शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

मुनगंटीवारांच्या प्रयत्नामुळेच लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:07 IST

हल्लीच्या राजकारणात बघायला न मिळणारा सच्चेपणा, प्रामाणिक प्रयत्न आणि एखाद्या विषयाबद्दल प्रचंड पाठपुरावा या गुणांमुळे राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या वृक्षलागवडीच्या चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप आले आहे.

ठळक मुद्देअनिल सोले यांचे वृक्षलागवडीसंदर्भात वक्तव्य : वृक्षदिंडीला उत्साहात प्रारंभ, हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हल्लीच्या राजकारणात बघायला न मिळणारा सच्चेपणा, प्रामाणिक प्रयत्न आणि एखाद्या विषयाबद्दल प्रचंड पाठपुरावा या गुणांमुळे राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या वृक्षलागवडीच्या चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप आले आहे. सुरुवातीला हजार प्रश्न विचारणारे विरोधकही आता या चळवळीमध्ये स्वयंप्रेरणेने सहभागी झाले आहे. वसुंधरेला हिरवा शालू चढविणाऱ्या या मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद १३ कोटींचे लक्ष्य निश्चित पूर्ण करेल, असा विश्वास ग्रीन आर्मी फाऊंडेशनचे प्रमुख व वृक्षदींडीचे प्रणेते आमदार प्राध्यापक अनिल सोले यांनी व्यक्त केला.चंद्रपूर वनविभागाच्या उत्स्फूर्त सहभागात सोमवारी जिल्ह्यातील वृक्षदिंडीला हजारो नागरिकांची साथ मिळाली. प्राध्यापक अनिल सोले यांच्या नेतृत्वात गेल्या तीन वर्षांपासून सतत वृक्षदिंडी सुरू आहे. सोमवारी चंद्रपूरमध्ये वृक्षदिंडीला शासकीय विभागासह अनेकांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, आ. नाना श्यामकुळे, आ. रामदास आंबटकर, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, विभागीय वनाधिकारी अशोक सोनकुसरे, सुनील कुमार, प्रकाश धारणे, प्रशांत कांबळे, समन्वयक अभय बडकल्लेवार आदी उपस्थित होते.शहरातील मुख्य रस्त्यांवर सकाळी ९ वाजतापासून सुरु झालेली वृक्षदिंडी चंद्रपूरच्या गांधीनगर चौकाला वळसा घालत मुख्य वनसंरक्षक कार्यालयामध्ये विसर्जित झाली. या ठिकाणी मान्यवरांनी संबोधित केले. आ. अनिल सोले पुढे म्हणाले, जागतिक स्तरावर सध्या जंगलाचे पुनर्जीवन करण्याबाबत अतिशय सकारात्मक मत तयार होत आहे. महाराष्ट्रामध्येसुद्धा वाळवंट बनण्यापासून वाचण्यासाठी याची गरज आहे.वृक्षलागवडीबाबत यापूर्वी जनतेला प्रश्न अधिक पडायचे. तीन वर्षांपूर्वी वृक्षलागवडीच्या संदर्भात अनेकांना प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत होती.मात्र ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या तन्मयतेने, ज्या आत्मियतेने या मोहिमेमध्ये स्वत:ला झोकून दिले आणि पाठपुरावा घेतला. त्यानंतर मात्र सर्व राज्यभर चित्र बदलले असून हा एक प्रामाणिकपणे काम करणारा वनमंत्री असून वृक्षलागवडीसारख्या जनतेच्या हिताच्या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सहभागी झालेच पाहिजे, असे मत महाराष्ट्रभर जनतेचे तयार झालेले आहे. आणि त्यामुळेच चांदा ते बांदा या योजनेला मोठ्या प्रमाणात यश मिळत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.वृक्ष दिंडीची जेव्हा कल्पना ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे मांडली. त्यावेळी त्यांनी लोकसहभागाची योजना असल्याचे जाहीर केले होते. आणि त्यामुळेच या मोहिमेला आणि दिंडीचे स्वरूप दिले असल्याचे त्यांनी सांगितले.उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड- आंबटकरआमदार रामदास आंबटकर यांनीदेखील यावेळी संबोधित केले. त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या या चळवळीमुळे वृक्षलागवड ही आता जनचळवळ झाल्याचे मान्य केले. उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षलागवड केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आ. श्यामकुळे यांनीही मार्गदर्शन केले.दिंडीने वेधले लक्षसकाळी रामबाग येथील वनविभागाच्या विश्रामगृहावरुन शहरातील वृक्षदिंडीला सुरुवात झाली. जवळपास अडीच ते तीन तास शहराच्या विविध भागांमध्ये वृक्षदिंडीने प्रवास केला. यावेळी पालखीमध्ये सजवलेले वृक्ष, त्यामागे पथनाट्यातील कलाकार, भजनी मंडळ आणि एकच लक्ष तेरा कोटी वृक्ष अशी घोषणा देणाºया शाळकरी विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष या वृक्षदिंडीने वेधून घेतले होते.