शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

‘ह्यो नवरा नको गं बाई’ म्हटल्याने नवरदेव आल्यापावली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 07:30 IST

Chandrapur News बँडबाजाच्या पथकात नाचत गाजत नवरदेव लग्नमंडपी आला. परंतु ऐनवेळी भरमंडपात वधू मुलीने लग्नास नकार दिल्याने अखेर नवरदेवाला आल्या पावली परत जावे लागले.

ठळक मुद्देचिमूर तालुक्यातील कोलारी येथील घटना

अमोद गौरकार

चंद्रपूर : बँडबाजाच्या पथकात नाचत गाजत नवरदेव लग्नमंडपी आला. परंतु ऐनवेळी भरमंडपात वधू मुलीने लग्नास नकार दिल्याने अखेर नवरदेवाला आल्या पावली परत जावे लागले. ही घटना चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील कोलारी येथे मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

चिमूर तालुक्यातील उसेगाव येथील एका युवकाचे नागपूर येथील एका मुलीसोबत लग्न जुळले. थाटामाटात साक्षगंधही झाले. मुलीच्या आजोळी कोलारी येथे लग्नकार्य उरकायचे असे बैठकीत ठरले. त्यानुसार कोलारी येथे आज लग्न होणार होते. त्यासाठी नवरदेवही उसेगाववरून आपले वऱ्हाडी घेऊन लग्नमंडपी हजर झाला. त्या मंडपात येताना ढोल-ताशाच्या गजरात आणि मित्रमंडळीच्या नाच-गाण्याने नवरदेव सहजीवनाचे स्वप्न रंगवत आनंदाने वधूमंडपी आला. लग्न मुहूर्तावर लावायचे असल्याने नवरी मुलगीही मंडपी आली. आता मंगलाष्टके होणार इतक्यात मंडपातच मुलीला चक्कर आल्याने ती खाली पडली. त्यामुळे लगेचच तिला दवाखान्यात नेण्यात आले. दवाखान्यात शुद्धीवर आल्यानंतर मात्र नववधूने लग्नमंडपी जाण्यास नकार दिला आणि मला त्या मुलाशी लग्न करायचंच नाही, असे स्पष्टपणे घरच्या मंडळींना सांगू लागली. बऱ्याच जणांनी व नातेवाईकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु नवरी मुलगी आपल्या निर्णयावर ठाम राहिली. दुपारचे चार वाजले तरी नववधू लग्नमंडपी आली नाही. त्यामुळे नवरदेवाकडील वऱ्हाडींमध्ये कुजबुज सुरू झाली. अखेर नवरीच्या नातेवाईकांनीकडून मुलीचा लग्नास नकार आहे, असे स्पष्टपणे नवरदेव आणि त्यांच्या वऱ्हाड्यांना सांगण्यात आले. त्यामुळे वधूमंडपी तणावाचे वातावरण निर्माण झाले. नवऱ्या मुलाने यावर तोडगा काढावा म्हणून तंटामुक्तीकडे अर्ज सादर केला. तंटामुक्तीनेही तातडीची बैठक बोलावून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या तंटामुक्तीच्या सभेत मुलीने लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने अखेर नवरदेव मुलाला आल्यापावली वरात परत घेऊन जावे लागले.

जेवणावळी आणि आंदण

लग्न कार्य असल्याने वऱ्हाड्यांसाठी स्वयंपाक बनविला होता. परंतु लग्न कार्य होणार नसल्याने जेवण तरी कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला, परंतु अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याने अखेर वऱ्हाड्यांनी जेवण केले. गावातील लोकांनी व नातेवाईकांनी मुलीच्या सुखी संसारासाठी आणलेल्या भेटवस्तू नातेवाईकांना परत न्याव्या लागल्या.

टॅग्स :Socialसामाजिक