शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

मुनगंटीवारांच्या प्रयत्नामुळेच लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:07 IST

हल्लीच्या राजकारणात बघायला न मिळणारा सच्चेपणा, प्रामाणिक प्रयत्न आणि एखाद्या विषयाबद्दल प्रचंड पाठपुरावा या गुणांमुळे राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या वृक्षलागवडीच्या चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप आले आहे.

ठळक मुद्देअनिल सोले यांचे वृक्षलागवडीसंदर्भात वक्तव्य : वृक्षदिंडीला उत्साहात प्रारंभ, हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हल्लीच्या राजकारणात बघायला न मिळणारा सच्चेपणा, प्रामाणिक प्रयत्न आणि एखाद्या विषयाबद्दल प्रचंड पाठपुरावा या गुणांमुळे राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या वृक्षलागवडीच्या चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप आले आहे. सुरुवातीला हजार प्रश्न विचारणारे विरोधकही आता या चळवळीमध्ये स्वयंप्रेरणेने सहभागी झाले आहे. वसुंधरेला हिरवा शालू चढविणाऱ्या या मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद १३ कोटींचे लक्ष्य निश्चित पूर्ण करेल, असा विश्वास ग्रीन आर्मी फाऊंडेशनचे प्रमुख व वृक्षदींडीचे प्रणेते आमदार प्राध्यापक अनिल सोले यांनी व्यक्त केला.चंद्रपूर वनविभागाच्या उत्स्फूर्त सहभागात सोमवारी जिल्ह्यातील वृक्षदिंडीला हजारो नागरिकांची साथ मिळाली. प्राध्यापक अनिल सोले यांच्या नेतृत्वात गेल्या तीन वर्षांपासून सतत वृक्षदिंडी सुरू आहे. सोमवारी चंद्रपूरमध्ये वृक्षदिंडीला शासकीय विभागासह अनेकांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, आ. नाना श्यामकुळे, आ. रामदास आंबटकर, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, विभागीय वनाधिकारी अशोक सोनकुसरे, सुनील कुमार, प्रकाश धारणे, प्रशांत कांबळे, समन्वयक अभय बडकल्लेवार आदी उपस्थित होते.शहरातील मुख्य रस्त्यांवर सकाळी ९ वाजतापासून सुरु झालेली वृक्षदिंडी चंद्रपूरच्या गांधीनगर चौकाला वळसा घालत मुख्य वनसंरक्षक कार्यालयामध्ये विसर्जित झाली. या ठिकाणी मान्यवरांनी संबोधित केले. आ. अनिल सोले पुढे म्हणाले, जागतिक स्तरावर सध्या जंगलाचे पुनर्जीवन करण्याबाबत अतिशय सकारात्मक मत तयार होत आहे. महाराष्ट्रामध्येसुद्धा वाळवंट बनण्यापासून वाचण्यासाठी याची गरज आहे.वृक्षलागवडीबाबत यापूर्वी जनतेला प्रश्न अधिक पडायचे. तीन वर्षांपूर्वी वृक्षलागवडीच्या संदर्भात अनेकांना प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत होती.मात्र ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या तन्मयतेने, ज्या आत्मियतेने या मोहिमेमध्ये स्वत:ला झोकून दिले आणि पाठपुरावा घेतला. त्यानंतर मात्र सर्व राज्यभर चित्र बदलले असून हा एक प्रामाणिकपणे काम करणारा वनमंत्री असून वृक्षलागवडीसारख्या जनतेच्या हिताच्या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सहभागी झालेच पाहिजे, असे मत महाराष्ट्रभर जनतेचे तयार झालेले आहे. आणि त्यामुळेच चांदा ते बांदा या योजनेला मोठ्या प्रमाणात यश मिळत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.वृक्ष दिंडीची जेव्हा कल्पना ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे मांडली. त्यावेळी त्यांनी लोकसहभागाची योजना असल्याचे जाहीर केले होते. आणि त्यामुळेच या मोहिमेला आणि दिंडीचे स्वरूप दिले असल्याचे त्यांनी सांगितले.उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड- आंबटकरआमदार रामदास आंबटकर यांनीदेखील यावेळी संबोधित केले. त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या या चळवळीमुळे वृक्षलागवड ही आता जनचळवळ झाल्याचे मान्य केले. उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षलागवड केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आ. श्यामकुळे यांनीही मार्गदर्शन केले.दिंडीने वेधले लक्षसकाळी रामबाग येथील वनविभागाच्या विश्रामगृहावरुन शहरातील वृक्षदिंडीला सुरुवात झाली. जवळपास अडीच ते तीन तास शहराच्या विविध भागांमध्ये वृक्षदिंडीने प्रवास केला. यावेळी पालखीमध्ये सजवलेले वृक्ष, त्यामागे पथनाट्यातील कलाकार, भजनी मंडळ आणि एकच लक्ष तेरा कोटी वृक्ष अशी घोषणा देणाºया शाळकरी विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष या वृक्षदिंडीने वेधून घेतले होते.