शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन ग्रामपंचायत होणार इतिहासजमा

By admin | Updated: March 27, 2015 00:49 IST

व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी भारतामध्ये दिडशे वर्षे राज्य केले. इंग्रज राजवटीचा कारभार चालविण्यासाठी इंग्रजांनीही ...

खडसंगी : व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी भारतामध्ये दिडशे वर्षे राज्य केले. इंग्रज राजवटीचा कारभार चालविण्यासाठी इंग्रजांनीही गावागावांत कारभार चालविण्यासाठी ग्रामपंचायती निर्माण केल्या. स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असलेल्या चिमूर क्रांती नगरीत १९४२ ला ग्रामपंचायतीची स्थापना केली. मात्र वाढलेली लोकसंख्या पाहता ग्रामपंचायतीतून चालविण्यास अडथळा होत होता. त्यामुळे नुकताच राज्य शासनाने चिमूर ग्रामपंचायत विसर्जीत करून नगरपरिषद स्थापनेची कार्यवाही सुरू केली. आता चिमूर क्रांती नगरीतील इंग्रज राजवटीतील ग्रामपंचायत इतिहासजमा होणार असुन सरपंचाऐवजी आता नगराध्यक्ष गावाचा कारभार चालविणार आहे. देशाचा किंवा संस्थानांचा कारभार एका ठिकाणावरून चालविण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे सत्तेचे विकेंद्रिकरण करून गावागावांत लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत तथा तालुकास्तरावर पंचायत समिती व जिल्हास्तरावरून जिल्हा परिषदेमार्फत कारभार चालविला जातो. यासाठी चिमूर गावांत त्यावेळेची लोकसंख्या विचारात घेवून इंग्रज राजवटीत सन १९४२ मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली होती.या पहिल्या निवडणुकीत ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच ना.ह. भलमे यांनी एक डिसेंबर १९४२ ते ९ आॅगस्ट १९४८ पर्यंत कार्यभार चालविता. दुसरे सरपंच फ.ल. कामडी यांनी स्वातंत्र्यानंतर कारभार चालविला तर आजपर्यंत चिमूर क्रांती नगरीत २६ सरपंचानी गावाचा कारभार सांभाळला. चिमूर ग्रामपंचायतीची वाढती लोकसंख्या व अनेक वर्षांपासून चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी येथील नागरिक करित आहेत. मात्र जिल्ह्याच्या निकषात चिमूर तालुका बसत नाही. त्यामुळे ही मागणी मागे पडली आहे. मात्र भाजप-सेना युती शासनाने चिमुरातील जनतेची मागणी लक्षात घेता चिमूर ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्याकरिता शासनस्तरावर हालचाली सुरू केल्या. या इंग्रजकालिन राजवटीत सुरू झालेल्या ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच म्हणून मनिष नंदेश्वर यांना हा मान मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.मागील काँग्रेस सरकारने तालुकास्तरावर असलेल्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील अनेक तालुकास्तरावरील मोठ्या ग्रामपंचायतीसुद्धा येत्या काही महिन्यात इतिहासजमा होणार आहेत. मात्र चिमूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतीची घोषणा माजी मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र नगर पंचायतीला जनतेचा विरोध असल्याने चिमूर नगर परिषदेची कारवाई शासनस्तरावर सुरू झाली आहे. स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असलेल्या चिमूर नगरीत १९४२ ला ग्रामपंचायतीची स्थापन झाली. या ग्रामपंचायतीमध्ये १७ सदस्य असुन याच ग्रामपंचायतीने चिमूर शहरातील पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्यसुद्धा दिले आहेत. चिमूर शहरातील लोकसंख्या, मागे पडलेला विकास लक्षात घेता चिमूर ग्रामपंचायतीला नगर परिषद बनवण्याची मागणी जुनीच होती. या मागणीचा पाठपुरावा सातत्याने करण्यात आल्याने चिमूर ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळणार आहे. याकरिता वडाळा पैकु सोनेगाव काग, कवडशी अशा ग्राम पंचायतीचा समावेशसुद्धा नगर परिषदेमध्ये होणार असुन या गावच्या ग्रामपंचायतीही इतिहासजमा होणार आहे.स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असलेली इंग्रज राजवटीतील ७३ वर्षाआधी १ डिसेंबर १९४२ ला प्रथम सरपंच विराजमान आलेली ग्रामपंचायत आता काही दिवसात इतिहासजमा होणार असुन चिमूर क्रांतीनगरीचा कारभार आता सरपंचाऐवजी नगराध्यक्ष चालविणार आहे. नगर परिषदेच्या स्थापनेनंतर चिमूर शहराचा विकास होणार असल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)