शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

भद्रावती पंचायत समिती वाऱ्यावर

By admin | Updated: April 19, 2015 01:04 IST

एखादा शसकीय कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी कामानिमित्त बाहेर गेल्यास तेथील बहुतके कर्मचारी आपल्या खुर्चीवर आढळत नाही, ...

विनायक येसेकर भद्रावतीएखादा शसकीय कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी कामानिमित्त बाहेर गेल्यास तेथील बहुतके कर्मचारी आपल्या खुर्चीवर आढळत नाही, त्यामुळे शासकीय कामाचा खोळंबा होतो, ही बाब ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनने उघड झाली. या पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी प्रकाश मानकर हे गुजरातमधील गांधीनगर येथे प्रशिक्षणाकरिता गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत या कार्यालयाचा कारभार कसा चालतो, याची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने १६ एप्रिलला दुपारी ३.३० वाजता पंचायत समिती कार्यालयाचा फेरफटका मारला. त्यावेळी बहुतके कर्मचारी आपल्या टेबलवरुन बेपत्ता असल्याचे दिसून आले. या पंचायत समितीअंतर्गत एकूण ७० ग्रामपंचायती आहेत. संबंधित गावातील नागरिक आपली कामे घेवून येथे येतात. परंतु कर्मचारी कामावर उपस्थित असून सुद्धा ते आपल्या टेबलवर दिसत नाहीत. दिवसभर प्रतीक्षा करूनही त्यांना काम न होता निघून जावे लागते. पंचायत समिती अंतर्गत बांधकाम, आरोग्य, कृषी, शिक्षण यासारखे विभाग आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकाला अकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.याबाबत त्याठिकाणी उपस्थित एका अधिकाऱ्याला विचारणा केली असता, अनेक कर्मचारी बाहेर काम आहे, असे सांगून निघून जातात. वरिष्ठ अधिकारी कुणाकुणाकडे लक्ष देणार, ज्यांचे त्यांना कळाले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. समाधानकारक उत्तर न देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपण कारणे दाखवा नोटीस देणार असल्याचेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कामानिमित्त आलेल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली. दौऱ्याच्या नावाखाली कार्यालयाला दांडीया पंचायत समितीमध्ये महत्त्वाचे प्रभाग म्हणजे कृषी, पंचायत, बांधकाम, शिक्षण, रोजगार हमी, बालविकास प्रकल्प, आरोग्य असे महत्त्वाचे प्रभाग आहे. या प्रभागाच्या अधिकारी ग्रामीण भागाचे जनजागूतीसाठी काही दौरे काढतात. त्याचाच फायदा घेवून येथील कर्मचारी नेहमीच विविध कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने कार्यालयाला दांडी मारतात. त्यामुळे कार्यालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांची दमछाक होत असल्याचे दिसून आले. त्यात त्यांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो.सभापतीला कार्यालयीन वाहन नाहीया पंचायत समितीची सभापती इंदू प्रकाश नन्नावरे यांचे स्वत:चे कार्यालयीन वाहन नसल्याचे त्यांनी बोलून दाखविले. गेल्या कित्येक वर्षांपासून सभापतीच्या नावाने वाहन न मिळाल्याने येथील आजी,माजी, सभापतीनीं संवर्ग विकास अधिकारी, जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रारी केल्या. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. परिणामी सभापतीला अधिकाऱ्यांच्या वाहनावर अवलंबून राहावे लागत असल्याने ग्रामीण भागातील समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देण्याची अपेक्षा आहे. ६२ वर्षांपासून पं.स.ची अवस्था जैसे थेपंचायत समितीची स्थापना २१ आॅक्टोबर १९५३ मध्ये झाली. तेव्हापासून या ईमारतीची अवस्था जैसे थे आहे. गेल्या कित्येक दिवसापासून या कार्यालयाची रंगरंगोटी नाही. सूचना फलकाचीही दुरावस्था झाली आहे. कार्यालयीन परिसरात नेहमीच पाणी साचून असते. येथील शिक्षण विभाग, कृषी, बालविकास, आरोग्य हे विभाग स्वतंत्र्यरित्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण नागरिकांच्या नजरेत पडत नाही. काही प्रभागाला त्या प्रभागाची नावेसुद्धा नाही. त्यामुळे कित्येक तास नागरिकांना ताटकळत राहावे लागते.