शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

तालुक्यात खासगी व सरकारी एकूण १०९ शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या २१ प्राथमिक शाळा व नगर परिषद व खासगी मिळून २१ अश्या एकूण तालुक्यात ४२ प्राथमिक शाळा आहेत. उच्च प्राथमिक सात शाळा व एक हायस्कूल आहे. उर्वरित हायस्कूल कॉन्व्हेंट खासगी आहेत. तर बल्लारपूर शहरात नगर पालिकेद्वारा १४ प्राथमिक शाळा, मोहसिनभाई जव्हेरी दोन व इतर अशा सात शाळा आहेत. या शाळेमध्येसुद्धा घंटी वाजलीच नाही.

ठळक मुद्देबल्लारपूर तालुक्यातील १०९ शाळांची घंटा वाजलीच नाही, केवळ शिक्षक गेले शाळेत

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : दरवर्षी शाळेचा पहिला दिवस म्हणजे फुल देऊन मुलांचे स्वागत करण्याचा असतो. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तालुक्यातील १०९ शाळांतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहोचविण्यात आली.तालुक्यात खासगी व सरकारी एकूण १०९ शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या २१ प्राथमिक शाळा व नगर परिषद व खासगी मिळून २१ अश्या एकूण तालुक्यात ४२ प्राथमिक शाळा आहेत. उच्च प्राथमिक सात शाळा व एक हायस्कूल आहे. उर्वरित हायस्कूल कॉन्व्हेंट खासगी आहेत. तर बल्लारपूर शहरात नगर पालिकेद्वारा १४ प्राथमिक शाळा, मोहसिनभाई जव्हेरी दोन व इतर अशा सात शाळा आहेत. या शाळेमध्येसुद्धा घंटी वाजलीच नाही.शाळा सुरु होण्यापूर्वी नगर परिषदेमध्ये सर्व शाळेच्या शिक्षकांची सभा उपमुख्याधिकारी अभिजित मोटघरे यांच्या उपस्थितीत झाली. यात शासनातर्फे आलेले निर्णय सांगण्यात आले. त्यानुसार परिस्थिती पाहून सप्टेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू केली जाईल. परंतु पहिला व दुसरा वर्ग जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, तालुक्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे.व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवणे सुरूजिल्हा परिषद शाळा पळसगाव येथील शिक्षक सुनील कोवे म्हणाले, सध्या विद्यार्थ्यांचे पुस्तके आली आहेत. मुलांच्या घरोघरी जाऊन वाटणे सुरु आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनविले जात आहे. जव्हेरी शाळेच्या उपमुख्याध्यपिका आशा ढेंगळे म्हणाल्या, पहिला दिवस शाळेतील मुलाविना गेला. गुरुनानक पब्लिक स्कूलचे कैलास खंडेलवाल यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवीन शिकायला मिळावे यासाठी आॅनलाईन शिक्षण कसे असते याची माहिती दिली. सध्यातरी तालुक्यातील सर्व शिक्षक कोरोना संकटामुळे शैक्षणिक वातावरण कसे हाताळता येईल याबाबत चिंताग्रस्त आहेत.विद्यार्थ्याविना शाळा ओसदरवर्षी २६ जूनपासून शाळा सुरु होतात. मात्र यंदा कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने केवळ शिक्षकांना शाळेत बोलविले आहे. त्यानंतर टप्याटप्यात विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय परिसरात मोठ्या प्रमाणा विद्यार्थ्यांचा गोंधळ दिसून यायचा मात्र यावर्षी शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडल्याचे दिसून आले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी