शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
3
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
4
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
5
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
6
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
9
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
10
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
11
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
12
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
13
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
14
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
15
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
16
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
17
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
18
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
19
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
20
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...

जिल्हा प्रशासनाकडून सावत्रपणाची वागणूक

By admin | Updated: April 29, 2015 01:16 IST

जिवती तालुक्याच्या निर्मितीपूर्वी या तालुक्यातील नागरिक गेली अनेक वर्षे हालअपेष्टा सहन करीेत आयुष्य जगत होती.

जिवती : जिवती तालुक्याच्या निर्मितीपूर्वी या तालुक्यातील नागरिक गेली अनेक वर्षे हालअपेष्टा सहन करीेत आयुष्य जगत होती. तालुका निर्मितीनंतर यात फरक पडेल असे वाटत होते. मात्र तालुका झाल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. प्रशासन या तालुक्याला सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे दिसून येत आहे. विकासात सर्वाधिक महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या रस्त्यांचीच संपूर्ण तालुक्यात दैना झाली आहे. या तालुक्यातील अर्ध्याही खेड्यात अजूनपर्यंत रस्तेच पोहचले नाहीत. यामुळेच संपूर्ण तालुक्याचा विकास खुंटला आहे.या तालुक्यातील डोंगरदऱ्यात वस्त्या करून नागरिक वास्तव्य करीत आहेत. पण अजूनही त्यांचे जीवनमान बदलले नाही. आहे त्याच स्थितीत उदरनिर्वाह करीत आहेत. जिवती तालुका आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. आदिवासी व मागासलेला दुर्गम तालुका म्हणून येथे शासकीय कर्मचारीसुद्धा येण्यासाठी तयार नसतात. परिणामी विकासाला खीळ बसत आहे. ‘गाव तिथे रस्ता’ असे शासनाचे ब्रिद असताना मात्र येथील खेड्यात अजूनही बऱ्याचठिकाणी रस्ते पोहोचलेच नाहीत, ही शोकांतिका आहे. प्रत्येक गावाला रस्ता जोडला तर त्या गावाचा विकासही झपाट्याने होतो. पण इथे रस्ताही नाही आणि दळणवळणाचे साधनही नाही. एखाद्या रुग्णाला बैलबंडीवर टाकून रुग्णालयात न्यावे लागते. खडकी, रायपूर, शंकरलोधी, सोरेकसा, नोकवाडा, नारायणगुडा, धनकदेवी, महापांढरवाणी, भुरी येसापूर, लेंडीजाळा, कमलापूर अशा अनेक खेड्यात अद्याप रस्तेच नाहीत. खेड्यातच रस्ते नसतील तर तालुक्याचा विकास कसा होणार? असा गावकऱ्यांचा प्रश्न आहे. रस्ता नसल्याने दळणवळणाच्या सोयी नाहीत, अशा परिस्थितीत गावाचा विकास कसा होणा जनतेची कामे कशी होणार रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा कशा मिळणार या प्रश्नाचे उत्तर संबंधित प्रशासनानेच द्यावे, लोकप्रतिनिधींनाही याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. एकंदरीत रस्त्याअभावी संपूर्ण तालुक्याचाच विकास खुंटला आहे. (शहर प्रतिनिधी)