शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

आॅटोरिक्षांची बेलगाम पार्किंग

By admin | Updated: May 9, 2015 01:03 IST

चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या शहरात दररोज हजारो लोक बाहेरगावांवरून येत असतात.

रवी जवळे/मंगेश भांडेकर चंद्रपूरचंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या शहरात दररोज हजारो लोक बाहेरगावांवरून येत असतात. त्यामुळे शहरात आॅटोरिक्षांची संख्याही कमालीची वाढली आहे. शहरातील दोन हजार ७०० व ग्रामीण भागातील सुमारे ५०० आॅटोंचा पसारा दररोज शहरात असतो. या आॅटोंसाठी महापालिकेकडून ठिकठिकाणी वाहनतळाची व्यवस्था केली आहे. मात्र या वाहनतळांवर एकही सुविधा उपलब्ध करून देण्याचे सौजन्य महापालिकेने आजवर दाखविले नाही. दुसरीकडे आॅटोरिक्षाचालकांवर कुणाचाही वचक नाही. त्यामुळे संपूर्ण शहरच आॅटोरिक्षांचे पार्र्कींग झोन असल्यागत वाट्टेल तिथे आॅटो पार्क करून वाहतुकीचा खोळंबा केला जात असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले आहे. आॅटोरिक्षांच्या या बेलगाम पार्र्कींगला कोण वठणीवर आणणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चंद्रपूरला महानगर पालिकेचा दर्जा प्राप्त झाला आहे. लोकसंख्या वाढत असली तर शहराचा विस्तार म्हणावा तसा झालेला नाही. मध्यभागीच शहर एकवटले आहे. जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे दररोज बाहेरगावावरून येणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यांना कामानिमित्त वेळोवेळी आॅटोरिक्षांची गरज पडते. त्यामुळे आॅटोरिक्षांची संख्याही अलिकडे झपाट्याने वाढली आहे. चंद्रपुरात दोन हजार ७०० आॅटोरिक्षा आहेत. याशिवाय ग्रामीण भागातून चंद्रपुरात दररोज सुमारे ५०० आॅटोरिक्षा येतात. या आॅटोरिक्षांसाठी महानगरपालिकेने शहरातील विविध १७ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था केली आहे. व्यवस्थेच्या नावाखाली केवळ एक फलक लावून महानगरपालिका प्रशासन मोकळे झाले आहे. ‘लोकमत’ने शुक्रवारी या संदर्भात आॅटोरिक्षांच्या विविध वाहनतळांना भेटी देत पाहणी केली असता वाहनतळाचा मुख्य उद्देशच मातीमोल झाल्याचे दिसून आले. आॅटोरिक्षांच्या एकाही वाहनतळावर कसलीही सुविधा नाही. किमान पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह व शेडची व्यवस्था होणे अपेक्षित आहे. मात्र या मुलभुत सुविधीही पुरविण्याचे सौजन्य आजवर महापालिका प्रशासनाने दाखविले नाही. परिणामत: वाहनतळावर आॅटोरिक्षा उभे करण्याचे दायित्व आॅटोरिक्षा चालकांकडूनही दाखविले जात नाही. शहरातील काही वाहनतळावर जाऊन पाहणी केली असता कडाक्याचे ऊन असल्यामुळे सावलीचा आडोसा घेऊन वाट्टेल तिथे आॅटो उभे असलेले दिसून आले. प्रवासी मिळाले पाहिजे, यासाठी काही आॅटोचालक तर वाहनतळावर येऊन रस्त्यावरच उभे असतात. खुद्द वाहनतळांचीच ही अवस्था आहे, तिथे शहरातील इतर रस्त्यावर काय होत असेल, याची कल्पना कुणालाही येऊ शकते.शहरातील पूर्ती बाजार, जटपुरा गेट, झी सेल, आझाद बाग, सराफा लाईन यासारख्या अनेक ठिकाणी आॅटोंचे पार्र्कींग झोन नाही. तरीही वाट्टेल तिथे आॅटोरिक्षा उभे दिसतात. वाहतूक पोलिसांचे वाहन येताच आॅटोचालक तिथून पसार होतात. वाहतूक शाखेचे वाहन पुढे गेले की पुन्हा तीच स्थिती. यामुळे या रस्त्यांवर वाहतुकीचा नेहमीच खोळंबा दिसतो. आॅटोरिक्षामधील प्रवासी एखाद्या दुकानात गेला असेल तर त्याची वाट पाहत आॅटोरिक्षा दुकानापुढेच थांबून असतो. आॅटोरिक्षाचालकाच्या या मनमानीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.