शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा; मुख्याध्यापकांचा ताप वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST

चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे दहावी तसेच बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार न होता पुढे ढकलण्यात आल्या ...

चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे दहावी तसेच बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार न होता पुढे ढकलण्यात आल्या आहे. मात्र, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने परीक्षेचे साहित्य यापूर्वीच शाळांकडे सोपविल्यामुळे ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी शाळांवर येऊन पडली आहे. मात्र, शाळा बंद असल्यामुळे मुख्याध्यापकांचा ताप आणखीच वाढला आहे.

दहावीची २३ तर १२ वीची परीक्षा २९ एप्रिलपासून घेण्यात येणार होती. यासाठी परीक्षा मंडळाने शाळांकडे नियोजित वेळापत्रानुसार कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्राॅप्ट, स्टीकर सिटिंग प्लॅन, ए, बी. लिस्ट, विषयनिहाय., माध्यमनिहाय बारकोड, प्रात्याक्षिक परीक्षेचे साहित्य आदींचा पुरवठा केला आहे. मात्र, कोरोनाचे संकट वाढल्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, पुढील तारखा अद्यापही निश्चित करण्यात आल्या नाही. परिणामी शाळांना पुरविण्यात आलेले साहित्य सद्य:स्थितीत शाळांकडेच आहे. हे साहित्य जोखमीचे असल्यामुळे जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचा ताप वाढला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील शाळांची स्थिती चांगली आहे. मात्र, चोरांची नजर जर या साहित्याकडे गेली तर काय होईल, या भीतीने सध्यातरी मुख्याध्यापकांची झोप उडाली आहे.

कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत शाळा बंद आहे. अशा वेळी शाळेत जाणेही मुख्याध्यापक, शिक्षकांना कठीण झाले आहे.

बाॅक्स

दहावीतील विद्यार्थी : ३५०८१

बारावीतील विद्यार्थी : २८७८९

बाॅक्स

हे साहित्य कस्टडीत

कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्राॅप, स्टीकर, सिटिंग प्लॅन, ए, बी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमिक बारकोड, प्रात्याक्षिक परीक्षेचे साहित्य आदी.

बाॅक्स

परीक्षा कधी?

यापूर्वी दहावीची परीक्षा २३ एप्रिल व बारावीची परीक्षा २९ एप्रिलला जाहीर करण्यात आली होती. मात्र, कोरोना संकटामुळे शिक्षणमंत्र्यांनी या परीक्षा पुढे ढकलल्या आहे. विशेष म्हणजे, पुढे या परीक्षा कधी होणार यासंदर्भात अद्यापतरी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

बाॅक्स

पुढील प्रवेश कधी?

दहावी-बारावीची परीक्षा साधारणत: मार्च, एप्रिल महिन्यामध्ये होते. मात्र यावर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून त्या परीक्षा सुरू करण्यात येणार होत्या. याही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहे. त्यामुळे त्या कधी होतील, याबाबत सध्यातरी संभ्रम आहे. दरम्यान, परीक्षाच झाल्या नसल्याने आता परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार, त्यानंतर पुढील वर्गातील प्रवेश याबाबत सध्यातरी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

बाॅक्स

अभ्यास कधीपर्यंत करायचा ?

मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करत अभ्यास केला. आता परीक्षेच्या तारखाही जाहीर झाल्यामुळे ते सराव करत होते. आता परीक्षांची तारीख पुढे ढकलण्यात आल्यामुळे अभ्यास पुन्हा किती दिवसांपर्यंत करायचा, असा प्रश्न ते उपस्थित करत आहे.

कोट

मुख्याध्यापक म्हणतात....

दहावी-बारावीच्या परीक्षांची तारीख निश्चित झाली होती. त्यामुळे मंडळाने परीक्षेचे साहित्य शाळांकडे सोपविले आहे. मात्र, कोरोना संकटामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे सदर साहित्य शाळांमध्येच आहे. संचारबंदीमुळे शाळा बंद आहे. साहित्य जपून असले तरी जिल्ह्यातील सर्वच मुख्याध्यापकांचा ताण बराच वाढला आहे.

-प्राचार्य नरेंद्र बोबडे

अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशन