शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

रस्ते रुंदीकरणात वीज खांबांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 6:00 AM

वरोरा नाका चौकापासून प्रियदर्शिनी इंदिरा चौकापर्यंत येणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या मार्गाचे रूंदीकरण केल्या जात आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहापर्यंत एकेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिवाय, चौपदरीकरणासाठी पाण्याच्या टाकीपर्यंत दुहेरी मार्गाचेही खोदकाम केल्या जात आहे.

ठळक मुद्देअपघाताचा धोका : चौपदरीकरणानंतरही खांब रस्त्याच्या मध्यभागी

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक ते वरोरा नाका या वर्दळीच्या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मात्र, या मार्गावरील वीज खांब बाजुला न केल्याने रस्ता रुंदीकरणात या खांबाचा अडथळा निर्माण झाला आहे.वरोरा नाका चौकापासून प्रियदर्शिनी इंदिरा चौकापर्यंत येणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या मार्गाचे रूंदीकरण केल्या जात आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहापर्यंत एकेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिवाय, चौपदरीकरणासाठी पाण्याच्या टाकीपर्यंत दुहेरी मार्गाचेही खोदकाम केल्या जात आहे. चंद्रपुरातून नागपूरकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. याच मार्गाच्या दोन्ही बाजुला अनेक व्यावसायिक वाहने उभी केली जातात. काळाची गरज म्हणून या महत्त्वपूर्ण मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. हा निर्णय अतिशय योग्य आहे. परंतु, मार्गाच्या दोनही बाजुचे वीज खांब जैसे-थे आहेत. रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे वीज खांब मध्यभागी येतात. खांब हटविले नाही तर नागरिक व वाहनधारकांच्या जीवालाही धोका आहे. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच वीज वितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हे धोकादायक खांब बाजुला हटविण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.रस्त्याच्या कडेला टाकले पाईपवीज खांब हटविण्याबाबत काहीच हालचाली नसल्याचे पाहून बांधकाम कंपनीकडून पर्याय म्हणून मार्गाच्या कडेला पाईप टाकून बांधकाम केल्या जात आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी वीज वितरण कंपनीला या पाईपमधून भूमिगत तारा टाकता येऊ शकतात.जनहितासाठी काढावा तात्काळ पर्यायचंद्रपूर शहरातील वर्दळीच्या मार्गांचे रूंदीकरण व चौपदीकरण केल्यानंतरही वीज खांब जर मार्गाच्या मध्यभागी राहत असतील तर या मार्गांना काहीच अर्थ उरत नाही. अशा रस्ते बांधकामामुळे अपघात होऊन नागरिक व वाहनाधारकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वीज वितरण कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने आपापल्या नियमांच्या मर्यादा लक्षात घेऊनही लोकांचे जीव वाचावेत, यासाठी संयुक्तरित्या पर्याय काढणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.वीज वितरण कंपनीकडे ८० लाख डिपॉझिटसदर रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी वीज खांब हटविण्यासाठी वीज वितरण कंपनीने १५५ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले होते. दरम्यान, यापैकी अर्धा टप्पा म्हणून ८० लाखांची रक्कम वीज वितरण कंपनीकडे भरणा करण्यात आला आहे.बांधकाम विभागाची विनंती फेटाळलीसार्वजनिक बांधकाम विभागाने सदर वीज खांब हटविण्याची विनंती एका पत्राद्वारे वीज वितरण कंपनीकडे केली होती. परंतु, पूर्ण रक्कम भरल्याशिवाय निविदा काढता येणार नाही, असा नियम असल्याचे कळवून वीज कंपनीने खांब हटविण्याची कार्यवाही प्रलंबित ठेवल्याची माहिती आहे.चंद्रपूर मनपाअंतर्गत रस्त्यांचे रूंदीकरण सुरू आहे. बांधकाम करताना विजेचे खांब अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे हे खांब अन्यत्र शिफ्ट करण्याबाबत अंदाजपत्रक तयार करण्यात आला. बांधकाम विभागाकडून ही कामे होत आहेत. मनपाने या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, विजेचे खांब हटविण्यात आले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला. वीज वितरण कंपनीकडे डिपॉझिटही भरण्यात आले. नागरिकांसाठी रस्ता सुखकर व्हावा, यासाठी मनपाकडून सहकार्य केल्या जात आहे. हा प्रश्न निश्चितपणे सुटेल.- संजय काकडे, आयुक्त मनपा, चंद्रपूरमार्गावरील वीज खांब बाजुला करण्याचा अंदाजपत्रक १५५ लाखांचा मंजूर झाला होता हे खरे आहे. त्यापैकी पार्ट पेमेंट ८० लाख रूपये वीज वितरण कंपनीकडे भरण्यात आले. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. दरम्यान, कालमर्यादेनुसार हे अंदाजपत्रक नव्याने रिव्हाईज्ड झाले. नवीन अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाल्याचे आजच वरिष्ठांकडून पत्र मिळाले. त्यानुसार आता हे अंदाजपत्रक १५५ वरून १७१ कोटींवर गेले आहे. डिपॉझिट भरल्यानंतर पुढची कार्यवाही होईल.- अविनाश कुºहेकर, कार्यकारी अभियंता,वीज वितरण, चंद्रपूरवीज वितरण कंपनीकडे बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या निधीनुसार डिपॉझिट भरण्यात आले आहे. या घटनेला सात- आठ महिने झाले. सदर रक्कम भरून हमीदेखील घेण्यात आली. त्यामुळे पुढील कार्यवाही होणे अपेक्षित होते.- संतोष जाधव, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम, चंद्रपूर 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकelectricityवीज