शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

बाळू धानोरकर : घोंघावणारे वादळ एकाएकी शांत झाले

By राजेश भोजेकर | Updated: May 30, 2023 11:56 IST

धानोरकर यांचा शिवसैनिक ते खासदार हा अवघा २० वर्षांचा प्रवास थक्क करणारा होता.

राजेश भोजेकर

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू   धानोरकर यांच्या निधनाची धक्कादायक वार्ता सकाळी धडकताच अख्खा चंद्रपूर जिल्हाच नव्हे ते महाराष्ट्र निशब्द झाला. अवघ्या ४८ वर्ष वयाच्या काळात घोंगावणारे वादळ एकाएकी शांत झाले, यावर विश्वासच बसत नव्हता. बाळू धानोरकर नावाच्या वादळाने चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणाचा नवा अध्याय लिहिला. सतत १५ वर्ष भाजपच्या ताब्यात असलेला गड काँग्रेसला परत मिळवून दिला. शिवसैनिक ते खासदार हा अवघा २० वर्षांचा प्रवास थक्क करणारा होता. अशातच त्यांनी एकाएकी जगाचा निरोप घेऊन मोठा धक्का दिला.

शिवबंधन हाताला बांधल्यापासून बाळू धानोरकर हे नाव सतत चर्चेत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ते एकनिष्ठ होते. काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही त्यांच्या मनात बाळासाहेबांचे विशेष स्थान होते. बाळू धानोरकर यांच्या रूपाने एक नवे नेतृत्व चंद्रपूर जिल्हावासीयांना खुणावत होते. २००९ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढली. परंतु नेहमीप्रमाणे झालेल्या बंडखोरीमुळे त्यांनाही निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र ते मनाने जिंकले होते. २०१४ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा याच मतदार संघातून विधान सभेची निवडणूक लढली आणि ते जिंकले. त्यांच्या रूपाने येथून पहिल्यांदाच शिवसेनेचा प्रतिनिधी विधानसभेत पोहचला. विशेष म्हणजे या काळात देशात मोदी लाट आली होती. शिवसेना आणि भाजपची युती तुटलेली होती. अशा विपरीत परिस्थितीत हा विजय मोठा होता. यानंतर बाळू धानोरकर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

अवघ्या ३९ व्या वर्षी आमदार झालेले बाळू धानोरकर २०१९ मध्ये  खासदार होईल. याची साधी कल्पनाही कोणी केलेली नव्हती. मात्र बाळू धानोरकर यांनी हे करून दाखवले. आमदार असताना त्यांनी चंद्रपूर मतदार संघातून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढली. ही निवडणूक लढणे म्हणजे मोठे धाडस होते. ते त्यांनी केले आणि यशस्वी झाले. त्यांनी इतिहास रचला. भाजप काँग्रेसमुक्त भारतसाठी झटत असताना बाळू धानोरकर यांनी भाजपच्या तावडीतून काँग्रेसचा बालेकिल्ला परत मिळवून दिला. हा साधासुधा विजय नव्हता, तर बाळू धानोरकर नावाच्या मावळ्याने काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होण्यापासून काँग्रेसला वाचविले. ते लोकसभेत काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून पोहोचले होते. लोकसभेत त्यांनी मतदार संघातील समस्यांसह देशातील अनेक बाबींवर कटाक्षाने प्रकाश टाकला. त्यांनी अल्पावधीतच दिल्लीतही आपली मजबूत पकड निर्माण केली होती.

काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले असले तरी त्यांचा सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी जवळचा परिचय झाला होता. असे असले तरी ते विरोधकांना नेहमी आव्हान देत असत. त्यांनी मध्यंतरी वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडून लढण्याची घोषणा करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले होते. खासदार झाल्यापासून ते देशपातळीवर चर्चेत असायचे. मात्र मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसमधील नेत्यांमधील समन्वय तुटल्यागत स्थिती निर्माण झाली होती. यामुळे ते अस्वस्थ वाटायचे.

म्हणतात ना आयुष्य क्षणभंगुर आहे. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. आणि तसेच झाले. २७ मे ०२३ रोजी म्हणजेच तीन दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर त्याचदिवशी अचानक त्यांचीही  प्रकृती खालावली. त्यांनालगेच नागपूर आणि नंतर दिल्लीला उपचारासाठी हलविले. कोणालाही काहीच कळायला मार्ग नव्हता. एकाएकी काय झाले? सर्वांच्या चेहरे प्रश्नांकित झाले होते. प्रकृती चिंताजनक आहे हे कळताच प्रत्येकजण परमेश्वराकडे त्यांच्या दिर्घआयुष्यासाकडे घालत होते. मात्र वेळ हातून निघून गेली होती. खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चांगली नव्हती.

ते सतत जनसेवेत असायचे. यामध्ये ते स्वतःचे आरोग्य जपण्यात कमी पडले. मंगळवारी सकाळी चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर गेले, ही नकोशी वार्ता धडकली आणि सारेच निशब्द झाले. खासदार बाळू धानोरकर यांचे अकाली निधन चटका लावून गेले. वादळ एकाएकी शांत कसे झाले. यावर कुणाचाच विश्वास बसत नाही आहे. पण हे कटसत्य आहे. हे पचविण्याची वेळ चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेवर नियनीने लादली आहे. 

टॅग्स :Suresh Dhanorkarसुरेश धानोरकरchandrapur-acचंद्रपूरcongressकाँग्रेस