शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाच्या धुळीने गुदमरतोय श्वास

By admin | Updated: May 20, 2014 23:32 IST

गावालगत असलेल्या कोळसा खाणीमुळे धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात परसले आहे. त्यामुळे गोयेगाव वासियांचे आरोग्य धोक्यात आले असून गावकर्‍यांना वेकोलिच्या कोळसा खाणींचा फटका बसत आहे.

प्रकाश काळे - हरदोना

गावालगत असलेल्या कोळसा खाणीमुळे धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात परसले आहे. त्यामुळे गोयेगाव वासियांचे आरोग्य धोक्यात आले असून गावकर्‍यांना वेकोलिच्या कोळसा खाणींचा फटका बसत आहे. प्रचंड प्रमाणात उडणारी कोळशाची धूळ नागरिकांच्या जिवावर बेतणारी आहे. परिसरातील नागरिक विविध आजाराने त्रस्त आहे. कायमस्वरुपी बंदोबस्त न केल्यास भविष्यात चित्र कसे राहील, याचा विचार न केलेलाच बरा. राजुरा येथून १२ किमी अंतरावर गोयेगाव दोन हजार लोकसंख्येच गाव आहे. या गावात जाण्यासाठी मुख्य मार्गावर वळण वाटेने प्रवास करावा लागतो. या परिसरात कोळशाचे मोठ्या प्रमाणात साठे असल्याने वेकोलिने कोळसा उत्खननासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करुन कोळसा खाण सुरू केली आहे. गोयेगावापासून कोळसा खाण अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे कोळशाच्या धुळीने गाव माखले आहे. कोळसा खाणीलगत गाव आणि शेती असल्याने पिकांवर काळ्या धुळीचा थर बसून पीक पूर्णत: खराब होते. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटकाही बसत आहे. धुळीमुळे शेतात काम करण्यासाठी मजूरसुद्धा भेटत नसल्याची स्थिती परिसरातील शेतकर्‍यांची आहे. शेतकर्‍यांकडे शेती असूनही पीक घेता येत नाही. अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. वेकोलितर्फे कोळसा उत्खननासाठी शक्तिशाली ब्लॉस्टिंग केली जाते. ही ब्लॉस्टिंग एवढी जबरदस्त असते की, भूकंप आल्यागत धक्के बसतात. नवीन इमारत बांधकामांना अल्पावधीतच तळे जात आहे. त्यामुळे बांधकाम प्रभावित झाले आहे. उडणार्‍या कोळशाच्या धुळीने यावर्षी शेतपिकांची पुरती वाट लागली. वेकोलिने कोळसा वाहतुकीसाठी काढलेला रस्ता शेतालगत असल्याने उडणारी धुळ शेतपिकांवर बसल्याने पिके पूर्णत: खराब होत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी उत्पन्नात मोठ्या प्रमाणातत घट झाली आहे. कोळशाच्या धुळीचा चक्क थर पिकांवर जमा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. यावर्षी निसर्गाचा प्रकोप आणि गोवरी डीप कोळसा खाणीच्या धुळीची त्यात भर पडली. उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी शेतकर्‍यांची अवस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात धुळ उडत असताना वेकोलिकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. वर्षाकाठी करोडो रुपयांचा नफा मिळविणार्‍या वेकोलिला गावकर्‍यांच्या समस्येशी काहीही देणेघेणे नाही. गोयेगावाच्या अगदी हाकेच्या अंतरावर ‘गोवरी डीप’ कोळसा खाण आहे. वेकोलित पाण्याचा प्रचंड उपसा केला जातो. त्यामुळे घरगुती हातपंपाना पाण्याअभावी अखेरची घरघर लागली आहे. गावात पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आहे. परंतु पाण्याचा कमतरतेने नागरिकांना मुबलक पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. पाण्ययाची टाकी अर्धीअधिक रिकामीच राहते. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दिवसागणिक कोळसा खाणींमुळे पाण्याचे स्त्रोत आटत चालल्याने भविष्यात येथी पाणी टंचाई निर्माण होणार आहे. वेकोलिने किमान दोन ते तीन वेळा रस्त्यावर पाणी शिंपडून धुळीवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.