२१ टुल्लूपंप जप्त : चिमूर नगर परिषदेची कारवाईचिमूर : शहरात नागरिकांना पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळण्याची व्यवस्था असूनही अनेक कुटुंब पिण्याचे पाणी थेट नळांना टुल्लू पंप लावून घेत असतात. यामुळे इतर नागरिकांना पुरेसा पाणी मिळत नाही. ही गंभीर बाब लक्षात घेऊन नगर परिषदेचे नवनियुक्त प्रशासक प्रमोद वानखडे यांच्या आदेशानुसार शहरात दोन पथक तयार करुन धडक मोहिम राबविण्यात आली. बुधवारी २१ टुल्लू पंप जप्त करण्यात आल्याने टुल्लू पंपधारकात खळबळ उडाली आहे. चिमूर शहरात पिण्याच्या पाण्यासाठी चार टाक्या असून सात लाख लिटर पिण्याचे पाणी दररोज वितरण होत असते. तर लोकसंख्या १५ ते १६ हजार असून दर मानसी ४० ते ४५ लिटर पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. परंतु, आजही अनेक भागात नागरिकांना पाणी मिळत नसल्याची बोंब वार्डावार्डातून होत होती. याबाबत चिमूर नगर परिषदेचे प्रशासक प्रमोद वानखेडे यांनी गांभीर्याने दखल घेत कर्मचाऱ्यांना आदेश देऊन टुल्लू पंप व मोटार पंप लावून पिण्याचे पाणी घेत असलेल्या नागरिकांचे पंप जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले.शहरात दोन भरारी पथक तयार करुन धडक मोहिम राबविण्यात आली असता पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांनी २१ टुल्लू पंप जप्त केले. त्यामुळे टुल्लू पंपधारकात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे चिमुरकरांना आता भरपूर प्रमाणात पिण्याचे पाणी मिळणार आहे व तसा अनुभव बुधवारी अनेक भागात दिसून आला. नवनियुक्त प्रशासकाच्या या कारवाईचे नागरिकांनी कौैतूक केले असून अनेकांनी समाधान व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
प्रशासकाचा आल्याआल्याच चिमूरकरांना दणका
By admin | Updated: June 25, 2015 01:19 IST