शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

बदलते तंत्रज्ञान आणि भविष्यातील बदलांचा वेध घेऊनच नवे उद्योग उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 05:00 IST

विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या उद्योगांसंदर्भात आपल्या संकल्पना मांडल्या. रामकिशन सारडा म्हणाले, केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या ४ हजार ४४५ कोटींच्या मेगाप्रकल्पाला राज्य सरकारने जागा द्यावी. चंद्रपुरात नागपूरच्या कळमणा मार्केटच्या धर्तीवर बाजारपेठेची गरज आहे. डाॅ. चेतन खुटेमाटे यांनी सिंगापूरच्या धर्तीवर बायामेडिकल हबची गरज मांडली. जीवन पोनतनवार यांनी मेगा फूड प्राॅड्क्टस प्रकल्प उभारण्याकडे लक्ष वेधले. प्रवीण गाठी यांनी उद्योगांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डिझेल, पेट्रोलवर धावणारी वाहने भविष्यात कालबाह्य झालेली असेल. इलेक्ट्रिक, हायड्रोजनवर धावणारी वाहने रस्त्यावर येतील. ऑटोमोबाइल क्षेत्रात मोठे बदल होत आहे. आयटी क्षेत्रही व्यापक झालेले असेल. नवीन उद्योग उभा करताना भविष्यात घडून येणाऱ्या बदलांचा वेध घेणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. खासदार बाळू धानोरकर यांच्या संकल्पनेतील संवाद उद्योगांशी कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, प्रवीण कुटे पाटील, माजी खासदार सुबोध मोहिते उपस्थित होते. प्रास्ताविकात खासदार धानोरकर म्हणाले, धान, कापूस हे जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे. यावर आधारित उद्योग उभा झाल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. निप्पाॅन डेंड्रो प्रकल्प अद्यापही पूर्ण झाला नाही. नव्या उद्योगांची निर्मिती झाल्यास रोजगाराच्या संधी चालून येतील. यासाठी उद्योगांना वीज दरात सूट  असावी, शिवाय विमानतळाचा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या उद्योगांसंदर्भात आपल्या संकल्पना मांडल्या. रामकिशन सारडा म्हणाले, केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या ४ हजार ४४५ कोटींच्या मेगाप्रकल्पाला राज्य सरकारने जागा द्यावी. चंद्रपुरात नागपूरच्या कळमणा मार्केटच्या धर्तीवर बाजारपेठेची गरज आहे. डाॅ. चेतन खुटेमाटे यांनी सिंगापूरच्या धर्तीवर बायामेडिकल हबची गरज मांडली. जीवन पोनतनवार यांनी मेगा फूड प्राॅड्क्टस प्रकल्प उभारण्याकडे लक्ष वेधले. प्रवीण गाठी यांनी उद्योगांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. प्रा. योगेश दूधपचारे यांनी विमानतळाची गरज व्यक्त केली. शिवाय गोंडवाना विद्यापीठाचा दर्जा सुधारण्याची गरज व्यक्त केली. रोजगारावर आधारित अभ्यासक्रम हवा. वनावर आधारित उद्योगांकडे लक्ष वेधले. विनोद दत्तात्रय यांनीही गोंडवाना विद्यापीठांकडून महाविद्यालयांना सोई पुरविण्याची मागणी केली. ॲड. आशिष धर्मपुरीवार यांनी न्याय व्यवस्था ही १३१ वर्षांपूर्वीची असल्याचे सांगून नवीन इमारत उभारण्याची मागणी केली. हर्षवर्धन सिंघवी यांनी व्यापाऱ्यांची समस्या मांडली. वॅट आणि सेवा कराचा मुद्दा उपस्थित करून लहान उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. चंद्रपूर एमआयडीसीचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा यांनी नव्या उद्योगांपुढे कामगार युनियनचा मोठा प्रश्न असल्याचे सांगितले.

दहा वर्षांत ऑटो इंडस्ट्रीजचा चेहरा बदलणार :  प्रफुल्ल पटेलचंद्रपूरला निसर्गाने खूप काही दिले आहे. आता पर्यावरणाचाही विचार करावा लागेल, अशी स्थिती आहे. टेक्नाॅलाॅजीत मोठे बदल होत आहेत. पुढील दहा वर्षांत ऑटोमोबाइल इंडस्ट्रीजमध्ये मोठे बदल झालेले दिसेल. प्रत्येक क्षेत्रात बदल होणार आहे. या बदलांचा विचार करूनच नवीन उद्योगांची निर्मितीची गरज आहे, असे मार्गदर्शन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले

चंद्रपूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक उद्योग हवा : विजय वडेट्टीवारउद्योगवाढीला नेहमीच समर्थन आहे. शरद पवार यांनी मनात आणले तर जिल्ह्यातील समस्या सुटतील. कापूस इकडे पिकतो. उद्योग तिकडे जातात. टेक्सटाइल्स पार्कची विदर्भाला गरज आहे. जिल्ह्यात ब्रोकनराईसपासून इथेनाॅलचा उद्योग उभारण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात उद्योगांसाठी अतिशय पोषक वातावरण आहे. कुठेही युनियनमुळे उद्योग बंद झाला नाही. मात्र उद्योगांच्या प्रदूषणाने चंद्रपूर जिल्ह्याचा श्वास कोंडला आहे. पर्यावरणपूरक उद्योग हवा आहे. यासोबतच आता नवीन चंद्रपूरची संकल्पना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मांडली.

सुसंवादातून उद्योगांचा विकास : बाळू धानोरकरचंद्रपूर जिल्हा औद्योगिक म्हणून ओळखला जातो. आज नवीन आव्हाने उभी ठरली. या मात करण्यासाठी नियोजनबद्ध धोरण तयार करून काम करण्याचे गरजेचे आहे. उद्योजक आणि सरकारमध्ये सुसंवादही अत्यावश्यक असल्याने कार्यक्रमाचे नाविन्यपूर्ण आयोजन केल्याचे खा. बाळू धानोरकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार