शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘ह्यो नवरा नको गं बाई’ म्हटल्याने नवरदेव आल्यापावली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 07:30 IST

Chandrapur News बँडबाजाच्या पथकात नाचत गाजत नवरदेव लग्नमंडपी आला. परंतु ऐनवेळी भरमंडपात वधू मुलीने लग्नास नकार दिल्याने अखेर नवरदेवाला आल्या पावली परत जावे लागले.

ठळक मुद्देचिमूर तालुक्यातील कोलारी येथील घटना

अमोद गौरकार

चंद्रपूर : बँडबाजाच्या पथकात नाचत गाजत नवरदेव लग्नमंडपी आला. परंतु ऐनवेळी भरमंडपात वधू मुलीने लग्नास नकार दिल्याने अखेर नवरदेवाला आल्या पावली परत जावे लागले. ही घटना चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील कोलारी येथे मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

चिमूर तालुक्यातील उसेगाव येथील एका युवकाचे नागपूर येथील एका मुलीसोबत लग्न जुळले. थाटामाटात साक्षगंधही झाले. मुलीच्या आजोळी कोलारी येथे लग्नकार्य उरकायचे असे बैठकीत ठरले. त्यानुसार कोलारी येथे आज लग्न होणार होते. त्यासाठी नवरदेवही उसेगाववरून आपले वऱ्हाडी घेऊन लग्नमंडपी हजर झाला. त्या मंडपात येताना ढोल-ताशाच्या गजरात आणि मित्रमंडळीच्या नाच-गाण्याने नवरदेव सहजीवनाचे स्वप्न रंगवत आनंदाने वधूमंडपी आला. लग्न मुहूर्तावर लावायचे असल्याने नवरी मुलगीही मंडपी आली. आता मंगलाष्टके होणार इतक्यात मंडपातच मुलीला चक्कर आल्याने ती खाली पडली. त्यामुळे लगेचच तिला दवाखान्यात नेण्यात आले. दवाखान्यात शुद्धीवर आल्यानंतर मात्र नववधूने लग्नमंडपी जाण्यास नकार दिला आणि मला त्या मुलाशी लग्न करायचंच नाही, असे स्पष्टपणे घरच्या मंडळींना सांगू लागली. बऱ्याच जणांनी व नातेवाईकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु नवरी मुलगी आपल्या निर्णयावर ठाम राहिली. दुपारचे चार वाजले तरी नववधू लग्नमंडपी आली नाही. त्यामुळे नवरदेवाकडील वऱ्हाडींमध्ये कुजबुज सुरू झाली. अखेर नवरीच्या नातेवाईकांनीकडून मुलीचा लग्नास नकार आहे, असे स्पष्टपणे नवरदेव आणि त्यांच्या वऱ्हाड्यांना सांगण्यात आले. त्यामुळे वधूमंडपी तणावाचे वातावरण निर्माण झाले. नवऱ्या मुलाने यावर तोडगा काढावा म्हणून तंटामुक्तीकडे अर्ज सादर केला. तंटामुक्तीनेही तातडीची बैठक बोलावून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या तंटामुक्तीच्या सभेत मुलीने लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने अखेर नवरदेव मुलाला आल्यापावली वरात परत घेऊन जावे लागले.

जेवणावळी आणि आंदण

लग्न कार्य असल्याने वऱ्हाड्यांसाठी स्वयंपाक बनविला होता. परंतु लग्न कार्य होणार नसल्याने जेवण तरी कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला, परंतु अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याने अखेर वऱ्हाड्यांनी जेवण केले. गावातील लोकांनी व नातेवाईकांनी मुलीच्या सुखी संसारासाठी आणलेल्या भेटवस्तू नातेवाईकांना परत न्याव्या लागल्या.

टॅग्स :Socialसामाजिक