शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

भरारी पथकांची कृषी केंद्रांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:20 IST

जिल्ह्यात मान्सून दाखल होताच शेतकरी कामाला लागला. दरम्यान, कृषी केंद्रांमध्ये खते-बियाणे खरेदीसाठी मोठी गर्दी सुरू केली. कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांची ...

जिल्ह्यात मान्सून दाखल होताच शेतकरी कामाला लागला. दरम्यान, कृषी केंद्रांमध्ये खते-बियाणे खरेदीसाठी मोठी गर्दी सुरू केली. कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांची फसवणूक किंवा लुबाडणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागाने जिल्ह्याभरात १६ भरारी पथके गठित केली आहेत. कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना बिल मिळते की नाही, शासनाने ठरवून दिलेल्या दराने खतांची किंवा बियाणांची विक्री केली जाते की नाही, ई-पास मशीनचा वापर केला जातो की नाही, खताची गुणवत्ता व दर्जा याबाबत तपासणी करण्यात येणार आहे. यादरम्यान कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे निष्पन्न झाल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येते, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.

बॉक्स

७० लाखांचे बोगस बियाणे जप्त

हंगामाला सुरुवात होताच अनेक जण बोगस बियाणांची विक्री सुरू करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथक तयार केले. जिल्हा कृषी अधिकारी कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनात व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही पथे काम करीत आहेत. यंदाच्या हंगामात या पथकांनी ७० लाखांचे बोगस बियाणे जप्त केले आहे.

कोट

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्ह्यात १६ पथके गठित केली आहेत. कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्यास या पथकातर्फे त्या कृषी केंद्रावर कारवाई करण्यात येते. आजपर्यंत या पथकांनी ७० लाखांचे बोगस बियाणे जप्त केले आहेत.

-भाऊसाहेब बऱ्हाटे,

जिल्हा कृषी अधिकारी, कृषी अधीक्षक, चंद्रपूर