शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
2
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
3
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
4
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
5
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
6
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
7
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
8
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
9
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
10
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
11
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
12
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
13
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
14
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
15
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
16
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
17
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
18
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
19
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!

लोहार समाज विकासापासून दूर

By admin | Published: April 10, 2015 12:58 AM

आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे लोहार समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे.

गुंजेवाही: आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे लोहार समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे. उपजिविकेच्या व्यवसायावरच यांत्रिकीकरणाचे आक्रमण झाल्यामुळे या समाजाला आता उपासमारीच्या झळा सोसाव्या लागत आहेत.जिवनाचा अतिशय खडतर प्रवास या समाजाच्या वाट्याला आला आहे. यावर मात करीत घाम गाळून रात्रंदिवस मेहनत करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या समाजाच्या व्यवसायावर लोखंड आणि बिड धातूचे भाव वधारल्यामुळे कुऱ्हाड कोसळली आहे. या समाजाची भटकंती आजही कायम असून विकासाच्या प्रवाहापासून हा समाज कोसोदूर आहे. निरक्षर व अठराविश्वे दारिद्र्यात खीतपत पडलेल्या या समाजाचा व्यवसाय पूर्णत: शेती व्यवसायाशी निगळीत असून पारंपारीक आहे. आधुनिकीकरणातत शेतीसुद्धा यांत्रीक होत आहे. याचाच परिणाम लोहार समाजबांधवावर बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जावे लागत असून उपासमारीच्या झडा सोसाव्या लागत आहेत. लोखंड आणि बिडचे भाव वधारल्याने त्यांचा व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यातील अनेक गावात शेतीशी निगडीत अवजारे तयार करुन देण्याचे काम लोहार समाज बांधव करतात.शेती व्यवसायाला लागणारे फास, विळा, पावशी, कुऱ्हाड, नागराचीी फाड, वखराची फास, खुरपी आदी लोखंडी अवजारे बनवून उपजिविका करण्याचे काम या समाजाच्या वाट्याला आले आहे. वखरणी व नांगरणीसाठी लागणारी अवजारे शेतकरी लोहारांकडून क्वचितच विकत घेतात. याचा परिणाम लोहार समाजाच्या उपजिविकेवर झाला आहे. भटकंती करणारा समाज आजही अज्ञानपणामुळे दारिद्र्यात खितपत पडला आहे. विकास अजुनही त्यांच्या वाट्याला आला नाही. शासनाने समाजाकडे दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक संस्थानी या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)