शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

लाखो रुपयांच्या खत, बियाण्यांच्या विक्रीवर बंदी

By admin | Updated: July 2, 2014 23:16 IST

नियमांची पायमल्ली करीत खते व बियाण्यांंची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करणे कृषी विभागाने सुरू केले आहे. आतापर्यंत राजुरा तालुक्यातील पाच कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली.

कृषी विभागाची कारवाई : विविध पाच केंद्राचा समावेशचंद्रपूर : नियमांची पायमल्ली करीत खते व बियाण्यांंची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करणे कृषी विभागाने सुरू केले आहे. आतापर्यंत राजुरा तालुक्यातील पाच कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली. यात ३६ लाखांचे खत, बियाण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. कृषी अधिकारी आर.आर. राठोड यांनी ही कारवाई केली. कारवाई करण्यात आलेल्या कृषीकेंद्रात चांडक ट्रेडर्स, रोहित अ‍ॅग्रो, साईराम कृषीकेंदम अहेरी, साईबाबा कृषी केंद्र गोवरी, वैष्णवी कृषी केंद्र भुरकुंडा बूज यांचा समावेश आहे. कृषी केंद्रावर होत असलेल्या बियाण्यांच्या काळया बाजारावर आळा घालण्यासाठी कृषी विभागाने काही कृषीकेंद्रावर छापा टाकला. यात कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या बियाण्यांच्या स्टॉकवर विक्रीबंदीचे आदेश दिले. तालुक्यात ९४ परवानाधारक कृषी केंद्रे आहेत. यात ७५ बियाणे कृषी केंद्रे, ८८ खतांची कृषी केंद्रे सुरू आहेत. किटकनाशक विक्रीसाठी ८१ परवानाधारक आहेत. यापैकी ६९ विक्री केंद्रे सुरू आहेत. तालुक्यात युरिया खताची १ हजार ६५६ मेट्रीक टन विक्री झाली. डीएपी खताची ७२० मे. टन विक्री झाली. तालुक्यात कापूस बियाण्यांच्या ८५ हजार ६१९ बॅग उपलब्ध झाल्या. यात ३९ हजार ४०७ पाकिटांची विक्री झाली आहे. सोयाबीन बियाणे ७ हजार ७२ क्विंटल उपलब्ध आहे. यापैकी ५ हजार ८३४ क्विं. बियाण्यांची विक्री झाल्याची माहिती राठोड यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)