शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

शाळेसमोरच ठेवला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:08 IST

येथील फेअरीलँण्ड स्कूलमधील व आदिवासी वसतिगृहात निवासी असलेल्या एका आदिवासी विद्यार्थिनीचा आजाराने नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृत्यू वसतिगृहाचे अधीक्षक व शाळेचे संचालक यांच्या निष्काळजीपणाने झाला.

ठळक मुद्देतणावाचे वातावरण : निष्काळजीपणामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : येथील फेअरीलँण्ड स्कूलमधील व आदिवासी वसतिगृहात निवासी असलेल्या एका आदिवासी विद्यार्थिनीचा आजाराने नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृत्यू वसतिगृहाचे अधीक्षक व शाळेचे संचालक यांच्या निष्काळजीपणाने झाला. त्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करा, या मागणीसाठी विद्यार्थिनीचे पालक व आदिवासी संघटनेचे नेते रमेश मेश्राम यांच्या नेतृत्वात शनिवारी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर विद्यार्थिनीचा मृतदेह ठेवून निदर्शने करण्यात आली.या घटनेने याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. तब्बल सहा तासानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने व चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपाासणीकरिता पाठविण्यात आला.आचल सिताराम कुळमेथे (१४) रा. मांगली रै. असे मृतक विद्यार्थीनीचे नाव असून ती गेल्या तीन वर्षांपासून वसतिगृहात राहून फेअरीलँण्ड स्कूल येथे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेत होती. ती आठव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. गेल्या पाच दिवसांपासून तिची प्रकृती बरी नसल्याने अधीक्षक व शाळेच्या संचालकांनी तिच्यावर स्थानिक खासगी दवाखान्यात उपचार केला. तिची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर तिच्या पालकांना सूचना देण्यात आली. त्यानंतर आचलला नागपूर येथील मेयोमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी आचलचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला येथील अधीक्षक व शाळेचे संचालकच जबाबदार आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप मुलीचे पालक सिताराम कुळमेथे व त्यांचे नातेवाईक तसेच आदिवासी संघटनेचे रमेश मेश्राम यांनी केला व आचलचा मृतदेह शाळेच्या समोर ठेवून आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत आरोपींना अटक करणार नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पावित्रा घेतल्याने हे प्रकरण आणखीच चिघळले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका दंडाधिकारी महेश शितोळे, उपविभागीय पोलीस अधीकारी प्रताप पवार, निवासी नायब तहसीलदार मधुकर काळे यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर जमाव शांत झाला.आचलचा मृत्यू आजारामुळेच -युवराज धानोरकरफेअरीलँण्डचे स्कूलचे अध्यक्ष अ‍ॅड. युवराज धानोरकर यांना विचारणा केली असता माझ्या शाळेतील वसतिगृहात गडचिरोली, भामरागड, चिमूर व चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील ३६० विद्यार्थी असून मृतक आचल ही तालुक्यातील मांगली रै. येथील होती. तिची प्रकृती बरी नसल्याचे आमच्या लक्षात आले होते. तिच्यावर भद्रावती येथील खासगी दवाखान्यात उपचार केला. परंतु तिची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात आल्याने तिच्या पालकास याबाबत सूचना करून तिच्यावर चांगल्या दवाखान्यात उपचार करा, असा सल्ला देवून तिला त्यांच्या स्वाधीन केले. आचलवर केलेल्या उपचाराचे पेपर्स आमच्याकडे आहे. आम्ही उपचारासाठी कोणतीही हयगय केली नसल्याचे धानोरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू