लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे खरीपातील पिकांचे नुकसान होत आहे. शेतात पाणी साचत असल्यामुळे पीक पिवळे पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.मागील काही दिवसांपासून सूर्य नारायणाचे दर्शनसुद्धा झाले नाही. ढगाळी वातावरणामुळे पिकांवर परिणाम पडत असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली जात आहे. अनेक गावांमध्ये अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी घुसले. आहे. परिणामी सोयाबीन, तूर, कपाशी, मूग, उडीद यांसह भाजीपाला पिकांचेही नुकसान होत आहे.जिल्ह्यात राजुरा, कोरपना, भद्रावती, जिवती वरोरा या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस तसेच सोयाबीनची पेरणी केली आहे. पीक जोमात असतानाच आता ढगाळी वातावरणामुळे पिकांवर विपरीत परिणाम पडत असल्याने नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे.सोयाबीन, कापूस उत्पादक संकटातयावर्षी खरीपातील पिके जोमाने आली. त्यामुळे भरघोस उत्पन्न होऊन पुढील वर्षाची चिंता मिटेल, अशी शेतकºयांची आशा असतानाच मागील आठ ते दहा दिवसांपासून ढगाळी वातावरण तसेच अधूनमधून पाऊसही कोसळत आहे. त्यामुळे आता पिके पिवळी पडत आहे. तर काही ठिकाणी शेतात पाणी जमा झाले आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकरी सध्या तरी संकटात सापडले आहे.
सततच्या पावसाने सोयाबीन पडले पिवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST
मागील काही दिवसांपासून सूर्य नारायणाचे दर्शनसुद्धा झाले नाही. ढगाळी वातावरणामुळे पिकांवर परिणाम पडत असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली जात आहे. अनेक गावांमध्ये अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी घुसले. आहे. परिणामी सोयाबीन, तूर, कपाशी, मूग, उडीद यांसह भाजीपाला पिकांचेही नुकसान होत आहे.
सततच्या पावसाने सोयाबीन पडले पिवळे
ठळक मुद्देशेतकरी पुन्हा संकटात : आठ ते दहा दिवसांपासून सूर्यदर्शनच नाही