शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अभ्यासाचा कंटाळा; नववीच्या विद्यार्थ्याने रचले स्वत:च्याच अपहरणाचे नाट्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 17:37 IST

ठाणेदार पाटील यांनी त्या मुलाला विश्वासात घेऊन प्रेमाने विचारणा केली असता तेव्हा तो बोलू लागला.

ठळक मुद्देबल्लारपुरातील अफलातून घटना

बल्लारपूर (चंद्रपूर) : अभ्यासाचा कंटाळा आल्याने शाळेत न जाता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वत:च्याच अपहरणाचे नाट्य रचल्याचा प्रकार सोमवारी बल्लारपुरात उघडकीस आला.

शिकवणीसाठी गेला असता आपल्या मुलाचे कुणीतरी अज्ञाताने अपहरण केले होते, अशी तक्रार पंडित दीनदयाळ वॉर्डातील एका कुटुंबाने सोमवारी सकाळी पोलीस ठाण्यात केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसही चक्रावले. पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे स्वत: आपल्याकडे घेतली.

मुलाने बयानात सांगितलेल्या माहितीनुसार, कारवा जंगलाकडे आणि जुनोनापर्यंत जाऊन अनेकांची चौकशी केली. त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही बघितले. परंतु अपहरणाबाबत काहीही ठावठिकाणा लागला नाही. शेवटी ठाणेदार पाटील यांनी त्या मुलाला विश्वासात घेऊन प्रेमाने विचारणा केली असता तेव्हा तो बोलू लागला.

मुलगा म्हणाला, मला अभ्यासाचा कंटाळा आला. त्यामुळे कारवा जंगलात निघून गेलो. मात्र, तेथून मला काही लोकांनी तिथे हटकले आणि जुनोनापर्यंत पोहोचवले. त्यानंतर माझा विचार बदलला आणि मी घरी आलो. आई-बाबांचा मार चुकविण्यासाठी खोटी माहिती दिली. मला अभ्यासाचे खूप टेंशन आल्यामुळे असे केल्याची त्याने कबुली दिली. तेव्हा ते कुटुंब आणि पोलिसांनीही सुटकेचा श्वास टाकला.

तक्रार अत्यंत गंभीर होती. त्यामुळे आम्ही लगेच तपासाला सुरुवात केली. परंतु, तपासात काहीच तथ्य आढळले नाही. अखेर मुलाने खरा प्रकार सांगितला. अशा घटना घडू नयेत, यासाठी पालकांनी आपल्या मुलांवर योग्य संस्कार करावेत.

- उमेश पाटील, ठाणेदार, बल्लारपूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर