शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

बाळू धानोरकर : घोंघावणारे वादळ एकाएकी शांत झाले

By राजेश भोजेकर | Updated: May 30, 2023 11:56 IST

धानोरकर यांचा शिवसैनिक ते खासदार हा अवघा २० वर्षांचा प्रवास थक्क करणारा होता.

राजेश भोजेकर

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू   धानोरकर यांच्या निधनाची धक्कादायक वार्ता सकाळी धडकताच अख्खा चंद्रपूर जिल्हाच नव्हे ते महाराष्ट्र निशब्द झाला. अवघ्या ४८ वर्ष वयाच्या काळात घोंगावणारे वादळ एकाएकी शांत झाले, यावर विश्वासच बसत नव्हता. बाळू धानोरकर नावाच्या वादळाने चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणाचा नवा अध्याय लिहिला. सतत १५ वर्ष भाजपच्या ताब्यात असलेला गड काँग्रेसला परत मिळवून दिला. शिवसैनिक ते खासदार हा अवघा २० वर्षांचा प्रवास थक्क करणारा होता. अशातच त्यांनी एकाएकी जगाचा निरोप घेऊन मोठा धक्का दिला.

शिवबंधन हाताला बांधल्यापासून बाळू धानोरकर हे नाव सतत चर्चेत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ते एकनिष्ठ होते. काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही त्यांच्या मनात बाळासाहेबांचे विशेष स्थान होते. बाळू धानोरकर यांच्या रूपाने एक नवे नेतृत्व चंद्रपूर जिल्हावासीयांना खुणावत होते. २००९ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढली. परंतु नेहमीप्रमाणे झालेल्या बंडखोरीमुळे त्यांनाही निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र ते मनाने जिंकले होते. २०१४ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा याच मतदार संघातून विधान सभेची निवडणूक लढली आणि ते जिंकले. त्यांच्या रूपाने येथून पहिल्यांदाच शिवसेनेचा प्रतिनिधी विधानसभेत पोहचला. विशेष म्हणजे या काळात देशात मोदी लाट आली होती. शिवसेना आणि भाजपची युती तुटलेली होती. अशा विपरीत परिस्थितीत हा विजय मोठा होता. यानंतर बाळू धानोरकर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

अवघ्या ३९ व्या वर्षी आमदार झालेले बाळू धानोरकर २०१९ मध्ये  खासदार होईल. याची साधी कल्पनाही कोणी केलेली नव्हती. मात्र बाळू धानोरकर यांनी हे करून दाखवले. आमदार असताना त्यांनी चंद्रपूर मतदार संघातून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढली. ही निवडणूक लढणे म्हणजे मोठे धाडस होते. ते त्यांनी केले आणि यशस्वी झाले. त्यांनी इतिहास रचला. भाजप काँग्रेसमुक्त भारतसाठी झटत असताना बाळू धानोरकर यांनी भाजपच्या तावडीतून काँग्रेसचा बालेकिल्ला परत मिळवून दिला. हा साधासुधा विजय नव्हता, तर बाळू धानोरकर नावाच्या मावळ्याने काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होण्यापासून काँग्रेसला वाचविले. ते लोकसभेत काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून पोहोचले होते. लोकसभेत त्यांनी मतदार संघातील समस्यांसह देशातील अनेक बाबींवर कटाक्षाने प्रकाश टाकला. त्यांनी अल्पावधीतच दिल्लीतही आपली मजबूत पकड निर्माण केली होती.

काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले असले तरी त्यांचा सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी जवळचा परिचय झाला होता. असे असले तरी ते विरोधकांना नेहमी आव्हान देत असत. त्यांनी मध्यंतरी वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडून लढण्याची घोषणा करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले होते. खासदार झाल्यापासून ते देशपातळीवर चर्चेत असायचे. मात्र मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसमधील नेत्यांमधील समन्वय तुटल्यागत स्थिती निर्माण झाली होती. यामुळे ते अस्वस्थ वाटायचे.

म्हणतात ना आयुष्य क्षणभंगुर आहे. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. आणि तसेच झाले. २७ मे ०२३ रोजी म्हणजेच तीन दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर त्याचदिवशी अचानक त्यांचीही  प्रकृती खालावली. त्यांनालगेच नागपूर आणि नंतर दिल्लीला उपचारासाठी हलविले. कोणालाही काहीच कळायला मार्ग नव्हता. एकाएकी काय झाले? सर्वांच्या चेहरे प्रश्नांकित झाले होते. प्रकृती चिंताजनक आहे हे कळताच प्रत्येकजण परमेश्वराकडे त्यांच्या दिर्घआयुष्यासाकडे घालत होते. मात्र वेळ हातून निघून गेली होती. खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चांगली नव्हती.

ते सतत जनसेवेत असायचे. यामध्ये ते स्वतःचे आरोग्य जपण्यात कमी पडले. मंगळवारी सकाळी चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर गेले, ही नकोशी वार्ता धडकली आणि सारेच निशब्द झाले. खासदार बाळू धानोरकर यांचे अकाली निधन चटका लावून गेले. वादळ एकाएकी शांत कसे झाले. यावर कुणाचाच विश्वास बसत नाही आहे. पण हे कटसत्य आहे. हे पचविण्याची वेळ चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेवर नियनीने लादली आहे. 

टॅग्स :Suresh Dhanorkarसुरेश धानोरकरchandrapur-acचंद्रपूरcongressकाँग्रेस