शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
4
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
5
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
6
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
7
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
8
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
9
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
10
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
12
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
13
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
14
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
15
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
16
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
17
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
18
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
19
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
20
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?

मुनगंटीवारांच्या प्रयत्नामुळेच लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:07 IST

हल्लीच्या राजकारणात बघायला न मिळणारा सच्चेपणा, प्रामाणिक प्रयत्न आणि एखाद्या विषयाबद्दल प्रचंड पाठपुरावा या गुणांमुळे राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या वृक्षलागवडीच्या चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप आले आहे.

ठळक मुद्देअनिल सोले यांचे वृक्षलागवडीसंदर्भात वक्तव्य : वृक्षदिंडीला उत्साहात प्रारंभ, हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हल्लीच्या राजकारणात बघायला न मिळणारा सच्चेपणा, प्रामाणिक प्रयत्न आणि एखाद्या विषयाबद्दल प्रचंड पाठपुरावा या गुणांमुळे राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या वृक्षलागवडीच्या चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप आले आहे. सुरुवातीला हजार प्रश्न विचारणारे विरोधकही आता या चळवळीमध्ये स्वयंप्रेरणेने सहभागी झाले आहे. वसुंधरेला हिरवा शालू चढविणाऱ्या या मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद १३ कोटींचे लक्ष्य निश्चित पूर्ण करेल, असा विश्वास ग्रीन आर्मी फाऊंडेशनचे प्रमुख व वृक्षदींडीचे प्रणेते आमदार प्राध्यापक अनिल सोले यांनी व्यक्त केला.चंद्रपूर वनविभागाच्या उत्स्फूर्त सहभागात सोमवारी जिल्ह्यातील वृक्षदिंडीला हजारो नागरिकांची साथ मिळाली. प्राध्यापक अनिल सोले यांच्या नेतृत्वात गेल्या तीन वर्षांपासून सतत वृक्षदिंडी सुरू आहे. सोमवारी चंद्रपूरमध्ये वृक्षदिंडीला शासकीय विभागासह अनेकांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, आ. नाना श्यामकुळे, आ. रामदास आंबटकर, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, विभागीय वनाधिकारी अशोक सोनकुसरे, सुनील कुमार, प्रकाश धारणे, प्रशांत कांबळे, समन्वयक अभय बडकल्लेवार आदी उपस्थित होते.शहरातील मुख्य रस्त्यांवर सकाळी ९ वाजतापासून सुरु झालेली वृक्षदिंडी चंद्रपूरच्या गांधीनगर चौकाला वळसा घालत मुख्य वनसंरक्षक कार्यालयामध्ये विसर्जित झाली. या ठिकाणी मान्यवरांनी संबोधित केले. आ. अनिल सोले पुढे म्हणाले, जागतिक स्तरावर सध्या जंगलाचे पुनर्जीवन करण्याबाबत अतिशय सकारात्मक मत तयार होत आहे. महाराष्ट्रामध्येसुद्धा वाळवंट बनण्यापासून वाचण्यासाठी याची गरज आहे.वृक्षलागवडीबाबत यापूर्वी जनतेला प्रश्न अधिक पडायचे. तीन वर्षांपूर्वी वृक्षलागवडीच्या संदर्भात अनेकांना प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत होती.मात्र ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या तन्मयतेने, ज्या आत्मियतेने या मोहिमेमध्ये स्वत:ला झोकून दिले आणि पाठपुरावा घेतला. त्यानंतर मात्र सर्व राज्यभर चित्र बदलले असून हा एक प्रामाणिकपणे काम करणारा वनमंत्री असून वृक्षलागवडीसारख्या जनतेच्या हिताच्या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सहभागी झालेच पाहिजे, असे मत महाराष्ट्रभर जनतेचे तयार झालेले आहे. आणि त्यामुळेच चांदा ते बांदा या योजनेला मोठ्या प्रमाणात यश मिळत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.वृक्ष दिंडीची जेव्हा कल्पना ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे मांडली. त्यावेळी त्यांनी लोकसहभागाची योजना असल्याचे जाहीर केले होते. आणि त्यामुळेच या मोहिमेला आणि दिंडीचे स्वरूप दिले असल्याचे त्यांनी सांगितले.उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड- आंबटकरआमदार रामदास आंबटकर यांनीदेखील यावेळी संबोधित केले. त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या या चळवळीमुळे वृक्षलागवड ही आता जनचळवळ झाल्याचे मान्य केले. उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षलागवड केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आ. श्यामकुळे यांनीही मार्गदर्शन केले.दिंडीने वेधले लक्षसकाळी रामबाग येथील वनविभागाच्या विश्रामगृहावरुन शहरातील वृक्षदिंडीला सुरुवात झाली. जवळपास अडीच ते तीन तास शहराच्या विविध भागांमध्ये वृक्षदिंडीने प्रवास केला. यावेळी पालखीमध्ये सजवलेले वृक्ष, त्यामागे पथनाट्यातील कलाकार, भजनी मंडळ आणि एकच लक्ष तेरा कोटी वृक्ष अशी घोषणा देणाºया शाळकरी विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष या वृक्षदिंडीने वेधून घेतले होते.