शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मुनगंटीवारांच्या प्रयत्नामुळेच लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:07 IST

हल्लीच्या राजकारणात बघायला न मिळणारा सच्चेपणा, प्रामाणिक प्रयत्न आणि एखाद्या विषयाबद्दल प्रचंड पाठपुरावा या गुणांमुळे राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या वृक्षलागवडीच्या चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप आले आहे.

ठळक मुद्देअनिल सोले यांचे वृक्षलागवडीसंदर्भात वक्तव्य : वृक्षदिंडीला उत्साहात प्रारंभ, हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हल्लीच्या राजकारणात बघायला न मिळणारा सच्चेपणा, प्रामाणिक प्रयत्न आणि एखाद्या विषयाबद्दल प्रचंड पाठपुरावा या गुणांमुळे राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या वृक्षलागवडीच्या चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप आले आहे. सुरुवातीला हजार प्रश्न विचारणारे विरोधकही आता या चळवळीमध्ये स्वयंप्रेरणेने सहभागी झाले आहे. वसुंधरेला हिरवा शालू चढविणाऱ्या या मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद १३ कोटींचे लक्ष्य निश्चित पूर्ण करेल, असा विश्वास ग्रीन आर्मी फाऊंडेशनचे प्रमुख व वृक्षदींडीचे प्रणेते आमदार प्राध्यापक अनिल सोले यांनी व्यक्त केला.चंद्रपूर वनविभागाच्या उत्स्फूर्त सहभागात सोमवारी जिल्ह्यातील वृक्षदिंडीला हजारो नागरिकांची साथ मिळाली. प्राध्यापक अनिल सोले यांच्या नेतृत्वात गेल्या तीन वर्षांपासून सतत वृक्षदिंडी सुरू आहे. सोमवारी चंद्रपूरमध्ये वृक्षदिंडीला शासकीय विभागासह अनेकांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, आ. नाना श्यामकुळे, आ. रामदास आंबटकर, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, विभागीय वनाधिकारी अशोक सोनकुसरे, सुनील कुमार, प्रकाश धारणे, प्रशांत कांबळे, समन्वयक अभय बडकल्लेवार आदी उपस्थित होते.शहरातील मुख्य रस्त्यांवर सकाळी ९ वाजतापासून सुरु झालेली वृक्षदिंडी चंद्रपूरच्या गांधीनगर चौकाला वळसा घालत मुख्य वनसंरक्षक कार्यालयामध्ये विसर्जित झाली. या ठिकाणी मान्यवरांनी संबोधित केले. आ. अनिल सोले पुढे म्हणाले, जागतिक स्तरावर सध्या जंगलाचे पुनर्जीवन करण्याबाबत अतिशय सकारात्मक मत तयार होत आहे. महाराष्ट्रामध्येसुद्धा वाळवंट बनण्यापासून वाचण्यासाठी याची गरज आहे.वृक्षलागवडीबाबत यापूर्वी जनतेला प्रश्न अधिक पडायचे. तीन वर्षांपूर्वी वृक्षलागवडीच्या संदर्भात अनेकांना प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत होती.मात्र ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या तन्मयतेने, ज्या आत्मियतेने या मोहिमेमध्ये स्वत:ला झोकून दिले आणि पाठपुरावा घेतला. त्यानंतर मात्र सर्व राज्यभर चित्र बदलले असून हा एक प्रामाणिकपणे काम करणारा वनमंत्री असून वृक्षलागवडीसारख्या जनतेच्या हिताच्या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सहभागी झालेच पाहिजे, असे मत महाराष्ट्रभर जनतेचे तयार झालेले आहे. आणि त्यामुळेच चांदा ते बांदा या योजनेला मोठ्या प्रमाणात यश मिळत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.वृक्ष दिंडीची जेव्हा कल्पना ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे मांडली. त्यावेळी त्यांनी लोकसहभागाची योजना असल्याचे जाहीर केले होते. आणि त्यामुळेच या मोहिमेला आणि दिंडीचे स्वरूप दिले असल्याचे त्यांनी सांगितले.उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड- आंबटकरआमदार रामदास आंबटकर यांनीदेखील यावेळी संबोधित केले. त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या या चळवळीमुळे वृक्षलागवड ही आता जनचळवळ झाल्याचे मान्य केले. उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षलागवड केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आ. श्यामकुळे यांनीही मार्गदर्शन केले.दिंडीने वेधले लक्षसकाळी रामबाग येथील वनविभागाच्या विश्रामगृहावरुन शहरातील वृक्षदिंडीला सुरुवात झाली. जवळपास अडीच ते तीन तास शहराच्या विविध भागांमध्ये वृक्षदिंडीने प्रवास केला. यावेळी पालखीमध्ये सजवलेले वृक्ष, त्यामागे पथनाट्यातील कलाकार, भजनी मंडळ आणि एकच लक्ष तेरा कोटी वृक्ष अशी घोषणा देणाºया शाळकरी विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष या वृक्षदिंडीने वेधून घेतले होते.