शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
2
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
3
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
4
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
5
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
6
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
7
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
8
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
9
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
10
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
11
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
12
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
13
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
14
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
15
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
16
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई दहावीचे विद्यार्थी होणार नाही नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST

चंद्रपूर : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)च्या नव्या नियमानुसार या वर्षी दहावीचा एकही विद्यार्थी नापास होणार नसल्याचे ...

चंद्रपूर : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)च्या नव्या नियमानुसार या वर्षी दहावीचा एकही विद्यार्थी नापास होणार नसल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नसून पालकांना तसेच विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र परीक्षेपूर्वीच निर्णय जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गती मंदावेल, अशी भीती काही पालकांना आहे.

कोरोना संकटामुळे या वर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ऑनलाइन अभ्यास करून विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत आहेत. मात्र काही ठिकाणी सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने स्किल इंडिया इनिशिएटिव्ह समोर ठेवून हा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा निकष काय लागणार, असा प्रश्न काही पालकांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात काही शिक्षकांसोबत चर्चा केली असता, सीबीएससीमध्ये गुण देण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे बहुतांश वेळा विद्यार्थी नापासच होत नसून भाषेसारख्या विषयातही आऊटऑफ मार्क मिळवितात. त्यामुळे नापास होण्याची भीती या विद्यार्थ्यांना मुळीच नसल्याचेही शिक्षकांचे म्हणणे आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय असल्यामुळे समाधान असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

काय आहे नवीन नियम?

सीबीएसई दहावीचा विद्यार्थी गणित किंवा विज्ञान विषयात नापास झाला आणि त्याने ऐच्छिक विषय, घेतलेल्या कौशल्य आधारित विषयात तो उत्तीर्ण झाला तर त्याला उत्तीर्ण समजले जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्फाॅर्मेशन टेक्नाॅलाॅजी, काॅम्प्युटर सायन्स आदी एच्छिक विषय आहेत. यानंतर दहावीची टक्केवारी बेस्ट ऑफ फाइव्ह विषयाच्या आधारावर ठरवली जाणार आहे.

--

जिल्ह्यातील सीबीएसईची आकडेवारी

१२६०

दहावीतील विद्यार्थी

१६

सीबीएसई शाळा

६८५

विद्यार्थी

५७५

विद्यार्थिनी

---

पालकांच्या प्रतिक्रिया

कोरोना संकटामुळे या वर्षी विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण घेता आले नाही. त्यांचे नुकसान टाळण्यासाठी बोर्डाने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र हा निर्णय परीक्षेनंतर घेतला असता तर आणखी चांगले झाले असते.

-रमेश वाघमारे,

गडचांदूर

कोट

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासावर दुर्लक्ष होईल. ज्या वेगाने अभ्यास करायला पाहिजे तो वेग मंदावण्याची शक्यता आहे. बौद्धिक कुवत विकसित होण्यासाठी यावर परिणाम पडण्याची शक्यता आहे.

- रोहन शर्मा,

चंद्रपूर

कोट

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही. बोर्डाने घेतलेला निर्णय योग्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील नैराश्य दूर होऊन ते पुन्हा अभ्यासाला लागतील.

- साधना मडावी,

चंद्रपूर