शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

भाजपाने नागरिकांची दिशाभूल करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:44 IST

सध्या भाजपा सरकार काहीही बरळल्यासारखे विचित्र मुद्दे उपस्थित करून नागरिकांची अकारण दिशाभूल करीत आहे.

ठळक मुद्देसतीश चतुर्वेदी : नागपूर विभागीय शेतकरी-कामगार मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या भाजपा सरकार काहीही बरळल्यासारखे विचित्र मुद्दे उपस्थित करून नागरिकांची अकारण दिशाभूल करीत आहे. एका सभेत भाषण देताना भाजपा नेत्याने महात्मा गांधींवर चार गोळ्या झाडल्या होत्या, असा नवाच जावईशोध लावला. म्हणे तीन गोळ्या नाथुराम गोडसे या झाडल्या आणि एक गोळी कुणी झाडली हे नागरिकांनी समजून घ्यावे. वास्तविक गांधी मर्डर केस आपला डी.लिट.चा विषय आहे. नाथुराम गोडसेने तीन गोळ्या झाडल्याचे कबूल केले होते आणि शवविच्छेदनातही तीनच गोळ्या निघाल्या. मग भाजपा सरकारने चौथी गोळी आणली कुठून, असा सवाल उपस्थित करून भाजपाने नागरिकांची दिशाभूल करू नये, असा निर्वाणीचा सल्ला काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी सरकारला दिला.राष्टÑमाता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने येथील इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या पटांगणावर सोमवारी नागपूर विभागीय शेतकरी-कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर मेळाव्याचे आयोजक माजी खासदार नरेश पुगलिया तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री अनीस अहमद, आ. सुनिल केदार, माजी आमदार अशोक धवड, नागपूर मनपाचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, राहुल पुगलिया, गजानन गावंडे आदी उपस्थित होते.यावेळी माजी खासदार गेव्ह आवारी यांनीही भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला. भाजपा सरकारची नोटबंदी ही सार्वजनिक लूट होती. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसेल, असे डॉ. मनमोहन सिंग यांनी नोटबंदीच्या निर्णयानंतर लगेच सांगितले होते. ते आता तंतोतंत खरे झाल्याचे सर्वांनाच दिसत आहे, असेही आवारी म्हणाले.माजी खासदार नरेश पुगलिया म्हणाले, नरेंद्र मोदी म्हणाले होते भारत काँग्रेसमुक्त करू. पण ते शक्य झाले नाही आणि होणारही नाही. मात्र येणाºया काळात देश भाजपामुक्त जरूर होईल. भाजपा सरकार त्याच दिशेने कारभार करीत आहे. मोदी उत्तम प्रशासक आहे, असे सांगितले जाते. असे असताना मग देशात मंदी का आहे, व्यापार नुकसानीत का आहे, शेतकरी आत्महत्या का वाढल्या आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी माजी मंत्री नितीन राऊत यांनी भाषणातून सरकारच्या धोरणावर कडाडून टिका केली. माजी मंत्री अनिस अहमद यांनी अंतर्गत वादावरच भाष्य केले. यावेळी आ. सुनिल केदार, माजी आमदार अशोक धवड यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक गजानन गावंडे, संचालन अविनाश ठावरी तर आभार तानाजी वनवे यांनी मानले.रॅलीने शहर काँग्रेसमयचंद्रपूर : मिरवणुकीच्या मध्यभागी खुल्या वाहनावर नागपूर विभागीय शेतकरी-कामगार मेळाव्याचे आयोजक माजी खासदार नरेश पुगलिया, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी खासदार गेव्ह आवारी, आमदार सुनील केदार, माजी आमदार अशोक धवड आरुढ झाले होते. रॅलीत विदर्भातील कार्यकर्त्यांचा सहभाग होता. सदर रॅलीच्या समोर दुचाकी चालकांची तर मागे शेकडो वाहनाचा ताफा विद्यानिकेतन शाळेच्या प्रांगणातून निघाला. ही रॅली वरोरा नाका, जटपुरा गेट, गांधी चौक मार्गांनी दाताळा रोडवरील इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या कार्यक्रमस्थळी पोहचली. तत्पूर्वी विद्यानिकेतन स्कूल परिसरातून रॅली काढण्यात आली. रॅलीचा प्रारंभ सोमवारी दुपारी ३.३० वाजता झाला. सदर रॅली जटपुरा गेट, गांधी चौक व इंदिरा गार्डन स्कूलमध्ये पोहचली. दरम्यान, हजारोंवर कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे शहरातील वातावरण काँग्रेसमय झाले होते. रॅलीच्या यशस्वीतेसाठी मनपा गट नेते डॉ. सुरेश महाकुलकर, गजानन गावंडे, विजय सिंह बैस, राकेश निकोसे, किशोर जीचकार, सुधाकर कुंदोजवार, गोदरू जुमनाके, कुणाल राऊत आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले.