शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

भद्रावतीत उपजिल्हा रुग्णालयाचे संकेत

By admin | Updated: May 31, 2015 01:58 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून शासनाच्या वतीने आरोग्य सेवा गावागावात पोहचविण्यात येते.

भद्रावती : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून शासनाच्या वतीने आरोग्य सेवा गावागावात पोहचविण्यात येते. परंतु भद्रावती येथील कार्यरत ग्रामीण रुग्णालय रिक्त पदे, अपुरा औषधीसाठा, आवश्यक आरोग्य विषयक तपासणी मशीन यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, अतीआजारी रुग्णांकरिता वेळेवर अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था न होणे आदी समस्येने ग्रासलेले आहे. त्यामुळे भद्रावतीच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करावे, अशी मागणी आ. बाळू धानोरकर यांनी केली आहे.भद्रावती तालुक्यातील लोकसंख्या १,६३,८०५ असून तालुक्यात वेगाने औद्योगीकरण होत आहे. कोळसा खाण प्रकल्प, विद्युत प्रकल्प कार्यरत आहे. परंतु पर्याप्त आरोग्य सेवा देण्यास ग्रामीण रुग्णालय असमर्थ ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण परिसरातील जनतेला क्षुल्लक आजाराकरिता चंद्रपूर येथे रेफर केले जाते. या बाबीचा विचार करून वरोरा धानोरकर यांनी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धण करण्यात येऊन येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात यावे म्हणून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना ३ फेब्रुवारीला प्रत्यक्ष भेटीत चर्चा करून निवेदन सादर केले. या अनुषंगाने अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भद्रावती यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र ८ मे रोजी जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपूर यांच्यामार्फत उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ नागपूर यांना विस्तृत अहवाल सादर केला आहे. भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धण करून विशेष बाब म्हणून उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास अनुकूलता दर्शविली आहे.धानोरकर हे भद्रावती येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याकरिता आवश्यक निधी व अन्य बाबी शासनाकडून मंजूर करून घेण्याकरिता प्रत्यशील आहेत. चालू आर्थिक वर्षात भद्रावती येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात येईल, असे संकेत आरोग्य मंत्र्यांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)