शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाजपने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

By admin | Updated: June 5, 2017 00:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या काळात घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ होता.

प्रकाश देवतळे : केंद्र सरकारचा कार्यकाळ अपेक्षाभंगाचालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या काळात घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ होता. मोदींची अच्छे दिनची घोषणा हीमृगजळाप्रमाणे फसवी होती हे आता स्पष्ट झाले आहे. या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाल पाने पुसली आहेत, अशी टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणांच्या जाहिरातीवर हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. पण प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र शून्य आहे. गेली तीन वर्षे मोदी यांनी मनमोहनसिंग सरकारने सुरु केलेल्या कामांची उद्घाटने केली आहेत. त्यांनी घोषणा केलेला एकही प्रकल्प पूर्ण झाला नाही. बेरोजगारी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. भ्रष्टाचाराने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. परराष्ट्र धोरण, संरक्षण धोरण सपशेल अपयशी ठरले आहे. शेजारी देश रोज कुरापती काढत आहेत. दलित- आदिवासी, अल्पसंख्याकावरील हल्ल्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गोरक्षणाच्या नावाखाली गरीब दलित, अल्पसंख्यांकाचे मुडदे पाडले जात आहेत. देशात झुंडशाही आली आहे असा आरोप देवतळे यांनी केला आहे. देवतळे म्हणतात की, देशाच्या विविध भागात दलित आदिवासीवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मध्यप्रदेशात ५० दलित कुटुंबानी इच्छामरणाची मागणी केली आहे. मध्यप्रदेशात ५० दलित कुटुंबांनी इच्छामरणाचीमागणी केली आहे. पंतप्रधान आदिवासी विकास दिवसाचे पोस्टर काढतात. जाहिराती करतात. पण आदिवासींसाठीच्या योजनेत सुरु असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत काही बोलत नाहीत. या सरकारने आदिवासींच्या विकास योजनांवरील निधीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. देशात गोरक्षकांच्या नावाखाली गुंडगिरी सुरु आहे. पंतप्रधान म्हणतात पण त्याला आवार घालण्याची इच्छाशक्ती त्यांच्यात नाही. हे त्यांच्या तीन वर्षाच्या काळात वारंवार दिसून आले आहे. एकीकडे पंतप्रधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन आणि इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन करतात आणि दुसरीकडे त्यांच्याच गुजरात येथील उमा मध्ये गोरक्षक दलितांवर अनन्वित अत्याचार करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भरभरुन बोलणारे पंतप्रधान, दलित आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचाराबाबत चकार शब्द काढत नाहीत. त्यांच्या मूकसंमतीनेच हे सर्व चालले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.नक्षली, दहशतवादी हल्ले सुरुचनोटबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधानांनी सांगितले होते की, नोटाबंदीनंतर दहशतवादी आणि नक्षली हल्ले बंद होतील. पण गेल्या काही दिवसांत नोटाबंदीनंतर हल्ले कमी झाल्याचे दिसत नाही. उलट ते हल्ले वाढले आहेत. नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये १७५ पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला आहे. मात्र नोटबंदीतून किती काळा पैसा बाहेर आला, हे पंतप्रधान आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अद्यापही सांगू शकले नाहीत.गांधीजींचे विचार अमरराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आरक्षण संपविले पाहिजे, असे म्हणतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला फक्त आरक्षणच नाही. तर आरक्षणाचा लाभ ज्यांना मिळतो त्या दलित आदिवासी मागासवर्गीय यांना संपवायचे आहे. असेच यांच्या तीन वर्षांच्या कारभारावरुन दिसत आहे. पंतप्रधान तर खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडवरील महात्मा गांधीच्या फोटोच्या जागी स्वत:चा फोटो छापून गांधीजींची जागा घेण्याचा प्रयत्न करु लागले आहे. नरेंद्र मोदी यांनी कॅलेंडरवरुन महात्मा गांधीचा फोटो हटवला. पण गांधीजींचे विचार तुम्ही हटवू शकरणार नाही, असा इशाराही देवतळे यांनी दिला आहे