शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

जिल्हा प्रशासनाकडून सावत्रपणाची वागणूक

By admin | Updated: April 29, 2015 01:16 IST

जिवती तालुक्याच्या निर्मितीपूर्वी या तालुक्यातील नागरिक गेली अनेक वर्षे हालअपेष्टा सहन करीेत आयुष्य जगत होती.

जिवती : जिवती तालुक्याच्या निर्मितीपूर्वी या तालुक्यातील नागरिक गेली अनेक वर्षे हालअपेष्टा सहन करीेत आयुष्य जगत होती. तालुका निर्मितीनंतर यात फरक पडेल असे वाटत होते. मात्र तालुका झाल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. प्रशासन या तालुक्याला सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे दिसून येत आहे. विकासात सर्वाधिक महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या रस्त्यांचीच संपूर्ण तालुक्यात दैना झाली आहे. या तालुक्यातील अर्ध्याही खेड्यात अजूनपर्यंत रस्तेच पोहचले नाहीत. यामुळेच संपूर्ण तालुक्याचा विकास खुंटला आहे.या तालुक्यातील डोंगरदऱ्यात वस्त्या करून नागरिक वास्तव्य करीत आहेत. पण अजूनही त्यांचे जीवनमान बदलले नाही. आहे त्याच स्थितीत उदरनिर्वाह करीत आहेत. जिवती तालुका आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. आदिवासी व मागासलेला दुर्गम तालुका म्हणून येथे शासकीय कर्मचारीसुद्धा येण्यासाठी तयार नसतात. परिणामी विकासाला खीळ बसत आहे. ‘गाव तिथे रस्ता’ असे शासनाचे ब्रिद असताना मात्र येथील खेड्यात अजूनही बऱ्याचठिकाणी रस्ते पोहोचलेच नाहीत, ही शोकांतिका आहे. प्रत्येक गावाला रस्ता जोडला तर त्या गावाचा विकासही झपाट्याने होतो. पण इथे रस्ताही नाही आणि दळणवळणाचे साधनही नाही. एखाद्या रुग्णाला बैलबंडीवर टाकून रुग्णालयात न्यावे लागते. खडकी, रायपूर, शंकरलोधी, सोरेकसा, नोकवाडा, नारायणगुडा, धनकदेवी, महापांढरवाणी, भुरी येसापूर, लेंडीजाळा, कमलापूर अशा अनेक खेड्यात अद्याप रस्तेच नाहीत. खेड्यातच रस्ते नसतील तर तालुक्याचा विकास कसा होणार? असा गावकऱ्यांचा प्रश्न आहे. रस्ता नसल्याने दळणवळणाच्या सोयी नाहीत, अशा परिस्थितीत गावाचा विकास कसा होणा जनतेची कामे कशी होणार रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा कशा मिळणार या प्रश्नाचे उत्तर संबंधित प्रशासनानेच द्यावे, लोकप्रतिनिधींनाही याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. एकंदरीत रस्त्याअभावी संपूर्ण तालुक्याचाच विकास खुंटला आहे. (शहर प्रतिनिधी)