयाच्या आधारावर ठरवली जाणार आहे.

--

जिल्ह्यातील सीबीएसईची आकडेवारी

१२६०

दहावीतील विद्यार्थी

१६

सीबीएसई शाळा

६८५

विद्यार्थी

५७५

विद्यार्थिनी

---

पालकांच्या प्रतिक्रिया

कोरोना संकटामुळे या वर्षी विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण घेता आले नाही. त्यांचे नुकसान टाळण्यासाठी बोर्डाने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र हा निर्णय परीक्षेनंतर घेतला असता तर आणखी चांगले झाले असते.

-रमेश वाघमारे,

गडचांदूर

कोट

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासावर दुर्लक्ष होईल. ज्या वेगाने अभ्यास करायला पाहिजे तो वेग मंदावण्याची शक्यता आहे. बौद्धिक कुवत विकसित होण्यासाठी यावर परिणाम पडण्याची शक्यता आहे.

- रोहन शर्मा,

चंद्रपूर

कोट

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही. बोर्डाने घेतलेला निर्णय योग्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील नैराश्य दूर होऊन ते पुन्हा अभ्यासाला लागतील.

- साधना मडावी,

चंद्रपूर